शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मेमु न थांबवणारा मोटरमन निलंबित,उमरोलीतील प्रकार, प्रवाशांचा संताप अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:32 IST

पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून पहाटे सुटलेली ६९१६४ ही डहाणू - पनवेल मेमु गाडी उमरोली रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा असताना मोटरमन ने आज (सोमवारी) सकाळी न थांबवता पुढे नेली. ह्या प्रकरणी मोटरमन प्रशांत जेना ह्यांना वसई स्टेशनला उतरवून सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

- हितेन नाईकपालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून पहाटे सुटलेली ६९१६४ ही डहाणू - पनवेल मेमु गाडी उमरोली रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा असताना मोटरमन ने आज (सोमवारी) सकाळी न थांबवता पुढे नेली. ह्या प्रकरणी मोटरमन प्रशांत जेना ह्यांना वसई स्टेशनला उतरवून सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान डहाणू रेल्वे स्थानकातून सुटलेली पनवेल मेमु ही ५:५५ मिनिटांनी नियमित वेळेनुसार उंमरोळी स्थानकात येणार असल्याने शेकडो विद्यार्थी, चाकरमानी, छोटे व्यावसायिक आदी वाट पहात होते. मात्र ही गाडी न थांबताच पुढे निघून गेली. आणि प्रवाशांचा एकच कल्लोळ सुरू झाला. मेमु गाडीचे गार्ड बिपीन पटेल ह्यांनी घेतलेला इमर्जन्सी ब्रेक आणि त्याचवेळी प्रवाशांनी ही चेन पुलिंग केल्याने सदर गाडी उमरोली स्थानका पासून सुमारे 1 किमी लांब पेट्रोल पंपा जवळ थांबली. आणि काही वेळाने पालघर कडे मार्गस्थ झाली.मेमु पुढे निघून गेल्याचे समजताच उमरोली गावातून शेकडो ग्रामस्थ स्टेशनवर जमा झाले. ह्यावेळी डहाणू हुन मुंबई कडे जाणारी अंधेरी लोकल प्रवाशां सह स्थानिकांनी काही काळ रोखून धरत आंदोलन केले. उंमरोळी रेल्वे स्थानक प्रशासनाने या बद्दल प्रवाश्याकडे दिलिगरी व्यक्त केल्याने प्रवाश्याना तूर्तास आंदोलन मागे घेतले. ही मेमु गाडी चुकल्याने अनेक चाकरमान्यांना रोजगाराचा तर विद्यार्थ्यांची शाळा चुकल्याचे त्यांना त्याचा फटका बसला आहे.या घटने नंतर डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी, उपाध्यक्ष महेश पाटील, सहसचिव प्रथमेश प्रभूतेंडोलकर, उमरोली सरपंच पाटील, अनिल तरे आदींनी पालघर रेल्वे स्थानकात जाऊन स्टेशन प्रबंधक सी. एच. कोहली ह्यांची भेट घेत त्यांच्या कडे तक्र ार केली आहे. दरम्यान, प्रवासी सेवा संघटनेने पश्चिम रेल्वेचे डीआरएम मुकुल जैन ह्याच्या कडे सोशल मीडिया वरून तक्र ार केल्यानंतर मेमु गाडी वसई स्टेशनला थांबल्यानंतर मोटरमन प्रशांत जेना ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करताना त्याच्या कडून गाडीचा ताबा काढून घेत त्यांना निलंबित केल्याचा मेसेज आला. त्याला स्टेशन प्रबंधक कोहली ह्यांनीही दुजोरा दिला आहे.प्रवाशांची फसवणूकउमरोळी रेल्वे स्टेशन ची उभारणी २८ मे २००० साली करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने वैतरणा ते डहाणू पर्यंतच्या भागाला उपनगरीय रेल्वेचा दर्जा बहाल केला असून मोठ्या प्रमाणात उपनगरीय कर वसूल केला जात आहे.रेल्वे अ‍ॅक्ट नुसार उमरोळी स्टेशन मधून वर्षाकाठी १२ लाख ५० हजाराचे उत्पन्न आणि महिन्याला ४४ हजाराचा उपनगरीय कर वसूल केला जात असताना ह्या स्टेशन मध्ये रेल्वे प्रशासनाने एकही अधिकृत अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती केलेली नाही.ह्या स्टेशन मधून सर्व स्टेशनची तिकिटे मिळण्याची व्यवस्था आणि युटीएस सिस्टिम आदी सुविधा उपलब्ध करून दिली जात नाहित. परिणामी इथल्या प्रवाश्यांना ५ ते ६ किमीचे अंतर कापून एकतर बोईसर अथवा पालघर स्टेशन गाठावे लागत आहे.शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सोयीसुविधा बाबत तर बोंब असून अनेक तक्र ारी करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याचे उमरोळीचे अनिल तरे ह्यांनी सांगितले. नियमानुसार ह्या स्टेशन ला ‘सी’ दर्जा बहाल तशा सुविधा दिल्या जात नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार