शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार करण्यात यंत्रणेला आले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:08 IST

coronavirus news : ग्रामीण भागातून नऊ महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनामुक्तीची बातमी ऐकायला मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पारोळ : मे ते ऑक्टोबरपर्यंत वसई-विरारमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोनाला हद्दपार करण्यात वसईच्या ग्रामीण भागाला यश आले आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने ही दिलासादायक बाब ठरली आहे.साधारणत: एप्रिल-मे महिन्यात वसई-विरारमध्ये कोरोना वेगाने पसरत असताना ग्रामीण भागाला त्याची झळ बसली नव्हती. मात्र, जूनमध्ये टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. ऑक्टोबरपर्यंत ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर शहरी भागातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर होता. मात्र, दिवाळीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. आता पुन्हा शहरी भागातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. लवकरच शहरी भागही कोरोनामुक्त होईल, अशी आशा वसईकरांना वाटते. दरम्यान, वसई पूर्व ग्रामीण भागात आतापर्यंत एक हजार ३६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात ४९ जणांचा बळी गेला आहे. तर उपचार घेत असलेले एक हजार ३१८ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी पोहोचले आहेत. ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोना नष्ट झाला असला तरी ग्रामीण भागातून शहरी भागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरी भागात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. तर ग्रामीण भागातून नऊ महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनामुक्तीची बातमी ऐकायला मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस