शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 01:04 IST

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही.

बोर्डी : पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी सध्या गुजरातच्या विविध बंदरात अडकले असून तेथे खाण्या-पिण्याची आबाळ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आपल्याला घरापर्यंत पोहोचवण्याची काही ना काही व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र तसेच गुजरात सरकारकडे केली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या सीमा बंद असल्याने त्यांच्यासमोर कठीण प्रसंग आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरीसह अन्य तालुक्यातील हजारो आदिवासी नागरिक हे गुजरात तसेच गोवा राज्यातील मासेमारी बोटीवर तांडेल आणि खलाशी म्हणून आॅगस्ट ते मे या मासेमारी हंगामासाठी स्थलांतरित होतात. या वर्षीच्या प्रारंभी मत्स्य दुष्काळामुळे हंगामाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बोट मालकांनी अनेकांना घरी पाठवले. तर शेवटची फिशिंग करून घरी येण्याच्या तयारीत असताना त्यांना कोरोनामुळे बंदरात जहाज नांगरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे जेटी, खाडी आणि किनाऱ्यालगत बोटी उभ्या कराव्या लागल्याची माहिती डहाणूतील तांडेल कमलेश माच्छी यांनी ‘लोकमत’ला दिली.

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही. तेथील प्रशासनाकडून खाण्या-पिण्याची सुविधा निर्माण केल्याचे सांगण्यात आले. मात्र कोणत्या भागात त्याचे वाटप होते, याची त्यांना माहिती नाही. बोटमालकही पुरेसे लक्ष देत नसल्याने आबाळ होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पालघर जिल्ह्यापासून ही बंदरे सुमारे ७५० ते ८०० कि.मी. लांब असल्याने चालत अंतर कापता येणे अशक्य असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे घरापर्यंत जाण्यासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करून जिल्हा तसेच राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे या खलाशांचे लवकर घर गाठण्याचे स्वप्न भंगणार आहे. तर घरधन्याला माघारी बोलावण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करून परतीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खलाशांच्या कुटुंबियांकडूनही होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSea Routeसागरी महामार्ग