शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

बचत गटांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: July 10, 2015 22:33 IST

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ३५ आश्रमशाळा तसेच १७ वसतिगृहांना भाजीपाला तसेच भोजनपुरवठा करणाऱ्या आदिवासी महिला

डहाणू : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ३५ आश्रमशाळा तसेच १७ वसतिगृहांना भाजीपाला तसेच भोजनपुरवठा करणाऱ्या आदिवासी महिला बचत गटांकडून शासन वार्षिक ठेके १५ आॅगस्टपासून काढून घेणार आहे. याचा फटका डहाणू, पालघर, तलासरी, वसई तालुक्यांना बसणार असल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे शेकडो महिला बचत गट तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो महिलांवर बेकारी व उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास मुलाबाळांसह आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी महिला बचत गटांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.जिल्ह्यातील दऱ्याखोऱ्यांत, डोंगरकुशीत दारिद्र्यात खितपत पडलेल्या अनुसूचित जमातीच्या लोकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने वरील ठिकाणच्या शहरी, ग्रामीण आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृहे स्थापन करून शिक्षणाची सोय केली. शिवाय, शिक्षणाबरोबरच सुमारे २० हजार विद्यार्थी, विद्यार्थिनींना सकाळी दूध, अंडी, उपमा, शिरा, सफरचंद तर दुपारी भाजी-चपाती, भात-भाजी, वरण, कोशिंबीर देऊ करून पोटभर जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे रोजगारासाठी इतर जिल्ह्यांत स्थलांतरित होणाऱ्या हजारो आदिवासी कुटुंबांसाठी ही योजना एका अर्थाने आर्थिक नाडीच ठरली होती. दरम्यान डहाणू, पालघर, तलासरी, जव्हार यासारख्या आदिवासीबहुल तालुक्यांतील वसतिगृहे तसेच आश्रमशाळांना भोजन, भाजीपाला, अंडी, केळी, दूध इ. वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम स्थानिक आदिवासी महिला बचत गटांकडे सोपविण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागांतील महिला बचत गट वर्षानुवर्षे हे काम करून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. तर, शासनाने २०१५-२०१६ च्या शैक्षणिक वर्षासाठीदेखील निविदा जाहीर करून आश्रमशाळा व वसतिगृहांना निरनिराळ्या वस्तू तसेच भोजनठेका पुरवठा करणाऱ्या शेकडो महिला बचत गटांना आदेश देऊन काम सुरू केले. परंतु शाळा, महाविद्यालये सुरू होऊन एक महिना उलटत नाही. एवढ्यातच शासनाच्या आदिवासी विभागाकडून १५ आॅगस्टपासून वसतिगृहे तसेच आश्रमशाळांतील महिला बचत गटांकडून भोजन तसेच विविध वस्तुपुरवठा करण्याचे काम काढून घेण्यात येणार असल्याने हजारो महिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. (वार्ताहर)