शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

‘सूर्या’च्या पाण्यासाठी आज जिल्हाबंदची हाक, सूर्या प्रकल्पातील ८० टक्के पाणी वसई-विरार, भार्इंदरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:30 IST

सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, भार्इंदर ला पळवून नेण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारासह सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार असून शासनाच्या ह्या निर्णया विरोधात सर्वसामान्य एकवटला असून उद्याच्या (सोमवार) जिल्हाबंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.

पालघर : सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, भार्इंदर ला पळवून नेण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारासह सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार असून शासनाच्या ह्या निर्णया विरोधात सर्वसामान्य एकवटला असून उद्याच्या (सोमवार) जिल्हाबंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास ह्या सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्र मगड ह्या तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या सिंचनासाठी व गाव-पाड्यातील घरांना पिण्यासाठी मिळणे अपेक्षित असताना राजकीय मताच्या जोरावर ते वसई-विरार व मीरा-भार्इंदर कडे मिळविण्यात लोकप्रतिनिधी यशस्वी झाले होते. त्याचा मोठा परिणाम तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनावर होणार असून त्यांच्या घरात पुरेसे पाणीच पोचणार नाही. २६ गावे नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत असलेल्या सातपाटी, शिरगाव, धनसार, हरणवाडी, खारेकुरण इत्यादी गावसह मुरबे, डहाणू तील अनेक गावांना आठवड्यात फक्त एक ते दोन दिवसात पाणीपुरवठा होत आहे. तर पालघर मुख्यालय व नवनगर लाही पाण्याचा पुरवठा होऊ शकेल की नाही ह्याबाबत ही शंका उपस्थित केली जात आहे.डहाणू, कासा, पालघर, बोईसर, मनोर येथे झालेल्या बैठकींना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारच्या जिल्हा बंद बाबत प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली असून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, माकप, भूमिसेना, कुणबी सेना, कष्टकरी संघटना, आदिवासी एकता परिषद, शेतकरी संघर्ष समिती, ओबीसी हक्क परिषदेसह अन्य संघटनांनी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बंद ला पाठिंबा दर्शविला आहे.