शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

भरती परीक्षा पोर्टलऐवजी समितीमार्फत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:21 IST

नोकर भरती परीक्षा आॅफलाईन पद्धतीने जिल्हा निवड समिती मार्फत घेण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना निवेदन देऊन केली आहे.

वाडा : सरकारी सेवेतील कर्मचारी भरतीसाठी चालविले जाणारे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात यावे व सर्व नोकर भरती परीक्षा आॅफलाईन पद्धतीने जिल्हा निवड समिती मार्फत घेण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना निवेदन देऊन केली आहे.या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रचंड अव्यवस्था, गलथानपणा आणि अपारदर्शकता आढळून आली आहे. त्यामुळे लाखो तरु णांचे भवितव्य अंधारात लोटले जात आहे. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बैठक क्रमांकानुसार बसविले जात नाही. परिणामी सामूहिक कॉपीला प्रोत्साहन मिळते. सेक्शनल आणि कट आॅफ नॉर्मलायझेशन या पध्दतीचा अभाव पोर्टलवर दिसून येतो.परीक्षेची वेळ संपल्यावरही फएछडॠकठ होणे. त्यामुळे परीक्षा झाल्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कमी व जास्त करता येऊ शकतात. इतर स्पर्धा परिक्षांनमधे विद्यार्थ्यांस वैयक्तिक उत्तरिपत्रका (रीस्पांन्स शिट) देते. पण, पोर्टलची ही पध्दत नसल्याने हा कारभार पारदर्शी नसल्याच्या तक्र ारी वाढू लागल्या आहेत.आगामी काळात ७२ हजार जागांची मेगा भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणार आहे. ती अशाच प्रकारे झाली तर राज्यातील तरु णांचे भविष्य धोक्यात येईल. हे पोर्टल रद्द करून सर्व परीक्षा आॅफलाइन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.महापोर्टल द्वारे अनेक परीक्षात गोंधळ कृषी सेवक, महाबीज, अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा या कंपनीने परीक्षेचे तिन तेरा वाजवले आहेत. एका प्रश्नपत्रिकेत चक्क सैराट व मुंबई ङ्क्त पुणे मुंबई या चित्रपटाच्या अभिनेत्रींचे नाव विचारल्याचे समोर आले आहे.प्रश्नपत्रिकेत गोंधळ असताना तांत्रिक व शैक्षणिक बाबतीतही या महापोर्टलने अजब गोंधळ उडवून दिलेले आहेत. त्यामुळे हे पोर्टल बंद करून परीक्षा आॅफलाईन घेण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री विष्णु सवरा यांच्याकडे करण्यात आली.।कृषीसेवक, महाबीज, अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी, नगर परिषद व नगरपंचायत या परीक्षेत मोठा गोंधळ घातला असून याचा फटका स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करून नोकरभरती परीक्षा आॅफलाइन घेण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे.- अमोल सांबरे, उपाध्यक्ष, पदविकाधारक संघर्ष समिती।महापरीक्षा पोर्टल शासनाने त्वरीत बंद करावे व परीक्षा पारदर्शक पद्धतीने आॅफलाईन घेण्यात याव्यात अन्यथा स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना सोबत घेऊन महापरीक्षा पोर्टल विरोधात आंदोलन तीव्र करू.राहुल पाटीलपालघर जिल्हाअध्यक्ष,>मागील परीक्षेमध्ये झालेला गोंधळ काय आहेत पोर्टलविरोधात तक्र ारीपरीक्षेची वेळ संपल्यावरही फएछडॠकठ होणे. त्यामुळे परीक्षा झाल्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कमी व जास्त करता येऊ शकतात.परीक्षा केंद्रावर बैठक व्यावस्था जवळ जवळ असल्याने सामुहिक कॉपी प्रकार काही सेन्टरवर घडत आहेत.परीक्षा केंद्र सुविधा नसलेले होते, विद्यार्थी संख्येनुसार संगणक नसणे, संगणक मध्येच बंद पडणे, खाजगी केंद्रावर परीक्षा घेणे.परीक्षा झाल्यावर उत्तर पत्रिका (रीस्पांन्सशिट) न देणे मागणी करून ही देण्यास टाळाटाळ करणे.नॉर्मलायाझेशन न करणे, किवा कोणत्याही प्रकारची दर्जेदार प्रक्रि या नसणे.चुकीचे प्रश्न विचाराने व तक्र ार केल्यास दखल न घेणे.विदार्थ्यांच्या उत्तर पत्रिका अ‍ॅटोमॅटिकली सिस्टीम जनरेटेड नसणे.बैठक व्यवस्था पुरेशी नसल्याने एकच पेपर वेगवेगळ्या वेळेत घेतल्याने प्रश्निपत्रका फुटीचे प्रकार घडतात.उत्तर पित्रकेतील प्रश्न क्र मांक बदलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.