शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

अधिकारी नाहीत, कारभारावर परिणाम, १४ उप, १५ सहाय्यक आयुक्तांची गरज, कामाचा प्रचंड ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 03:00 IST

आठ वर्षे झालेल्या वसई विरार महापालिकेचा कारभार आजच्या घडीला आयुक्तांसह एक अतिरिक्त आयुक्त आणि एका उपायुक्ताच्या खांद्यावर आहे.

शशी करपेवसई : आठ वर्षे झालेल्या वसई विरार महापालिकेचा कारभार आजच्या घडीला आयुक्तांसह एक अतिरिक्त आयुक्त आणि एका उपायुक्ताच्या खांद्यावर आहे. महापालिकेचा पसारा पाहता अधिका-यांची प्रचंड कमतरता असल्याने कामांवर विपरित परिणाम होऊ लागला आहे.महापालिकेला सध्या १५ उपायुक्त आणि ३५ सहाय्यक आयुक्तांची गरज आहे. उपायुक्त गीता धायगुडे यांची तीन महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. किशोर गवस मार्च महिन्यात बदली होऊन गेले आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून अजीज शेख हेच एकमेव उपायुक्त आहेत. ते ही सध्या महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. या महिन्यात शेख यांनाही तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांचीही बदली होण्याची शक्यता आहे. महापालिकेने तातडीने पाच उपायुक्त मिळावेत असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. पण, अद्याप एकही दिला गेलेला नाही.सहाय्यक आयुक्तांची ३५ पदे मंजूर आहेत. यातील निम्मे पदे आस्थापनातून आणि निम्मी प्रतिनियुक्तीवर भरावयाची आहेत. पण, राज्य सरकारकडून सदानंद सुर्वे हे एकमेव सहाय्यक आयुक्त दिले गेले आहेत. त्यांची मुदत संपल्याने मार्च महिन्यात त्यांच्या बदलीची आॅर्डर निघाली होती. महापालिकेच्या विनंतीवरून सुर्वे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली गेली होती. आॅगस्ट महिन्यात राज्य सरकारने सुर्वे यांची पुन्हा बदलीची आॅर्डर काढली होती. यावेळी सुर्वे यांनी आयुक्त लोखंडे यांच्या वरदहस्ताचा वापर करून पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवली आहे. राज्य सरकारने १७ सहाय्यक आयुक्त पाठवण्याची गरज असताना एकच पाठवला आहे.>सर्वच खात्यांमध्ये अधिकाºयांची कमतरतामहापालिकेला निम्मे सहाय्यक आयुक्त नेमता येतात. पण, सध्या महापालिकेच्या आस्थापनावर एकही पात्र नसल्याने ही पदे रिक्त आहेत. सध्या वरिष्ठ लिपिक आणि काही अपात्रांनाही पदोन्नती देवून २० सहाय्यक आयुक्त नेमले आहेत. यातील अनेकांना कामे येत नसल्याने कारभार विस्कळीत आहे.जुलै महिन्यात संजय हेरवडे यांच्या रुपाने महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळाला आहे. त्यामुळे आयुक्तांसह एक अतिरिक्त आयुक्त आणि एका उपायुक्तावर कामाचा बोजा पडू लागला आहे. अनेक पदे रिक्त असल्याने तीनच इंजिनियर्सना सर्व विभागाचा कारभार विभागून द्यावा लागला आहे.