शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 01:04 IST

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही.

बोर्डी : पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी सध्या गुजरातच्या विविध बंदरात अडकले असून तेथे खाण्या-पिण्याची आबाळ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आपल्याला घरापर्यंत पोहोचवण्याची काही ना काही व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र तसेच गुजरात सरकारकडे केली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या सीमा बंद असल्याने त्यांच्यासमोर कठीण प्रसंग आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरीसह अन्य तालुक्यातील हजारो आदिवासी नागरिक हे गुजरात तसेच गोवा राज्यातील मासेमारी बोटीवर तांडेल आणि खलाशी म्हणून आॅगस्ट ते मे या मासेमारी हंगामासाठी स्थलांतरित होतात. या वर्षीच्या प्रारंभी मत्स्य दुष्काळामुळे हंगामाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बोट मालकांनी अनेकांना घरी पाठवले. तर शेवटची फिशिंग करून घरी येण्याच्या तयारीत असताना त्यांना कोरोनामुळे बंदरात जहाज नांगरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे जेटी, खाडी आणि किनाऱ्यालगत बोटी उभ्या कराव्या लागल्याची माहिती डहाणूतील तांडेल कमलेश माच्छी यांनी ‘लोकमत’ला दिली.

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही. तेथील प्रशासनाकडून खाण्या-पिण्याची सुविधा निर्माण केल्याचे सांगण्यात आले. मात्र कोणत्या भागात त्याचे वाटप होते, याची त्यांना माहिती नाही. बोटमालकही पुरेसे लक्ष देत नसल्याने आबाळ होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पालघर जिल्ह्यापासून ही बंदरे सुमारे ७५० ते ८०० कि.मी. लांब असल्याने चालत अंतर कापता येणे अशक्य असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे घरापर्यंत जाण्यासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करून जिल्हा तसेच राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे या खलाशांचे लवकर घर गाठण्याचे स्वप्न भंगणार आहे. तर घरधन्याला माघारी बोलावण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करून परतीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खलाशांच्या कुटुंबियांकडूनही होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSea Routeसागरी महामार्ग