शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

वसई-विरारला तिसरे धरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:08 IST

महासभेत मिळाली मान्यता; प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभागाकडे पाठवण्याचा मार्ग मोकळा

वसई : वसई - विरार शहराचे वाढते नागरीकरण पाहता भविष्यात पाण्याची उणीव भासू नये यासाठी खोलसापाडा पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचे पाणी वसई - विरार शहरासाठी आरिक्षत करण्याच्या आणि प्रकल्पासाठी होणाऱ्या आर्थिक खर्चाच्या प्रस्तावास महापालिका सर्वसाधारण सभेत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पेल्हार आणि पापडखिंड या दोन मालकीच्या धरणानंतर स्वत:चे असे तिसरे खोलसापाडा नामक धरण वसई - विरार मनपाला मिळणार आहे.वसई-विरार महापालिका क्षेत्रात लोकसंख्या सातत्याने वाढत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, याकरिता वसई - विरार महापालिका पाण्याच्या विविध योजनांवर काम करत आली आहे. यात सर्वप्रथम सूर्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेने स्वत:चे देहरजा धरण उभारण्याचे काम सुरू केले. तर दुसºया बाजूला वसई पूर्वेतील राजावली, तिल्हेर आणि सातिवली येथे साठवण तलावाच्या कामांना गती दिली असतानाच आता लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत खोलसापाडा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचा आणि त्याच्या आर्थिक खर्चाचा महत्त्वपूर्ण ठराव मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे ११० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.शहर पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खोलसापाडा हा प्रकल्प वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगत आहे. या प्रकल्पाचे जवळपास शंभर टक्के पाणी हे वसई-विरार शहरासाठी आरक्षित केल्यास या परिसरातील बहुतांश गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. विशेषत: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस पाणी उपलब्ध करून देणे मनपाला अधिक सोयीचे होणार आहे.प्रशासनाची खर्चास मंजुरीया खोलसापाडा - १ या पाटबंधारे प्रकल्पास पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याबाबत तसेच प्रकल्पाचा अंदाजे ११० कोटींचा खर्च मंजूर करण्याचा प्रस्ताव वसई-विरार मनपाच्या मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.प्रकल्पासाठी पाणी आरक्षित करण्यास तसेच आर्थिक खर्चास सभेची मंजुरी मिळाल्याने आता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि त्यामार्फत शासनाकडे हा प्रस्ताव सादर करण्याचा मार्ग तूर्तास तरी मोकळा झाला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शहर अभियंता माधव जवादे यांनी सांगितले.कसा असेल प्रकल्प !7.80 चौ कि मी पाण्याच्यासाठ्याची एकूण व्याप्ती13.64 दशलक्षघनमी एकूण पाणीसाठा क्षमता12.8183 दशलक्षघनमी पिण्याचेपाणी होणार उपलब्धकाय असतील तरतुदी !या प्रकल्पाची १०० टक्के मालकी ही वसई - विरार मनपाची असेल. या धरणातील १०० टक्के पाणी हे याच महानगरपालिकेसाठी आरक्षित राहील. या प्रकल्पातून उचलण्यात येणाºया पाण्याचे स्वामित्वधन महानगरपालिकेकडून घेऊ नये, आणि पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून याबाबतीत काम पाहील अशा तुर्तास तरी तरतूदी रहातील. मात्र कोकण पाटबंधारे विभाग प्रत्यक्ष कामाच्या वेळी मार्गदर्शक राहील.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार