शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

सेवगा गडाने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:14 IST

पालघर जिल्ह्यातील विविध चार संघटनेचे ५५ तरुण सहभागी

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्यातील करंजवीरा जवळील सेवगा गडाचे संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातील चार विविध संघटनेतील दुर्गमित्रांनी एकत्र येऊन मोहीम राबविली. गत दीडशे वर्षांपासून व्यवस्थे आभावी जिर्णता आलेल्या या शिवकालिन गडावर राबविलेली ही आठवी मोहिम असून यावेळी माती खाली गाडल्या गेलेल्या पाण्याच्या टाक्या व त्यांचे झरे मोकळे करण्यात आले.डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गलगत करंजवीरा जवळ हा प्राचीन शिव कालीन किल्ला आहे. तेथे जाण्यासाठी आंबोली व ओसरविरा गावा जवळून जाण्यासाठी रस्ता आहे. दीड ते दोन किमी अंतर पार करत एक ते दीड तासाने गडावर जाता येते. गडावर शिवकालीन शिवमंदिर आहे. परिसरातील नागरिक दर नारळी पौर्णिमेला तेथे मोठया प्रमाणावर पूजेसाठी जातात.किल्ले वसई मोहीम परिवार, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, स्वामी समर्थ केंद्र सफाळे, समस्त दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र या चार दुर्गसंवर्धक संस्थानीं एकत्र येत सेवगागड प्राचीन टाक्या (कुंड) स्वच्छता मोहीम राबविली. ही मोहिमेत विरार नायगाव वसई सफाळे, पालघर व डहाणू भागातील एकूण ५५ दुर्गमित्र सहभागी झालेले होते. या ठिकाणी एकूण सात टाके (कुंड) असून दुर्गमित्रांनी प्राचीन अनघड टाके (कुंड) व वनस्पती टाके (कुंड) संवर्धनासाठी श्रमदान केले.या मोहिमेची सुरुवातील दुर्गमित्रांनी इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांचे मार्गदर्शन घेतले. यात प्राचीन टाके, शिवकालीन बालेकिल्ला व्यवस्था, आज्ञापत्र व दुर्गबांधणी, माची दरवाजा, मुख्य महादरवाजा मार्ग, माची बुरु ज, श्री शिवमंदिर, श्री हनुमान मंदिर आदी स्थळांवर राऊत यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुर्गिमत्रांनी बालेकिल्ला बुरु जाच्या खालील अंगास असणाऱ्या अनघड टाके स्वच्छता मोहिमेत ५००० हुन अधिक घमेली मातीचा गाळ, चिखल, दगड कुंडातून बाहेर काढला.ही अनघड टाके (कुंड) गेली किमान १५० वर्ष मातीच्या गाळाखाली बंदीस्त होत आलेली होती. दुर्गमित्रांनी गडाचे अस्तित्व राखण्याच्या उद्देशाने व गडावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी चिकाटीने श्रमदान केले. या मोहिमेतील गाळात कोणतेही ऐतिहासिक अवशेष प्राप्त झाले नाहीत. या टाक्यांची (कुंडाची) पाण्याची क्षमता सुमारे ४० हजार लीटर इतकी आहे. श्रमदानाच्या दुसºया सत्रात दुर्गमित्रांनी आणखी एक वनस्पती टाके (कुंड) स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.गडाच्या संवर्धनासाठी ही आठवी मोहिमही मोहिम राबवित असताना दुर्गमित्रांनी गडावर काही फळझाडांचे रोपण केले. आजच्या संवर्धन मोहिमेचे नेतृत्व आतिष पाटील व जयदीप चौधरी यांनी केले. अपरिचित सेवगा गडाच्या संवर्धनासाठी ही आठवी मोहीम होती.यावेळी पालघर जिल्ह्यातील दुर्गसंवर्धन व अभ्यास मोहिमेत गेली १५ वर्ष सातत्याने योगदान देणाºया किल्ले वसई मोहीम परिवार व सिद्देश गजानन म्हात्रे परिवाराचा युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर अंतर्गत सत्कार करण्यात आला.या मोहिमेसाठी स्थानिक दर्गमित्र व शिवसेना तालुका प्रमुख संतोष वझे यांनी सकाळचा अल्पोपहार व वृक्षारोपणासाठी झाडे उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता स्वराज्याच्या वीरांना मानवंदना देऊन करण्यात आले.

टॅग्स :FortगडVasai Virarवसई विरार