पुलाला कठडे नसल्याने अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:17 AM2019-05-29T01:17:18+5:302019-05-29T01:17:20+5:30

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अघई-पाच्छापूर रस्त्यावरील अनेक पुलांना कठडे नसल्याने मोठा अपघात होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

There is no shortage of bridge due to accident risk | पुलाला कठडे नसल्याने अपघाताचा धोका

पुलाला कठडे नसल्याने अपघाताचा धोका

Next

भातसानगर : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अघई-पाच्छापूर रस्त्यावरील अनेक पुलांना कठडे नसल्याने मोठा अपघात होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आहेत. या वाहिन्यांमध्ये डांबरी रस्ता असून रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांची त्यावरून दिवसरात्र येजा सुरू असते. या मार्गावर अनेक उंचउंच पूल असून त्यांना कठडेच नाहीत. काही ठिकाणचे कठडे तुटले आहेत. टहारपूर गावात जाण्यासाठीदेखील असाच पूल असून या त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या वाहिन्या आहेत. या वाहिन्यांमध्ये असणाºया पुलाचे कठडे तुटले आहेत.
>या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले असून या तुटलेल्या कठड्यांचे, पुलावरील दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
- दिनेश उमवणे, ज्युनिअर इंजिनिअर, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

Web Title: There is no shortage of bridge due to accident risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.