शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

ते आले, त्यांनी पाहीले आणि ते गेले; स्वाधीन क्षत्रिय यांचा ‘सरकारी’ दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 03:01 IST

महाराष्ट लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय हे दोन दिवसांच्या जिल्हा दौ-यावर असून शुक्रवारी त्यांचे जव्हारमध्ये आगमन झाले. मात्र, येथील विदारक स्थिती त्यांना दिसलीच नाही. प्रशासकीय अधिका-यांनी त्यांना चांगल-चांगल ते दाखवले मात्र येथील जे प्रश्न त्यांना कळायला हवे होते त्यापासून त्यांना व त्यांच्यापासून मिडियाला कौशल्यपूर्वक दूर ठेवण्यात आल्याने हा प्रशासनाने मॅनेज केलेला दौरा होता काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

- हुसेन मेमनजव्हार : महाराष्ट लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय हे दोन दिवसांच्या जिल्हा दौ-यावर असून शुक्रवारी त्यांचे जव्हारमध्ये आगमन झाले. मात्र, येथील विदारक स्थिती त्यांना दिसलीच नाही. प्रशासकीय अधिका-यांनी त्यांना चांगल-चांगल ते दाखवले मात्र येथील जे प्रश्न त्यांना कळायला हवे होते त्यापासून त्यांना व त्यांच्यापासून मिडियाला कौशल्यपूर्वक दूर ठेवण्यात आल्याने हा प्रशासनाने मॅनेज केलेला दौरा होता काय? असा प्रश्न विचारला जात आहे.सकाळपासून जव्हार तालुक्यातील विविध भागात त्यांचा दौरा व दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम २०१५ अंमलबजावणीबाबत एकदिवसीय कार्यशाळे करीता, राज्यातील पात्र व्यक्तींना, कार्यक्षम व समयोजित लोकसेवा देण्याकरीता तसेच स्थानिक प्रशासनाकडून जनतेच्या वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन तत्पर सेवा पुरविण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट लोकसेवा हक्क अध्यायदेश - २०१५’ हा २८ एप्रिल २०१५ रोजी लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी क्षत्रिय जिल्हा दौºयावर आले होते. या वेळी त्यांनी जव्हार येथील विविध कार्यालयांना भेटी देऊन आढावा घेतला. मात्र तो प्रशासनाच्या नियोजीत ठिकाणांचाच होता. यावेळी पत्रकार तथा लोकप्रतीनिधी सोबत नव्हते, मग हा आढावा दौरा फक्त दाखविण्या पुरता होता का? असा प्रश्न निर्माण होत आहे. जनतेच्या समस्या नेहमी मांडणाºया पत्रकारांशी व लोकप्रतीनिधीशी न बोलताच क्षत्रिय परतले, त्यामुळे आयोजनाबाबत शंका आहे.ग्रामपंचायती देत असलेल्या सेवांचे क्षत्रिय यांनी कौतुक केले. मात्र तालुक्यात या सेवांचा पुरता बोजवारा उडालेला आह. आॅनलाइन दाखले देण्याबाबत महसूल विभागाकडून कामे युध्द पातळीवर सुरू आहेत. मात्र, जव्हारची इंटरनेटसेवा पुरविणारी एकमेव यंत्रणा बी.एस.एन.एल. कार्यालयाची सेवा कुचकामी असल्याने आॅनलाईन दाखले मिळणे अशक्य झाले आहे. त्यांनी जर पत्रकार परिषद घेतली असती तर आॅनलाइन सेवांचा कसा बोजवारा उडाला आहे? याचा भंडाफोड झाला असता. अधिकाºयांनी दौरा नियोजित करतांना क्षत्रिय यांना मिडियापासून कौशल्यपुर्वक दूर ठेवले. त्यामुळे या दौºयाचा उद्देश यशस्वी झाला का? असा प्रश्न विचारला जात आहे.आॅनलाइन प्रक्रियेचे असे आहे वास्तवशासनाने ‘आपले सरकार’ हे संकेत स्थळ निर्माण करून सेवा हक्क कायद्यातील विविध दाखले, तक्रार निवारण, माहितीचा अधिकार, माझे सरकार, महा योजना याबाबात आॅनलाइन सेवा पुरविली जात आहे. मात्र, या संकेत स्थाळावर माहितीचा अधिकार अर्ज स्वीकृत होतो, प्रथम तो मंत्रालयात जातो, तेथून तो संबंधित कार्यालयाच्या वरीष्ठ कार्यालयात पोहोचतो व तेथून तो संबंधित कार्यालयात पोहोचतो, याचाच अर्थ पुन्हा ही प्रक्रिया कासवगतीनेच !या आॅनलाइन प्रकियेत सुध्दा महिन्यापेक्षाही अधिक कालावधी लागतो. जर आॅनलाइन असेल तर लागेचच तो अर्ज संबंधित कार्यालयात पोहोचला पाहिजे. मात्र, तसे होत नाही. याबाबत काही माहितीच्या अधिकाराच्या अर्जदारांनी अर्जावर अपील केले मात्र अद्याप तो अर्ज कार्यालयाला पोहोचलाच नाही अशी माहिती संबंधित कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे आपले सरकार या संकेत स्थळाचाही बोजवारा उडालेला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार