शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

वसईच्या ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार करण्यात यंत्रणेला आले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:08 IST

coronavirus news : ग्रामीण भागातून नऊ महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनामुक्तीची बातमी ऐकायला मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पारोळ : मे ते ऑक्टोबरपर्यंत वसई-विरारमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोनाला हद्दपार करण्यात वसईच्या ग्रामीण भागाला यश आले आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने ही दिलासादायक बाब ठरली आहे.साधारणत: एप्रिल-मे महिन्यात वसई-विरारमध्ये कोरोना वेगाने पसरत असताना ग्रामीण भागाला त्याची झळ बसली नव्हती. मात्र, जूनमध्ये टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. ऑक्टोबरपर्यंत ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर शहरी भागातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर होता. मात्र, दिवाळीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. आता पुन्हा शहरी भागातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. लवकरच शहरी भागही कोरोनामुक्त होईल, अशी आशा वसईकरांना वाटते. दरम्यान, वसई पूर्व ग्रामीण भागात आतापर्यंत एक हजार ३६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात ४९ जणांचा बळी गेला आहे. तर उपचार घेत असलेले एक हजार ३१८ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी पोहोचले आहेत. ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोना नष्ट झाला असला तरी ग्रामीण भागातून शहरी भागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरी भागात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. तर ग्रामीण भागातून नऊ महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनामुक्तीची बातमी ऐकायला मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस