शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

‘ते’ बेपत्ता कुटुंबीय उज्जैनमध्ये, कर्जबाजारी झाल्याने भूमीगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:18 IST

- शशी करपेवसई : सहा महिन्यांपूर्वी विरार शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या शर्मा कुटुंबातील पाच व्यक्तींना पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून शोेधून काढले. तर एकाला पुण्यातून शोधण्यात आले. कर्जबाजारी झाल्याने कुटुंबातील सहाही जण भूमीगत झाल्याचे तपासात उजेडात आले आहे.विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील वरुण सतीशचंद्र शर्मा, अनिता सतिशचंद्र शर्मा, ...

- शशी करपेवसई : सहा महिन्यांपूर्वी विरार शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या शर्मा कुटुंबातील पाच व्यक्तींना पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून शोेधून काढले. तर एकाला पुण्यातून शोधण्यात आले. कर्जबाजारी झाल्याने कुटुंबातील सहाही जण भूमीगत झाल्याचे तपासात उजेडात आले आहे.विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील वरुण सतीशचंद्र शर्मा, अनिता सतिशचंद्र शर्मा, अश्विनी सतीशचंद्र शर्मा, सुरेंद्रकुमार रामचंद्र शर्मा, मालती सुरेंद्रकुमार शर्मा, प्रियंका सुरेंद्रकुमार शर्मा आपल्या राहत्या घरातून १५ आॅक्टोबर २०१७ रोजी बेपत्ता झाले होते. वरुण शर्मा यांची अमरावती येथे राहणारी पत्नी संगीत हिने २२ आॅक्टोबरला अमरावतीहून बेपत्ता झाल्याची आॅनलाईन तक्रार दिल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सहा जण बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.सून संगिता हिच्या आॅनलाईन तक्रारीवरून अर्नाळा सागरी पोलीस वरुण शर्माच्या घरी गेले असता घराला कुलुप होतो. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये १५ आॅक्टोबरला पहाटे सहा जण एका कारमध्ये सामान टाकून निघून गेल्याचे दिसले होते.याप्रकरणाचा तपास पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, मंगेश चव्हाण, माया भोर, प्रशांत पाटील या पथकाकडे सोपवण्यात आला होता. वरुणने एकदा फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून पत्नी संगिताशी संपर्क साधला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुगलवरून वरुणचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला पुणे येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर वरुणच्या मदतीने उज्जैन मधून ताब्यात घेतले. सुरेंद्रकुमार शर्मा यांनी विरार येथील पाच ते सहा जणांकडून सहा लाख रुपये घेतले होते. मात्र, त्या कर्जाची परतफेड न केल्याने पैसे देणाऱ्यांनी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अडचणीत सापडलेल्या शर्मा कुटुंबियांनी म्हणूनच विरार सोडून उज्जैन येथे पळ काढला होता.सुनेने केली तक्रारअमरावती येथे राहणारी संगिता बाळंतपणासाठी जून २०१७ रोजी आपल्या माहेरी गेली होती. तिने मुलाला जन्म दिल्यानंतर वरुण एकदा तिला भेटायलाही गेला होता. मात्र, आॅक्टोबर २०१७ पासून कुटुंबातील कुणाचाही संपर्क होत नसल्याने तिने आॅनलाईन तक्रार केली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार