शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

खडखडचे ठेकेदार आले जात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:39 IST

या धरणावर टप्प्या टप्याने झालेला खर्च मिळनू तो १३२ कोटींवर जावूनही गळती थांबत नसल्याने ठेकेदारांना जात्यात आले आहेत.

हुसेन मेमन।जव्हार : शहर व आसपासचा ग्रामिण भाग दरवर्षी पाण्याच्या टंचाईचा सामना करत असून यंदाची पाणीबाणी जास्त जाणवणारी आहे. या परिस्थितीमध्ये तालुक्यातील आधार असणाऱ्या खडखड डोमिहीरा धरण जागो जागी पाझरत असल्याने त्यावर खर्च झालेले ७३ कोटी मातीमोल झाले आहेत. त्यातच सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणावर टप्प्या टप्याने झालेला खर्च मिळनू तो १३२ कोटींवर जावूनही गळती थांबत नसल्याने ठेकेदारांना जात्यात आले आहेत.जव्हारमध्ये दरवर्षी विक्रमी पाऊस होता तरी आज ही तालुक्यातील आदीवासी पाड्यांवर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाळ्यात नेहमी पाणी टंचाई भासत असते. यामुळे शासनाकडून दरवर्षी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून विहिर, बंधारे, नळ-पाणी योजना तयार होत असतात. येथील खडखड या गावातील डोमिहीरा नावाने नदीवर आदीवासी उपाय योजने अंतर्गत २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने धरण बांधले.हा धरण २०१२ मध्ये ९५ टक्के पूर्ण झाले. मात्र, धरणाचे बांधकाम अनेक ठिकाणी निकृष्ट असल्याने तो पाझरु लागला. यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. याला जलसंपदा विभागाचे अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. त्यांच्या संगमतानेच निकृष्ट काम करण्यात आलेले असल्याचा आरोपही येथील आदिवासी समाजाने केला आहे. तो पाझरत असल्यामुळे रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे.खडखड डॅम पासून ७ किमी अंतरावर असणाºया जव्हार शहराला या धरणातून १.२८ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र जव्हार नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे शहराला मंजूर पाणी आरक्षण रद्द करण्यात आले असल्याचे पत्र कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांनी प्रधान सचिव, जलसंपदा विभागाल, मंत्रालय मुबंई यांना कळविले आहे.या प्रकरणी कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. टी. प्रभाकर यांनी खडखड धरणाच्या निकृष्ट कामाला जबाबदार दोषी अधिकाºयावर कारवाई होणार आहे असून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय त्याच्याकडून १३२ कोटी रुपये नुकसान भरपाई वसून केली जाणार असल्याचे सांगितले आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे, चौकशी अधिकारी कोकण भवन हे या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.चौकशी सुरु आहे...दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यासाठी प्रादेशिक चौकशी अधिकारी यांच्या यांच्या मार्फत चौकशी सुरू आहे.- आर. टी. प्रभाकर, कार्यकारी अभियंता,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे.सरकारचा १३२ कोटी रुपये खर्च पाण्यात गेला, २०१४ पासून चौकशी सुरू आहे. अजून दोषींवर कारवाई झालेली नाही. डॅम लीक नसता तर तालुक्याचं पाणी प्रश्न मिटला असता,वीज निर्मिती झाली असती.- पारस सहाणे, तक्रारकर्ता, जव्हार

टॅग्स :Damधरण