शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

जव्हारच्या अनेक मागण्या लागल्या मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 6:25 AM

आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता जव्हारच्या अनेक समस्या मार्गी लागल्या, अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे यांनी दिली आहे.

- हुसेन मेमनजव्हार - आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता जव्हारच्या अनेक समस्या मार्गी लागल्या, अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे यांनी दिली आहे.ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्याचे मुख्यालय पालघरला करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांना राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा आणि त्याने त्याचा विचार करावा, असे स्पष्ट केले होते. जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी यांसारख्या आदिवासी भागापासून नवीन पालघर जिल्ह्याचे मुख्यालय देखील दूर असल्याने गरीब आदिवासींची गैरसोय होऊ नये यासाठी याचीकाकर्त्यांच्या मागणीनुसार अपर जिल्हाधिकारी कार्यालय पूर्वीप्रमाणेच जव्हार येथे कायम ठेवण्याचा सरकारला निर्णय घ्यावा लागला होता.जिल्हा विभाजनापूर्वी जव्हारच्या अपर जिल्हाधिकारी यांना त्यांच्या अधिनस्थ पाच आदिवासी तालुक्यांपुरते जिल्हाधिकारी यांचे संपूर्ण अधिकार प्रदान करण्यात आले होते. मात्र जिल्हा विभाजनानंतर अपर जिल्हाधिकारी यांना दिलेले जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात आल्याने जव्हारचे अपर जिल्हाधिकारी कार्यालय नाममात्र सुरू आहे. अपुरा कर्मचारी वृंद आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या मर्यादित अधिकारांमुळे सध्या हे कार्यालय ओस पडले आहे. जिल्हाधिकारी हे पालघर मुख्यालयात बसत असल्यामुळे दूरच्या तालुक्यांतील प्रशासकीय यंत्रणेवर त्यांचा अंकुश राहत नाही आणि दुर्गम व आदिवासी भागांतील जनतेला विविध शासकीय कामांसाठी पालघर येथेच फेº्या माराव्या लागत आहेत.अ‍ॅड. राजाराम मुकणे यांनी आदिवासी भागाचा विकास, आरोग्य व कुपोषण आणि बेरोजगारी यांच्याशी निगडीत जनहिताच्या मागण्या मंजूर करण्यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘‘वर्षा’’ या निवासस्थानी एका शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ग्रामीण भागाच्या विकासाच्या मागण्यांची मोठी यादीच त्यांच्यासमोर मांडली. ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी आणि या भागांतील प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण रहावे यासाठी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी महिन्यातून १५ दिवस जव्हार येथून कारभार चालवावा, जव्हारमध्ये पर्यटनाला खूप वाव असल्यामुळे या भागाच्या पर्यटन विकासास चालना मिळावी आणि सिव्हिल हॉस्पीटल जिल्ह्याच्याच ठिकाणी असावे हा ब्रिटीशकालीन निकष बदलून ते जव्हार येथे होणे गरजेचे असल्याचे या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांना अ‍ॅड. मुकणे यांनी पटवून दिले. हे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.लवकरच जीआर काढणारसरकार जनतेच्या विकासासाठी कटीबद्ध आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आणि जिल्हाधिकारी यांनी महिन्यातून किमान १० दिवस जव्हारच्या मुख्यालयातून कामकाज चालविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ फोनवर चर्चा करून यासंबधी लवकरच जीआर काढू असे सांगितले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018newsबातम्या