शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिला रेल्वे प्रवाशांची कैफियत ठाकूरांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 02:49 IST

वसई रोड स्थानकावरून सकाळी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करून ती १ नोव्हेंबरपासून विरारहून सोडण्यात येत असल्यामुळे सद्या वसईतील महिला प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नालासोपारा - वसई रोड स्थानकावरून सकाळी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करून ती १ नोव्हेंबरपासून विरारहून सोडण्यात येत असल्यामुळे सद्या वसईतील महिला प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारण गेली सहा वर्षे ही लोकल वसई रोडवरून सकाळी ९.५७ वाजता सोडली जात होती. या लोकलमधून कमी प्रवासी प्रवास करतात असा रेल्वेने सर्व्हे करून शोध लावला होता. रेल्वे अधिकारी जुमानत नसल्यामुळे रविवारी या महिला प्रवाशांच्या शिष्टमंडळाने वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत त्यांना ही लोकल पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करा म्हणून विनंती केली. यावेळी आ. क्षितिज ठाकूर हे देखील उपस्थित होते.गेली सहा वर्षे सकाळच्या वेळी वसई रोड स्थानकावरून महिला विशेष लोकल सोडण्यात येत होती. मात्र अचानक ती नोव्हेंबर महिन्यापासून रद्द करण्यात येत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. या विशेष महिला लोकलमधून विरारच्या महिला प्रवाशांनाही प्रवास करता यावा म्हणून ती विरार स्थानकातून १ नोव्हेंबर पासून सोडली जाऊ लागली. मात्र विरार, नालासोपारा स्थानकावरून ती पूर्ण भरून येत असल्यामुळे वसई रोड, नायगांव व भार्इंदर स्थानकावरील महिला प्रवाशांना डब्यात चढताना अग्नीदिव्यातून जावे लागत असे. पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी व रेटारेटीत एका महिलेला अस्थमाच्या अटॅक आल्याने ती गुदमरली होती.महिला प्रवाशांच्या शिष्टमंडळाने याबाबत रविवारी दुपारी आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरार पश्चिम येथील विवा महाविद्यालयातील कार्यालयात भेट घेऊन आपले निवेदन दिले. पश्चिम रेल्वेचे विभागिय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांनाही याबाबत निवेदन दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दोन्ही आमदारांनी याबाबत पुढाकार घेऊन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशी विनंती केली. ठाकूर यांनी याबाबत लवकरच रेल्वेच्या अधिका-यांशी ही महिला विशेष लोकल पूर्ववत वसई रोड स्थानकावरून सोडण्यात यावी म्हणून चर्चा करण्याचे आश्वासन दिले. याबाबत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी संपर्क साधून चर्चा करणार असल्याचे सांगितले.वसईतील महिला प्रवाशांच्या समस्यांबद्दल रेल्वेच्या अधिका-यांसोबत लवकरच या विषयासंदर्भात तोडगा काढण्यासाठी चर्चा करू.ही लोकल पुन्हा वसई रोड स्थानकावरून सुटणारी म्हणून प्रयत्न करू.- हितेंद्र ठाकूर, आमदार वसईरेल्वेने चुकीचा सर्व्हे करून आम्हा महिला प्रवाशांची करुन चेष्टा केली आहे. आमदार ठाकूर यांनी याबाबत पुढाकार घेऊन ही लोकल रद्द करू देऊ नये. ही लोकल सुरू ठेवली गेली तर ती आमच्यासाठी भाऊबीज ठरेल.-अँड.मृदुला खेडेकर, महिला प्रवासी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार