शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

‘सूर्या’च्या पाण्यासाठी आज जिल्हाबंदची हाक, सूर्या प्रकल्पातील ८० टक्के पाणी वसई-विरार, भार्इंदरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:30 IST

सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, भार्इंदर ला पळवून नेण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारासह सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार असून शासनाच्या ह्या निर्णया विरोधात सर्वसामान्य एकवटला असून उद्याच्या (सोमवार) जिल्हाबंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.

पालघर : सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, भार्इंदर ला पळवून नेण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारासह सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार असून शासनाच्या ह्या निर्णया विरोधात सर्वसामान्य एकवटला असून उद्याच्या (सोमवार) जिल्हाबंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास ह्या सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्र मगड ह्या तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या सिंचनासाठी व गाव-पाड्यातील घरांना पिण्यासाठी मिळणे अपेक्षित असताना राजकीय मताच्या जोरावर ते वसई-विरार व मीरा-भार्इंदर कडे मिळविण्यात लोकप्रतिनिधी यशस्वी झाले होते. त्याचा मोठा परिणाम तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनावर होणार असून त्यांच्या घरात पुरेसे पाणीच पोचणार नाही. २६ गावे नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत असलेल्या सातपाटी, शिरगाव, धनसार, हरणवाडी, खारेकुरण इत्यादी गावसह मुरबे, डहाणू तील अनेक गावांना आठवड्यात फक्त एक ते दोन दिवसात पाणीपुरवठा होत आहे. तर पालघर मुख्यालय व नवनगर लाही पाण्याचा पुरवठा होऊ शकेल की नाही ह्याबाबत ही शंका उपस्थित केली जात आहे.डहाणू, कासा, पालघर, बोईसर, मनोर येथे झालेल्या बैठकींना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारच्या जिल्हा बंद बाबत प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली असून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, माकप, भूमिसेना, कुणबी सेना, कष्टकरी संघटना, आदिवासी एकता परिषद, शेतकरी संघर्ष समिती, ओबीसी हक्क परिषदेसह अन्य संघटनांनी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बंद ला पाठिंबा दर्शविला आहे.