शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

वाडा तालुक्यातील ठाकरे कुटुंबामधील तिघांचा २० दिवसांमध्ये कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:55 IST

आई-वडील, तरुण मुलाच्या निधनाने ऐनशेत गावावर शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूंची संख्याही वाढती आहे. अगदी चालती-बोलती आणि तरुण माणसेही या महामारीची 

बळी ठरत आहेत. अनेक कुटुंबे अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत. अशीच घटना वाडा तालुक्यातील ऐनशेत येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा २० दिवसांत मृत्यू झाल्याने तालुक्यातील ऐनशेत गावावर शोककळा पसरली आहे. ऐनशेत गावातील ठाकरे कुटुंबातील आई, वडील, मुलगा, सून व लहान मुले असे संपूर्ण कुटुंबच कोरोनाने बाधित झाल्यानंतर दि. ११ एप्रिल रोजी सविता सदानंद ठाकरे यांचे कोरोनाने निधन झाले. याच वेळी त्यांचे पती व मुलगाही रुग्णालयात उपचार घेत असतानाच सविता यांच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी २२ एप्रिल रोजी त्यांच्या ३४ वर्षीय मुलाचा सागर सदानंद ठाकरे यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी दि. १ मे रोजी रुग्णालयात उपचार घेत असलेले सागरचे वडील सदानंद भास्कर ठाकरे यांचेही दुर्दैवी निधन झाल्याने ठाकरे कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबावर व ऐनशेत गावात हळहळ व्यक्त होत असून गावावरच शोककळा पसरली आहे.

कोरोना महामारीने सुखी कुटुंबावर घालासदानंद ठाकरे हे कृषी खात्यातून तीन वर्षांपूर्वी चालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते तर सागर हा बी.एस्सी. ॲग्रिकल्चरची पदवी घेऊन कृषी खात्यातच कंत्राटी पद्धतीने सेवेत होता व स्वत:चा नर्सरीचा व्यवसायही करत होता. परंतु कोरोना महामारीने या सुखी कुटुंबावर घाला घालून संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या