शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘जय श्रीराम’ बोलले नाही म्हणून ठरवले दहशतवादी, प्रवाशाचे ट्वीट; जयपूर एक्स्प्रेसमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 08:59 IST

पोलिसांकडून चारही साधूंची चौकशी

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : ‘जय श्रीराम’ बोलले नाही म्हणून ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या चार साधूंना एका प्रवाशाने दहशतवादी ठरवत पश्चिम रेल्वेच्या हेल्पलाइनवर ट्वीट केले. या ट्वीटनंतर एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी जयपूर- बांद्रा ही ट्रेन पालघर स्थानकात आल्यावर त्या ट्रेनमधून चार साधूंना आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले.  या चारही साधूंचे जबाब लिहून घेत नंतर त्यांना सोडून दिले. परंतु ट्वीट करणारी व्यक्ती वापी स्थानकात उतरल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

दरम्यान, आरपीएफ पोलिसांनी त्या साधूंची अधिक चौकशी केली असता हे साधू पालघर तालुक्यातील वडराई येथील अडगडानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी राजस्थान येथून आल्याचे सांगितले. यावेळी ट्रेन स्थानकात २० मिनिटे थांबवून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी या चारही साधूंचे जबाब लिहून घेत नंतर त्यांना सोडून दिले.

तो प्रवासी वापी स्थानकादरम्यान उतरला

पश्चिम रेल्वेच्या जयपूरवरून बांद्राकडे जाणाऱ्या जयपूर-बांद्रा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये साधूच्या वेशात ‘चार आतंकवादी दिखाई दे रहे है’ अशा आशयाचे ट्वीट आणि फोटो रेल्वे हेल्पलाइनवर ट्रेनमधील एका प्रवाशाने पाठविला होता.

या ट्वीटमुळे रेल्वे प्रशासनाने याची माहिती पालघर आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना दिली. त्यानुसार पालघर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येणार असल्याने पोलिसांनी तत्काळ ट्रेनच्या तपासणीसाठी सर्वत्र मोठा बंदोबस्त लावला.

ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर एक्स्प्रेसमधून साधूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला पोलिसांनी डब्यातील इतर प्रवाशांकडे अधिक चौकशी केल्यानंतर ट्वीट करणारा इसम वापी स्थानकादरम्यान उतरल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवाशाने उलटसुलट प्रश्न विचारले

  • ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने आपल्याशी संवाद साधून अनेक उलटसुलट प्रश्न विचारले. 
  • त्यामुळे आम्ही त्याच्याशी संवाद साधणे बंद केले; परंतु तो आमच्यावर जबरदस्ती करीत ‘जय श्रीराम’ बोलण्याचा आग्रह करू लागला. 
  • आम्ही त्याला कुठलाही प्रतिसाद न दिल्याने त्या प्रवाशाने रेल्वेच्या हेल्पलाइनवर ट्वीट करीत आम्हाला दहशतवादी ठरविले असे एका साधूने ‘लोकमत’ला सांगितले.

राजस्थानचे रहिवासी

  • पोलिसांनी डब्यात बसलेल्या अलखा नंद महाराज (वय ७५), राजाराम बाबा (७८), योगानंद (३४) सह अन्य ४५ वर्षीय साधूंना आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले. 
  • हे चारही साधू राजस्थानमधील रहिवासी असून पॅसेंजर पकडून सवाई माधोपूर स्थानकातून बांद्रा (मुंबई) येथे जाणारी जयपूर बांद्रा एक्स्प्रेस ट्रेन पकडली.
टॅग्स :jaipur-pcजयपूर