शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

‘ते’ बेपत्ता कुटुंबीय उज्जैनमध्ये, कर्जबाजारी झाल्याने भूमीगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:18 IST

- शशी करपेवसई : सहा महिन्यांपूर्वी विरार शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या शर्मा कुटुंबातील पाच व्यक्तींना पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून शोेधून काढले. तर एकाला पुण्यातून शोधण्यात आले. कर्जबाजारी झाल्याने कुटुंबातील सहाही जण भूमीगत झाल्याचे तपासात उजेडात आले आहे.विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील वरुण सतीशचंद्र शर्मा, अनिता सतिशचंद्र शर्मा, ...

- शशी करपेवसई : सहा महिन्यांपूर्वी विरार शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या शर्मा कुटुंबातील पाच व्यक्तींना पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून शोेधून काढले. तर एकाला पुण्यातून शोधण्यात आले. कर्जबाजारी झाल्याने कुटुंबातील सहाही जण भूमीगत झाल्याचे तपासात उजेडात आले आहे.विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील वरुण सतीशचंद्र शर्मा, अनिता सतिशचंद्र शर्मा, अश्विनी सतीशचंद्र शर्मा, सुरेंद्रकुमार रामचंद्र शर्मा, मालती सुरेंद्रकुमार शर्मा, प्रियंका सुरेंद्रकुमार शर्मा आपल्या राहत्या घरातून १५ आॅक्टोबर २०१७ रोजी बेपत्ता झाले होते. वरुण शर्मा यांची अमरावती येथे राहणारी पत्नी संगीत हिने २२ आॅक्टोबरला अमरावतीहून बेपत्ता झाल्याची आॅनलाईन तक्रार दिल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सहा जण बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.सून संगिता हिच्या आॅनलाईन तक्रारीवरून अर्नाळा सागरी पोलीस वरुण शर्माच्या घरी गेले असता घराला कुलुप होतो. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये १५ आॅक्टोबरला पहाटे सहा जण एका कारमध्ये सामान टाकून निघून गेल्याचे दिसले होते.याप्रकरणाचा तपास पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, मंगेश चव्हाण, माया भोर, प्रशांत पाटील या पथकाकडे सोपवण्यात आला होता. वरुणने एकदा फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून पत्नी संगिताशी संपर्क साधला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुगलवरून वरुणचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला पुणे येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर वरुणच्या मदतीने उज्जैन मधून ताब्यात घेतले. सुरेंद्रकुमार शर्मा यांनी विरार येथील पाच ते सहा जणांकडून सहा लाख रुपये घेतले होते. मात्र, त्या कर्जाची परतफेड न केल्याने पैसे देणाऱ्यांनी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अडचणीत सापडलेल्या शर्मा कुटुंबियांनी म्हणूनच विरार सोडून उज्जैन येथे पळ काढला होता.सुनेने केली तक्रारअमरावती येथे राहणारी संगिता बाळंतपणासाठी जून २०१७ रोजी आपल्या माहेरी गेली होती. तिने मुलाला जन्म दिल्यानंतर वरुण एकदा तिला भेटायलाही गेला होता. मात्र, आॅक्टोबर २०१७ पासून कुटुंबातील कुणाचाही संपर्क होत नसल्याने तिने आॅनलाईन तक्रार केली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार