शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बचत गटांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: July 10, 2015 22:33 IST

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ३५ आश्रमशाळा तसेच १७ वसतिगृहांना भाजीपाला तसेच भोजनपुरवठा करणाऱ्या आदिवासी महिला

डहाणू : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ३५ आश्रमशाळा तसेच १७ वसतिगृहांना भाजीपाला तसेच भोजनपुरवठा करणाऱ्या आदिवासी महिला बचत गटांकडून शासन वार्षिक ठेके १५ आॅगस्टपासून काढून घेणार आहे. याचा फटका डहाणू, पालघर, तलासरी, वसई तालुक्यांना बसणार असल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे शेकडो महिला बचत गट तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो महिलांवर बेकारी व उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास मुलाबाळांसह आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी महिला बचत गटांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.जिल्ह्यातील दऱ्याखोऱ्यांत, डोंगरकुशीत दारिद्र्यात खितपत पडलेल्या अनुसूचित जमातीच्या लोकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने वरील ठिकाणच्या शहरी, ग्रामीण आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृहे स्थापन करून शिक्षणाची सोय केली. शिवाय, शिक्षणाबरोबरच सुमारे २० हजार विद्यार्थी, विद्यार्थिनींना सकाळी दूध, अंडी, उपमा, शिरा, सफरचंद तर दुपारी भाजी-चपाती, भात-भाजी, वरण, कोशिंबीर देऊ करून पोटभर जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे रोजगारासाठी इतर जिल्ह्यांत स्थलांतरित होणाऱ्या हजारो आदिवासी कुटुंबांसाठी ही योजना एका अर्थाने आर्थिक नाडीच ठरली होती. दरम्यान डहाणू, पालघर, तलासरी, जव्हार यासारख्या आदिवासीबहुल तालुक्यांतील वसतिगृहे तसेच आश्रमशाळांना भोजन, भाजीपाला, अंडी, केळी, दूध इ. वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम स्थानिक आदिवासी महिला बचत गटांकडे सोपविण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागांतील महिला बचत गट वर्षानुवर्षे हे काम करून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. तर, शासनाने २०१५-२०१६ च्या शैक्षणिक वर्षासाठीदेखील निविदा जाहीर करून आश्रमशाळा व वसतिगृहांना निरनिराळ्या वस्तू तसेच भोजनठेका पुरवठा करणाऱ्या शेकडो महिला बचत गटांना आदेश देऊन काम सुरू केले. परंतु शाळा, महाविद्यालये सुरू होऊन एक महिना उलटत नाही. एवढ्यातच शासनाच्या आदिवासी विभागाकडून १५ आॅगस्टपासून वसतिगृहे तसेच आश्रमशाळांतील महिला बचत गटांकडून भोजन तसेच विविध वस्तुपुरवठा करण्याचे काम काढून घेण्यात येणार असल्याने हजारो महिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. (वार्ताहर)