शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 01:04 IST

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही.

बोर्डी : पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी सध्या गुजरातच्या विविध बंदरात अडकले असून तेथे खाण्या-पिण्याची आबाळ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आपल्याला घरापर्यंत पोहोचवण्याची काही ना काही व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र तसेच गुजरात सरकारकडे केली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या सीमा बंद असल्याने त्यांच्यासमोर कठीण प्रसंग आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरीसह अन्य तालुक्यातील हजारो आदिवासी नागरिक हे गुजरात तसेच गोवा राज्यातील मासेमारी बोटीवर तांडेल आणि खलाशी म्हणून आॅगस्ट ते मे या मासेमारी हंगामासाठी स्थलांतरित होतात. या वर्षीच्या प्रारंभी मत्स्य दुष्काळामुळे हंगामाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बोट मालकांनी अनेकांना घरी पाठवले. तर शेवटची फिशिंग करून घरी येण्याच्या तयारीत असताना त्यांना कोरोनामुळे बंदरात जहाज नांगरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे जेटी, खाडी आणि किनाऱ्यालगत बोटी उभ्या कराव्या लागल्याची माहिती डहाणूतील तांडेल कमलेश माच्छी यांनी ‘लोकमत’ला दिली.

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही. तेथील प्रशासनाकडून खाण्या-पिण्याची सुविधा निर्माण केल्याचे सांगण्यात आले. मात्र कोणत्या भागात त्याचे वाटप होते, याची त्यांना माहिती नाही. बोटमालकही पुरेसे लक्ष देत नसल्याने आबाळ होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पालघर जिल्ह्यापासून ही बंदरे सुमारे ७५० ते ८०० कि.मी. लांब असल्याने चालत अंतर कापता येणे अशक्य असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे घरापर्यंत जाण्यासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करून जिल्हा तसेच राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे या खलाशांचे लवकर घर गाठण्याचे स्वप्न भंगणार आहे. तर घरधन्याला माघारी बोलावण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करून परतीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खलाशांच्या कुटुंबियांकडूनही होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSea Routeसागरी महामार्ग