शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

शिक्षक हरकामे, शिकवायचे कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:11 IST

तालुक्यात २५० जिल्हा परिषद शाळा असून, बºयाच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या समाधानकारक आहे. परंतु त्या शाळेवर विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उरलेले नाहीत.

हुसेन मेमनजव्हार : तालुक्यात २५० जिल्हा परिषद शाळा असून, बºयाच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या समाधानकारक आहे. परंतु त्या शाळेवर विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उरलेले नाहीत. जव्हार तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक शाळा त्यामुळे बंद केल्या जात आहेत.अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे या भागातील जिल्हा परिषद शाळांवर मोठी संक्रांत आली आहे. पहिली ते ७ वी पर्यंतच्या अनेक शाळांमध्ये फक्त एक अथवा दोनच शिक्षक आहेत. ज्याठिकाणी कमी पट आहे. तेथील शिक्षकांचे शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला समायोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे शिक्षणाचा गाडा बºयापैकी हाकला जात होता. डिसेंबर महिना हा स्पर्धा आणि स्पोकन इंग्रजी प्रशिक्षण, पायाभूत प्रशिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण यात गेला.पुरेसे शिक्षक शाळेवर नसल्याने,मुलांची शालेय प्रगती थांबणार आहे. कार्यालयाकडून रोजच वेगवेगळे फतवे काढून वेगवेगळी माहिती मागविली जात आहे.अनेक शिक्षक निवडणुकीच्या आॅनलाइन कामांमध्ये गुंतलेले आहेत.शाळांची विविध प्रकारची आॅनलाइन कामे करावीत की कार्यालयाला लागणाºया कागदपत्रांची पूर्तता करावी की प्रशिक्षणे पूर्ण करावीत, हे करीत बसलो तर विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे आणि कधी? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.जव्हार जि. प. शाळांतील प्रतिनियुक्त्यांचे पद्धतशीररित्या नियोजन करायचे होते. तर त्यांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच तसे प्रस्ताव पाठवायला पाहिजे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवता आले असते. परंतु त्यांनी योग्य वेळी निर्णय न घेता,आता ऐन शैक्षणिक हंगामात आणि परीक्षा तोंडावर आल्या असताना, प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावहारिकदृष्ट्या हे अतिशय चुकीचे पाऊल आहे.