शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

थर्टीफर्स्टवर पोलिसांची करडी नजर; दारूपार्ट्या, मद्यपी वाहनचालक रडारवर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 10:38 IST

पालघर हा जिल्हा मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच शेजारच्या गुजरात राज्यालाही जवळचा आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला असल्याने बहुसंख्य पर्यटक समुद्रकिनारपट्टी भागांत भटकंती आणि रात्रीच्या वेळी दारूपार्ट्या करण्याला प्राधान्य देतात.

पालघर : पालघर जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जल्लोष होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांसह प्रशासन सतर्क झाले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या दारूपार्ट्यांवर नजर ठेवली जात आहे, तसेच ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पालघर हा जिल्हा मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच शेजारच्या गुजरात राज्यालाही जवळचा आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला असल्याने बहुसंख्य पर्यटक समुद्रकिनारपट्टी भागांत भटकंती आणि रात्रीच्या वेळी दारूपार्ट्या करण्याला प्राधान्य देतात. या अनुषंगाने जिल्ह्यात बव्हंशी हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल झालेली आहेत. थर्टीफर्स्टच्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे आणि त्यानंतर नवीन वर्षात सुरुवातीलाच शनिवार, रविवार, असा सुटीचा दिवस असल्यामुळे सलग तीन दिवस मौजमस्तीसाठी मिळणार आहेत. पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे विविध ठिकाणच्या नागरिकांचा ओढा असतो. गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे कडक निर्बंध होते. मात्र, यावेळी निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता आहे. मात्र, आधीच झालेले बुकिंग लक्षात घेता अनेकांना गर्दी टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पोलिसांची तसेच प्रशासनाची असलेली करडी नजर पाहता व्यावसायिकांना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. पालघर जिल्हा हा समुद्रकिनारी भाग, तसेच निसर्गाने नटलेला आहे. यामुळे येथे पर्यटन व्यवसाय बहरला आहे. मात्र, समुद्री पर्यटनाला पसंती देणाऱ्या ग्राहकांबरोबरच उपाहारगृहांनाही नवीन निर्बंध पाळावे लागणार आहेत. यामुळे ऐन हंगामात मंदीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती आता व्यावसायिकांनी व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यातील हॉटेल आणि कृषी पर्यटन केंद्रांच्या ऑनलाइन बुकिंगला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे या व्यवसायाला या हंगामात झळाळी आल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :palgharपालघर