शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

वाढीव बांधकामांवर कर लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:15 IST

वसई, विरार महापालिकेचा निर्णय : तिजोरीत ५० कोटींची पडणार भर, महिनाभरात प्रक्रिया पूर्ण

वसई : २००९ मध्ये महानगरपालिकेची स्थापन झाली, तेव्हा तिच्यात चार नगर परिषदा आणि ५२ ग्रामपंचायत हद्दीमधील गावांचा समावेश झाला होता. त्यानंतर मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण झाले नव्हते. मात्र आता वाढवलेल्या बांधकामावर महानगरपालिकेने करआकारणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तिच्या तिजोरीत ५० कोटींची भर पडणार आहे.

तिचे पहिले लक्ष्य पेल्हार आणि वालीव प्रभाग समितीमधील औद्योगिक आणि व्यावसायिक बांधकामे आहेत. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने अधिकृत आणि अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. त्यांनी मनमानी अतिक्रमण करून क्षेत्रफळ वाढवून घेतलेले आहे. त्यांच्याकडून नवीन करआकारणी करण्यास सुरुवात केली असल्याचे स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी सांगितले.एका महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. वसई-विरार शहरात ६ लाख ४९ हजार मालमत्ता आहेत. मात्र त्यांचे योग्य करनिर्धारण झाले नसल्याने कोट्यावधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. शहरातील ३० टक्के मालमत्तावर चुकीची करआकारणी होत असल्याचे समोर आले होते. तर अनेक मालमत्तांवर कर आकारणी करण्यात आलेली नाही. महापालिकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षांत मालमत्ता करापोटी २३० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांवर घरगुती दरानेच कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे ते उत्पन्न पालिकेला मिळत नव्हते. सध्याच्या साडेसहा लाख मालमत्तांधील ३० टक्के मालमत्तांवर चुकीची कर आकारणी होत होती. तसेच ज्यांच्या मालमत्ता हजार चौरस फुटांच्या आहेत, त्यांना केवळ ५०० चौरस फुटाप्रमाणेच कर आकारणी होत असल्याचे आढळून येत होते. वालीव आणि पेल्हार प्रभागात अनेक औद्योगिक कंपन्यांनी आपल्या मालमत्तांचे क्षेत्रफळ वाढवले आहे. त्यांचा ते व्यावसायिक वापर करीत आहेत. मात्र महापालिकेला त्यावर जुन्या क्षेत्रफळाप्रमाणे कर आकारत आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नव्या करआकारणीचा आराखडा तयार करण्यात आला असून वाढीव मालमत्ताधारकांकडून वाढीव करआकारणी केली जाणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रीया पूर्ण केली जाणार आहे....तर सहायक आयुक्तांवर कारवाईकर आकारणीचे काम सर्व ९ प्रभाग समतिीमधील साहाय्यक आयुक्तांकडे देण्यात आलेले आहे. नवीन पद्धतीने मालमत्तांवर कर आकारणी करण्यात आलेली आहे की नाही, त्याची पाहणी केली जाणार आहे. त्यात जर मेहेरबानी करून कोणाला वगळले असल्यास संबंधित साहाय्यक आयुक्तांवर बडगा उगारला जाणार आहे. यात ग्रामपंचायत काळातील गावांमधील अनेक घरांचे आता इमले झालेले आहेत. मात्र त्यांच्याकडून ग्रामपंचायत काळापासूनचा कर आकारला जात आहे. अशा नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन आपले वाढीव क्षेत्रफळ जाहीर करावे असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार