शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

‘सूर्या’च्या पाण्यासाठी आज जिल्हाबंदची हाक, सूर्या प्रकल्पातील ८० टक्के पाणी वसई-विरार, भार्इंदरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:30 IST

सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, भार्इंदर ला पळवून नेण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारासह सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार असून शासनाच्या ह्या निर्णया विरोधात सर्वसामान्य एकवटला असून उद्याच्या (सोमवार) जिल्हाबंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.

पालघर : सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, भार्इंदर ला पळवून नेण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारासह सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार असून शासनाच्या ह्या निर्णया विरोधात सर्वसामान्य एकवटला असून उद्याच्या (सोमवार) जिल्हाबंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास ह्या सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्र मगड ह्या तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या सिंचनासाठी व गाव-पाड्यातील घरांना पिण्यासाठी मिळणे अपेक्षित असताना राजकीय मताच्या जोरावर ते वसई-विरार व मीरा-भार्इंदर कडे मिळविण्यात लोकप्रतिनिधी यशस्वी झाले होते. त्याचा मोठा परिणाम तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनावर होणार असून त्यांच्या घरात पुरेसे पाणीच पोचणार नाही. २६ गावे नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत असलेल्या सातपाटी, शिरगाव, धनसार, हरणवाडी, खारेकुरण इत्यादी गावसह मुरबे, डहाणू तील अनेक गावांना आठवड्यात फक्त एक ते दोन दिवसात पाणीपुरवठा होत आहे. तर पालघर मुख्यालय व नवनगर लाही पाण्याचा पुरवठा होऊ शकेल की नाही ह्याबाबत ही शंका उपस्थित केली जात आहे.डहाणू, कासा, पालघर, बोईसर, मनोर येथे झालेल्या बैठकींना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारच्या जिल्हा बंद बाबत प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली असून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, माकप, भूमिसेना, कुणबी सेना, कष्टकरी संघटना, आदिवासी एकता परिषद, शेतकरी संघर्ष समिती, ओबीसी हक्क परिषदेसह अन्य संघटनांनी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बंद ला पाठिंबा दर्शविला आहे.