शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

...त्यांची भटकंती दुष्काळाकडून दुष्काळाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:41 IST

भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास आहे...

- राहुल वाडेकरविक्रमगड : भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास असून औरंगाबाद येथील आपल्या गावी दुष्काळ असल्याने त्यांनी विक्रमगडची वाट धरली होती. मात्र या भागातही दुष्काळ पडल्याने त्यांच्या समस्या वाढल्या आहेत.वाढत्या महागाई व दुष्काळात कसा तग धरुन राहायचा व कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालू लागला आहे. आपली ही व्यथा प्रकाश भिका पवार व दिपक षिराले यांनी लोकमत कडे मांडली. ते सध्या रस्त्यावर आले झोपडे बांधुन वरवंटे, पाटे, उखळ आणि खलबंता विक्री करीत आहेत.आज या गावी तर उद्या त्या अशा जीवनशैैलीमुळे मुलांचे शिक्षण, स्वत:चे घर या गोष्टी तर या लोकांसाठी आज तरी स्वप्नवत आहेत़ मैलोन मैल प्रवासातच त्यांचे अर्धे आयुष्य संपते़. पण वाढत्या महागाईने व गेल्या काही दोन चार वर्षापासून पडलेला दुष्काळ व त्याची वाढत असेलल्या तिव्रतायामुळे यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यापैकी प्रकाश भिका पवार व त्याचें कुंंटुंब गेल्या एक महिनाभरापूर्वी विक्रमगड-आलोंडा शहरात रस्त्याच्या कडेला वास्तव्यास आले आहेत. त्यांनी औरंगाबाद ते आलोंडा असा खाजगी टेम्पो करुन त्यांनी आपल्या वरवंटे, पाटे, उखळ, आणि खलबंते घेऊन प्रवास केला आहे. त्यातच दगड, गाढव, आपले कुटुंब व घरातील सामान असे साहित्य येथे आणले आहेत. महिनाभरात त्यांनी बºयाच दगडी वस्तु बनविलेल्या आहेत व त्या विक्री करण्यास ठेवलेल्या आहे़ गावी दुष्काळ असल्याने ते या भागात आले आहेत. दरम्यान. येथेही दुष्काळ असल्याने त्यांच्या दगडी वस्तु विक्रीची मागणी खुप कमी झाली असल्याचे त्यांनी सांगीतले़हे कुंटुंब दगड फोडुन त्यातून वेगवेगळया वस्तु बनवून दारोदारी भटकत व आठवडा बाजारात त्या वस्तुंची विक्री करुन मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आलेले आहेत. ़हा आपल्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय असुन, आपण तो जोपासला असल्याचे सांगतात़ आज तरी आधुनिक युगात लोक वावरत असले तरी विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा ग्रामीण परिसर असलेल्या तालुक्यांत भागात दगडी वस्तुना मागणी आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी रोजीरोटीसाठी तहान, भूक आदी न बघता पोटासाठी दोन घास मिळावे यासाठी दिवसभर दगड फोडण्याचे काम करावे लागते. दगड फोडतांना त्याचा कस डोळयात अनेकवेळा उडतो कधी कधी त्याचा कचरा मार लागुन डोळा जाण्याचा संभाव असतो. मात्र आता हे आमचे रोजचेच असल्याने तेवढी दक्षता आम्हांस घ्यावी लागते व दुर्लक्षही करावे लागते असे पवार सांगतात.दगडापासून जाते, पाटे, कुंडी, दिवा, कुंभई, भुताळ अशा विविध वस्तू बनवून भटंकती करावी लागते ़त्याचप्रमाणे आठवडा बाजारात या वस्तु विकण्यासाठी बसावे लागते़ या वस्तु दगडाच्या असल्याने ग्राहक त्या एकदाच खरेदी करतो, वारंवार घ्याव्या लागत नाहीत़ त्यामुळे रोजच पैसा मिळेल, याची खात्री नसते़ परंतु गेल्या दोन वर्षापासूनच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे दिवसेंदिवस या वस्तुंची मागणी घटली आहे़ तर त्यांनी या उद्योगाबाबत समाधान व्यक्त केले.>आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही ग्रामिण भागात हाताच्या कलेलाही तेवढीच मागणी आहे़ आजचा बाजार भाव वाढत आहे़ वस्तु बनविण्याचा खर्चही जास्त येत असल्याने वस्तुंच्या किंमतीही वाढल्या असल्याचे प्रकाष पवार सांगतात़ त्याप्रमाणे जाते - १००. ते ८००, पाटा-५०० ते ६००, कुंडी-३०० ते ४००,दिवा-२०० ते ३००,खलबत्ता ४०० रुपयांना या वस्तू विकल्या जातात़ परंतु तुटपुज्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने उपाशीपोटी दिवस काढावे लागतात़ पावसाळा तर नुसता बसून घालवावा लागतो अशी खंत पवार यांनी व्यक्त केली़