शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

वसई-विरारला तिसरे धरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:08 IST

महासभेत मिळाली मान्यता; प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभागाकडे पाठवण्याचा मार्ग मोकळा

वसई : वसई - विरार शहराचे वाढते नागरीकरण पाहता भविष्यात पाण्याची उणीव भासू नये यासाठी खोलसापाडा पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचे पाणी वसई - विरार शहरासाठी आरिक्षत करण्याच्या आणि प्रकल्पासाठी होणाऱ्या आर्थिक खर्चाच्या प्रस्तावास महापालिका सर्वसाधारण सभेत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पेल्हार आणि पापडखिंड या दोन मालकीच्या धरणानंतर स्वत:चे असे तिसरे खोलसापाडा नामक धरण वसई - विरार मनपाला मिळणार आहे.वसई-विरार महापालिका क्षेत्रात लोकसंख्या सातत्याने वाढत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, याकरिता वसई - विरार महापालिका पाण्याच्या विविध योजनांवर काम करत आली आहे. यात सर्वप्रथम सूर्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेने स्वत:चे देहरजा धरण उभारण्याचे काम सुरू केले. तर दुसºया बाजूला वसई पूर्वेतील राजावली, तिल्हेर आणि सातिवली येथे साठवण तलावाच्या कामांना गती दिली असतानाच आता लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत खोलसापाडा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचा आणि त्याच्या आर्थिक खर्चाचा महत्त्वपूर्ण ठराव मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे ११० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.शहर पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खोलसापाडा हा प्रकल्प वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगत आहे. या प्रकल्पाचे जवळपास शंभर टक्के पाणी हे वसई-विरार शहरासाठी आरक्षित केल्यास या परिसरातील बहुतांश गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. विशेषत: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस पाणी उपलब्ध करून देणे मनपाला अधिक सोयीचे होणार आहे.प्रशासनाची खर्चास मंजुरीया खोलसापाडा - १ या पाटबंधारे प्रकल्पास पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याबाबत तसेच प्रकल्पाचा अंदाजे ११० कोटींचा खर्च मंजूर करण्याचा प्रस्ताव वसई-विरार मनपाच्या मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.प्रकल्पासाठी पाणी आरक्षित करण्यास तसेच आर्थिक खर्चास सभेची मंजुरी मिळाल्याने आता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि त्यामार्फत शासनाकडे हा प्रस्ताव सादर करण्याचा मार्ग तूर्तास तरी मोकळा झाला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शहर अभियंता माधव जवादे यांनी सांगितले.कसा असेल प्रकल्प !7.80 चौ कि मी पाण्याच्यासाठ्याची एकूण व्याप्ती13.64 दशलक्षघनमी एकूण पाणीसाठा क्षमता12.8183 दशलक्षघनमी पिण्याचेपाणी होणार उपलब्धकाय असतील तरतुदी !या प्रकल्पाची १०० टक्के मालकी ही वसई - विरार मनपाची असेल. या धरणातील १०० टक्के पाणी हे याच महानगरपालिकेसाठी आरक्षित राहील. या प्रकल्पातून उचलण्यात येणाºया पाण्याचे स्वामित्वधन महानगरपालिकेकडून घेऊ नये, आणि पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून याबाबतीत काम पाहील अशा तुर्तास तरी तरतूदी रहातील. मात्र कोकण पाटबंधारे विभाग प्रत्यक्ष कामाच्या वेळी मार्गदर्शक राहील.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार