शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मीरा भाईंदर महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत डिजिटल वर्गामुळे वाढ 

By धीरज परब | Updated: January 19, 2023 18:11 IST

मीरा भाईंदर महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत डिजिटल वर्गामुळे वाढ झाली आहे. 

मीरारोड : मीरा भाईंदर महानगरपालिका शाळां मध्ये दिवाळी नंतर डिजिटल वर्ग सुरू करण्यात आल्या मुळे ७७७ विद्यार्थी वाढले असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आदी माध्यमांच्या ३६ शाळा आहेत. महापालिका शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार शिक्षकांच्या बैठका व शाळांना भेटी देणे. शिक्षकांना प्रशिक्षण, शाळेतील वर्गात रंगरंगोटी, विविध संकल्पनेतून साकारण्यात आलेली भित्तीचित्रे, नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके, संगणक कक्ष आदी उपाययोजना प्रशासनाने चालवल्या आहेत .  

दिवाळी सुट्टी नंतर महानगरपालिकेतील शाळांमध्ये डिजिटल स्वरूपात वर्ग सुरू करण्यात आले आहेत. डिजिटल वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती ही चित्रफित किंवा फोटोच्या स्वरूपात शिकवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर डिजिटल वर्ग हे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व सेमी इंग्रजी या भाषेत सुरू करण्यात आले आहेत. 

या डिजिटल वर्गांमुळे महानगरपालिका शाळां मधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. डिजिटल वर्ग सुरू करण्यापूर्वी महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ७ हजार २४८ इतकी होती. डिजिटल वर्ग सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांची पटसंख्या ८ हजार २५ इतकी झाली आहे. डिजिटल वर्ग सुरु झाल्या पासून ७७७ विद्यार्थी वाढले आहेत. शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश करावे असे आवाहन आयुक्त ढोले यांच्या वतीने करण्यात आले आहे . 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMira Bhayanderमीरा-भाईंदरdigitalडिजिटल