शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

...त्यांची भटकंती दुष्काळाकडून दुष्काळाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:41 IST

भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास आहे...

- राहुल वाडेकरविक्रमगड : भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास असून औरंगाबाद येथील आपल्या गावी दुष्काळ असल्याने त्यांनी विक्रमगडची वाट धरली होती. मात्र या भागातही दुष्काळ पडल्याने त्यांच्या समस्या वाढल्या आहेत.वाढत्या महागाई व दुष्काळात कसा तग धरुन राहायचा व कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालू लागला आहे. आपली ही व्यथा प्रकाश भिका पवार व दिपक षिराले यांनी लोकमत कडे मांडली. ते सध्या रस्त्यावर आले झोपडे बांधुन वरवंटे, पाटे, उखळ आणि खलबंता विक्री करीत आहेत.आज या गावी तर उद्या त्या अशा जीवनशैैलीमुळे मुलांचे शिक्षण, स्वत:चे घर या गोष्टी तर या लोकांसाठी आज तरी स्वप्नवत आहेत़ मैलोन मैल प्रवासातच त्यांचे अर्धे आयुष्य संपते़. पण वाढत्या महागाईने व गेल्या काही दोन चार वर्षापासून पडलेला दुष्काळ व त्याची वाढत असेलल्या तिव्रतायामुळे यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यापैकी प्रकाश भिका पवार व त्याचें कुंंटुंब गेल्या एक महिनाभरापूर्वी विक्रमगड-आलोंडा शहरात रस्त्याच्या कडेला वास्तव्यास आले आहेत. त्यांनी औरंगाबाद ते आलोंडा असा खाजगी टेम्पो करुन त्यांनी आपल्या वरवंटे, पाटे, उखळ, आणि खलबंते घेऊन प्रवास केला आहे. त्यातच दगड, गाढव, आपले कुटुंब व घरातील सामान असे साहित्य येथे आणले आहेत. महिनाभरात त्यांनी बºयाच दगडी वस्तु बनविलेल्या आहेत व त्या विक्री करण्यास ठेवलेल्या आहे़ गावी दुष्काळ असल्याने ते या भागात आले आहेत. दरम्यान. येथेही दुष्काळ असल्याने त्यांच्या दगडी वस्तु विक्रीची मागणी खुप कमी झाली असल्याचे त्यांनी सांगीतले़हे कुंटुंब दगड फोडुन त्यातून वेगवेगळया वस्तु बनवून दारोदारी भटकत व आठवडा बाजारात त्या वस्तुंची विक्री करुन मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आलेले आहेत. ़हा आपल्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय असुन, आपण तो जोपासला असल्याचे सांगतात़ आज तरी आधुनिक युगात लोक वावरत असले तरी विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा ग्रामीण परिसर असलेल्या तालुक्यांत भागात दगडी वस्तुना मागणी आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी रोजीरोटीसाठी तहान, भूक आदी न बघता पोटासाठी दोन घास मिळावे यासाठी दिवसभर दगड फोडण्याचे काम करावे लागते. दगड फोडतांना त्याचा कस डोळयात अनेकवेळा उडतो कधी कधी त्याचा कचरा मार लागुन डोळा जाण्याचा संभाव असतो. मात्र आता हे आमचे रोजचेच असल्याने तेवढी दक्षता आम्हांस घ्यावी लागते व दुर्लक्षही करावे लागते असे पवार सांगतात.दगडापासून जाते, पाटे, कुंडी, दिवा, कुंभई, भुताळ अशा विविध वस्तू बनवून भटंकती करावी लागते ़त्याचप्रमाणे आठवडा बाजारात या वस्तु विकण्यासाठी बसावे लागते़ या वस्तु दगडाच्या असल्याने ग्राहक त्या एकदाच खरेदी करतो, वारंवार घ्याव्या लागत नाहीत़ त्यामुळे रोजच पैसा मिळेल, याची खात्री नसते़ परंतु गेल्या दोन वर्षापासूनच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे दिवसेंदिवस या वस्तुंची मागणी घटली आहे़ तर त्यांनी या उद्योगाबाबत समाधान व्यक्त केले.>आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही ग्रामिण भागात हाताच्या कलेलाही तेवढीच मागणी आहे़ आजचा बाजार भाव वाढत आहे़ वस्तु बनविण्याचा खर्चही जास्त येत असल्याने वस्तुंच्या किंमतीही वाढल्या असल्याचे प्रकाष पवार सांगतात़ त्याप्रमाणे जाते - १००. ते ८००, पाटा-५०० ते ६००, कुंडी-३०० ते ४००,दिवा-२०० ते ३००,खलबत्ता ४०० रुपयांना या वस्तू विकल्या जातात़ परंतु तुटपुज्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने उपाशीपोटी दिवस काढावे लागतात़ पावसाळा तर नुसता बसून घालवावा लागतो अशी खंत पवार यांनी व्यक्त केली़