शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भरती परीक्षा पोर्टलऐवजी समितीमार्फत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:21 IST

नोकर भरती परीक्षा आॅफलाईन पद्धतीने जिल्हा निवड समिती मार्फत घेण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना निवेदन देऊन केली आहे.

वाडा : सरकारी सेवेतील कर्मचारी भरतीसाठी चालविले जाणारे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात यावे व सर्व नोकर भरती परीक्षा आॅफलाईन पद्धतीने जिल्हा निवड समिती मार्फत घेण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना निवेदन देऊन केली आहे.या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रचंड अव्यवस्था, गलथानपणा आणि अपारदर्शकता आढळून आली आहे. त्यामुळे लाखो तरु णांचे भवितव्य अंधारात लोटले जात आहे. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बैठक क्रमांकानुसार बसविले जात नाही. परिणामी सामूहिक कॉपीला प्रोत्साहन मिळते. सेक्शनल आणि कट आॅफ नॉर्मलायझेशन या पध्दतीचा अभाव पोर्टलवर दिसून येतो.परीक्षेची वेळ संपल्यावरही फएछडॠकठ होणे. त्यामुळे परीक्षा झाल्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कमी व जास्त करता येऊ शकतात. इतर स्पर्धा परिक्षांनमधे विद्यार्थ्यांस वैयक्तिक उत्तरिपत्रका (रीस्पांन्स शिट) देते. पण, पोर्टलची ही पध्दत नसल्याने हा कारभार पारदर्शी नसल्याच्या तक्र ारी वाढू लागल्या आहेत.आगामी काळात ७२ हजार जागांची मेगा भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणार आहे. ती अशाच प्रकारे झाली तर राज्यातील तरु णांचे भविष्य धोक्यात येईल. हे पोर्टल रद्द करून सर्व परीक्षा आॅफलाइन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.महापोर्टल द्वारे अनेक परीक्षात गोंधळ कृषी सेवक, महाबीज, अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा या कंपनीने परीक्षेचे तिन तेरा वाजवले आहेत. एका प्रश्नपत्रिकेत चक्क सैराट व मुंबई ङ्क्त पुणे मुंबई या चित्रपटाच्या अभिनेत्रींचे नाव विचारल्याचे समोर आले आहे.प्रश्नपत्रिकेत गोंधळ असताना तांत्रिक व शैक्षणिक बाबतीतही या महापोर्टलने अजब गोंधळ उडवून दिलेले आहेत. त्यामुळे हे पोर्टल बंद करून परीक्षा आॅफलाईन घेण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री विष्णु सवरा यांच्याकडे करण्यात आली.।कृषीसेवक, महाबीज, अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी, नगर परिषद व नगरपंचायत या परीक्षेत मोठा गोंधळ घातला असून याचा फटका स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करून नोकरभरती परीक्षा आॅफलाइन घेण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे.- अमोल सांबरे, उपाध्यक्ष, पदविकाधारक संघर्ष समिती।महापरीक्षा पोर्टल शासनाने त्वरीत बंद करावे व परीक्षा पारदर्शक पद्धतीने आॅफलाईन घेण्यात याव्यात अन्यथा स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना सोबत घेऊन महापरीक्षा पोर्टल विरोधात आंदोलन तीव्र करू.राहुल पाटीलपालघर जिल्हाअध्यक्ष,>मागील परीक्षेमध्ये झालेला गोंधळ काय आहेत पोर्टलविरोधात तक्र ारीपरीक्षेची वेळ संपल्यावरही फएछडॠकठ होणे. त्यामुळे परीक्षा झाल्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कमी व जास्त करता येऊ शकतात.परीक्षा केंद्रावर बैठक व्यावस्था जवळ जवळ असल्याने सामुहिक कॉपी प्रकार काही सेन्टरवर घडत आहेत.परीक्षा केंद्र सुविधा नसलेले होते, विद्यार्थी संख्येनुसार संगणक नसणे, संगणक मध्येच बंद पडणे, खाजगी केंद्रावर परीक्षा घेणे.परीक्षा झाल्यावर उत्तर पत्रिका (रीस्पांन्सशिट) न देणे मागणी करून ही देण्यास टाळाटाळ करणे.नॉर्मलायाझेशन न करणे, किवा कोणत्याही प्रकारची दर्जेदार प्रक्रि या नसणे.चुकीचे प्रश्न विचाराने व तक्र ार केल्यास दखल न घेणे.विदार्थ्यांच्या उत्तर पत्रिका अ‍ॅटोमॅटिकली सिस्टीम जनरेटेड नसणे.बैठक व्यवस्था पुरेशी नसल्याने एकच पेपर वेगवेगळ्या वेळेत घेतल्याने प्रश्निपत्रका फुटीचे प्रकार घडतात.उत्तर पित्रकेतील प्रश्न क्र मांक बदलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.