शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डहाणू बंदरातील तीन बोटी परतल्या, वादळामुळे मासेमारीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:34 IST

अनिरूद्ध पाटील ओक्खी वादळामुळे डहाणू समुद्रात खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नांबेरचा बावटा लावण्यात आला आहे.

अनिरूद्ध पाटील ओक्खी वादळामुळे डहाणू समुद्रात खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नांबेरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीला न जाण्याचे निर्देश झुगारून मातोश्रीप्रसादसह भाग्यसाई नावाच्या दोन बोटी समुद्रात गेल्या. दरम्यान संपर्क साधुन विषयाचे गांभिर्य सांगितल्या नंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान तिन्ही बोटी सुखरूप बंदरात दाखल झाल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या डहाणू कार्यालयाचे परवाना अधिकारी अनिल बावीस्कर यांचे म्हणणे आहे.डहाणू किनाºयावर रविवारच्या रात्री उच्चतम भरती रेषेपर्यंतची पातळी लाटांनी गाठल्याने खाजण क्षेत्रात भरतीच्या पाण्याने शिरकाव केला. कालपर्यंत दोन नंबरचा बावटा होता. ओक्खी वादळाची तीव्रता वाढत असून ढगाळ वातावरणासह वादळ सदृश्यिस्थती कायम असून डहाणूच्या समुद्राला खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नंबरचा बावटा मेरीटाईम विभागाने लावला आहे. मच्छमारांनी खोल समुद्रात न जाता बंदरात होड्या नांगरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या डहाणू कार्यालयातर्फे वार्डन जातीने लक्ष देऊन मार्गदर्शन करीत आहेत. मात्र डहाणू बंदरातील भाग्यसाई (आयएनडी-एमएच-२-एमएम-३५७२), मातोश्रीप्रसाद (आयएनडी-एमएच-२-एमएम-२६९०) आणि भाग्यसाई (आयएनडी-एमएच-२-एमएम-२८४१) या तीन मासेमारी बोटी सूचनांचे पालन न करता समुद्रात गेल्या असून त्यांच्याशी उशिरापर्यंत संपर्क झाल्याचे अधिकारी म्हणाले.तालुक्यात डहाणू आणि धाकटी डहाणू ही दोन मोठी बंदरे असून अनुक्र मे ११५ व १५४ मासेमारी नौका आहेत. तर वरोर २९, आगर-नरपड १७, चिंचणी ६, चिखले ४, घोलवड आणि बोर्डी प्रत्येकी एक बोटी आहेत. शिवाय तर तलासरी तालुक्यातील झाई बंदरात १८० नौका आहेत. सर्व जहाजे सुखरूप असून किनाºयावर नांगरण्यात आल्या आहेत. ओखी वादळामुळे ऐन मासेमारी हंगामात दोन दिवस मासेमारी बंद असून त्याचा फटका मकच्छीमारांना बसतो आहे.