शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

...त्यांची भटकंती दुष्काळाकडून दुष्काळाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:41 IST

भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास आहे...

- राहुल वाडेकरविक्रमगड : भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास असून औरंगाबाद येथील आपल्या गावी दुष्काळ असल्याने त्यांनी विक्रमगडची वाट धरली होती. मात्र या भागातही दुष्काळ पडल्याने त्यांच्या समस्या वाढल्या आहेत.वाढत्या महागाई व दुष्काळात कसा तग धरुन राहायचा व कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालू लागला आहे. आपली ही व्यथा प्रकाश भिका पवार व दिपक षिराले यांनी लोकमत कडे मांडली. ते सध्या रस्त्यावर आले झोपडे बांधुन वरवंटे, पाटे, उखळ आणि खलबंता विक्री करीत आहेत.आज या गावी तर उद्या त्या अशा जीवनशैैलीमुळे मुलांचे शिक्षण, स्वत:चे घर या गोष्टी तर या लोकांसाठी आज तरी स्वप्नवत आहेत़ मैलोन मैल प्रवासातच त्यांचे अर्धे आयुष्य संपते़. पण वाढत्या महागाईने व गेल्या काही दोन चार वर्षापासून पडलेला दुष्काळ व त्याची वाढत असेलल्या तिव्रतायामुळे यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यापैकी प्रकाश भिका पवार व त्याचें कुंंटुंब गेल्या एक महिनाभरापूर्वी विक्रमगड-आलोंडा शहरात रस्त्याच्या कडेला वास्तव्यास आले आहेत. त्यांनी औरंगाबाद ते आलोंडा असा खाजगी टेम्पो करुन त्यांनी आपल्या वरवंटे, पाटे, उखळ, आणि खलबंते घेऊन प्रवास केला आहे. त्यातच दगड, गाढव, आपले कुटुंब व घरातील सामान असे साहित्य येथे आणले आहेत. महिनाभरात त्यांनी बºयाच दगडी वस्तु बनविलेल्या आहेत व त्या विक्री करण्यास ठेवलेल्या आहे़ गावी दुष्काळ असल्याने ते या भागात आले आहेत. दरम्यान. येथेही दुष्काळ असल्याने त्यांच्या दगडी वस्तु विक्रीची मागणी खुप कमी झाली असल्याचे त्यांनी सांगीतले़हे कुंटुंब दगड फोडुन त्यातून वेगवेगळया वस्तु बनवून दारोदारी भटकत व आठवडा बाजारात त्या वस्तुंची विक्री करुन मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आलेले आहेत. ़हा आपल्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय असुन, आपण तो जोपासला असल्याचे सांगतात़ आज तरी आधुनिक युगात लोक वावरत असले तरी विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा ग्रामीण परिसर असलेल्या तालुक्यांत भागात दगडी वस्तुना मागणी आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी रोजीरोटीसाठी तहान, भूक आदी न बघता पोटासाठी दोन घास मिळावे यासाठी दिवसभर दगड फोडण्याचे काम करावे लागते. दगड फोडतांना त्याचा कस डोळयात अनेकवेळा उडतो कधी कधी त्याचा कचरा मार लागुन डोळा जाण्याचा संभाव असतो. मात्र आता हे आमचे रोजचेच असल्याने तेवढी दक्षता आम्हांस घ्यावी लागते व दुर्लक्षही करावे लागते असे पवार सांगतात.दगडापासून जाते, पाटे, कुंडी, दिवा, कुंभई, भुताळ अशा विविध वस्तू बनवून भटंकती करावी लागते ़त्याचप्रमाणे आठवडा बाजारात या वस्तु विकण्यासाठी बसावे लागते़ या वस्तु दगडाच्या असल्याने ग्राहक त्या एकदाच खरेदी करतो, वारंवार घ्याव्या लागत नाहीत़ त्यामुळे रोजच पैसा मिळेल, याची खात्री नसते़ परंतु गेल्या दोन वर्षापासूनच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे दिवसेंदिवस या वस्तुंची मागणी घटली आहे़ तर त्यांनी या उद्योगाबाबत समाधान व्यक्त केले.>आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही ग्रामिण भागात हाताच्या कलेलाही तेवढीच मागणी आहे़ आजचा बाजार भाव वाढत आहे़ वस्तु बनविण्याचा खर्चही जास्त येत असल्याने वस्तुंच्या किंमतीही वाढल्या असल्याचे प्रकाष पवार सांगतात़ त्याप्रमाणे जाते - १००. ते ८००, पाटा-५०० ते ६००, कुंडी-३०० ते ४००,दिवा-२०० ते ३००,खलबत्ता ४०० रुपयांना या वस्तू विकल्या जातात़ परंतु तुटपुज्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने उपाशीपोटी दिवस काढावे लागतात़ पावसाळा तर नुसता बसून घालवावा लागतो अशी खंत पवार यांनी व्यक्त केली़