शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

सेवगा गडाने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:14 IST

पालघर जिल्ह्यातील विविध चार संघटनेचे ५५ तरुण सहभागी

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्यातील करंजवीरा जवळील सेवगा गडाचे संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातील चार विविध संघटनेतील दुर्गमित्रांनी एकत्र येऊन मोहीम राबविली. गत दीडशे वर्षांपासून व्यवस्थे आभावी जिर्णता आलेल्या या शिवकालिन गडावर राबविलेली ही आठवी मोहिम असून यावेळी माती खाली गाडल्या गेलेल्या पाण्याच्या टाक्या व त्यांचे झरे मोकळे करण्यात आले.डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गलगत करंजवीरा जवळ हा प्राचीन शिव कालीन किल्ला आहे. तेथे जाण्यासाठी आंबोली व ओसरविरा गावा जवळून जाण्यासाठी रस्ता आहे. दीड ते दोन किमी अंतर पार करत एक ते दीड तासाने गडावर जाता येते. गडावर शिवकालीन शिवमंदिर आहे. परिसरातील नागरिक दर नारळी पौर्णिमेला तेथे मोठया प्रमाणावर पूजेसाठी जातात.किल्ले वसई मोहीम परिवार, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, स्वामी समर्थ केंद्र सफाळे, समस्त दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र या चार दुर्गसंवर्धक संस्थानीं एकत्र येत सेवगागड प्राचीन टाक्या (कुंड) स्वच्छता मोहीम राबविली. ही मोहिमेत विरार नायगाव वसई सफाळे, पालघर व डहाणू भागातील एकूण ५५ दुर्गमित्र सहभागी झालेले होते. या ठिकाणी एकूण सात टाके (कुंड) असून दुर्गमित्रांनी प्राचीन अनघड टाके (कुंड) व वनस्पती टाके (कुंड) संवर्धनासाठी श्रमदान केले.या मोहिमेची सुरुवातील दुर्गमित्रांनी इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांचे मार्गदर्शन घेतले. यात प्राचीन टाके, शिवकालीन बालेकिल्ला व्यवस्था, आज्ञापत्र व दुर्गबांधणी, माची दरवाजा, मुख्य महादरवाजा मार्ग, माची बुरु ज, श्री शिवमंदिर, श्री हनुमान मंदिर आदी स्थळांवर राऊत यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुर्गिमत्रांनी बालेकिल्ला बुरु जाच्या खालील अंगास असणाऱ्या अनघड टाके स्वच्छता मोहिमेत ५००० हुन अधिक घमेली मातीचा गाळ, चिखल, दगड कुंडातून बाहेर काढला.ही अनघड टाके (कुंड) गेली किमान १५० वर्ष मातीच्या गाळाखाली बंदीस्त होत आलेली होती. दुर्गमित्रांनी गडाचे अस्तित्व राखण्याच्या उद्देशाने व गडावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी चिकाटीने श्रमदान केले. या मोहिमेतील गाळात कोणतेही ऐतिहासिक अवशेष प्राप्त झाले नाहीत. या टाक्यांची (कुंडाची) पाण्याची क्षमता सुमारे ४० हजार लीटर इतकी आहे. श्रमदानाच्या दुसºया सत्रात दुर्गमित्रांनी आणखी एक वनस्पती टाके (कुंड) स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.गडाच्या संवर्धनासाठी ही आठवी मोहिमही मोहिम राबवित असताना दुर्गमित्रांनी गडावर काही फळझाडांचे रोपण केले. आजच्या संवर्धन मोहिमेचे नेतृत्व आतिष पाटील व जयदीप चौधरी यांनी केले. अपरिचित सेवगा गडाच्या संवर्धनासाठी ही आठवी मोहीम होती.यावेळी पालघर जिल्ह्यातील दुर्गसंवर्धन व अभ्यास मोहिमेत गेली १५ वर्ष सातत्याने योगदान देणाºया किल्ले वसई मोहीम परिवार व सिद्देश गजानन म्हात्रे परिवाराचा युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर अंतर्गत सत्कार करण्यात आला.या मोहिमेसाठी स्थानिक दर्गमित्र व शिवसेना तालुका प्रमुख संतोष वझे यांनी सकाळचा अल्पोपहार व वृक्षारोपणासाठी झाडे उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता स्वराज्याच्या वीरांना मानवंदना देऊन करण्यात आले.

टॅग्स :FortगडVasai Virarवसई विरार