शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

वंचित महिलांच्या तालमींना आला वेग

By admin | Updated: March 24, 2017 00:57 IST

वंचित समूहांना त्यांच्या समस्यांना, त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने समता विचार प्रसारक संस्थेतर्फे

ठाणे : वंचित समूहांना त्यांच्या समस्यांना, त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने समता विचार प्रसारक संस्थेतर्फे दरवर्षी ‘वंचितांच्या रंगमंचा’चे आयोजन केले जाते. यंदा वंचित महिलांचा नाट्यजल्लोष रविवार, २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. टाउन हॉल येथील खुल्या रंगमंचावर सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाण्यातील विविध वस्त्यांमधून गटबांधणीचे काम सुरू असून तालमींनाही वेग आला आहे. या वेळी ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर मीनाक्षी शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आतापर्यंत माजिवडा, मनोरमानगर, सावरकरनगर, नवशिवाई कम्पाउंड, लोकमान्यनगर, किसननगर असे गट तयार झाले आहेत. त्यांच्या नाटिकांचे विषय ठरून आता त्यांच्या तालमींनाही सुरुवात झाली आहे. या अनोख्या उपक्रमात १५ पासून ७५ पर्यंतच्या गरीब वस्त्यांमधील महिला सहभागी होणार असून त्यांच्या नाटकांच्या विषयांत या वर्गातील स्त्रियांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांना आलेल्या अनुभवांचा समावेश आहे. हुंड्याची समस्या, नवऱ्याचा जाच, मुलीच्या जन्माचा आग्रह, परित्यक्ता स्त्रीची व्यथा, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण अशा महिलांना भिडणाऱ्या अनेक विषयांवर नाटिका सादर होणार आहेत. या कार्यक्र मासाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी, प्रतिभा मतकरी, माजी महापौर संजय मोरे, विद्यमान पालिका सभागृह नेते नरेश म्हस्के, ज्येष्ठ रंगकर्मी मकरंद अनासपुरे, उदय सबनीस, विजू माने, अजेय संस्थेचे क्षितिज कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लतिका सु.मो., जगदीश खैरालिया, हर्षलता कदम आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)