शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

१५७ प्रभागांसाठी एकूण १०६९ अर्ज

By admin | Updated: April 4, 2016 01:52 IST

या तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या १५७ प्रभागांसाठी आज आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत १०६९ अर्ज दाखल झाले आहेत. जव्हार पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात त्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती

जव्हार : या तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या १५७ प्रभागांसाठी आज आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत १०६९ अर्ज दाखल झाले आहेत. जव्हार पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात त्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती यावेळी भर उन्हात उमेदवार, त्यांचे सूचक, अनुमोदक व समर्थकांनी लांबच लाब रांगा लावल्या होत्या. निवडणूक आयोगाने जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र नामनिर्देशन पत्रा सोबतच जोडण्याची अट ऐन वेळी शिथिल केल्यामुळे शेवटच्या दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करतांना अनेकांची दमछाक होत होती. हातात अर्ज घेऊन रांगेत उभे असलेले आपला नंबर येईपर्यंत आवश्यकत ते दस्तऐवज गोळा करण्यासाठी समर्थकांकरवी धावपळ करीत होते. यामुळे कधी नव्हे इतकी मोठी उमेदवारांची रांग पहायला मिळाली. जात पडताळणी वैध्यता प्रमाणपत्र आता निवडणुकी नंतर सहा महिन्यात सादर करण्याची मुदत आयोगाने दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर जरी लढविल्या जात नसल्यातरी प्रत्येक पक्षाने दुसऱ्या चिन्हावर आपल्या पक्षाचे उमेदवार अथवा पॅनल तयार केल्याने पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आपल्या उमेदवारांनी अर्ज योग्य रितीने भरले आहेत कि नाही याची शहानिशा जातीने करत होते. जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती आहेत त्यापैकी वालवंडा ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाल्याने तेथील निवडणुका होणार नाहीत तर जामसर व बरवाडपाडा ही ग्रामदान मंडळे असल्याने तेथे ग्रामपंचायती सारखी निवडणूक न होता अध्यक्ष निवडला जात असल्याने तेथे निवडणुका होणार नसल्यामुळे ४७ ग्रा.पं. च्या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला.तालुक्यात १५७ प्रभागातून ऐकूण ४३७ सदस्य निवडले जाणार आहेत. जव्हार हा आदिवासी तालुका असल्यामुळे इतर मागासवर्गीय महिला व अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी केवळ एकच जागा राखीव आहे तर उर्विरत ४३२ जागां अनुसूचित जमाती साठी राखीव आहेत.गेल्यावर्षीच झालेल्या लोकसभा, विधानसभा,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भा.ज.पा. ने तालुक्यावरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.पालघर जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले जव्हार तालुक्यातील आहेत.