शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सूर्या धरण, परिसराची सुरक्षितता धोक्यात

By admin | Updated: February 1, 2017 02:57 IST

पालघर जिल्हयातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वसई तालुक्यातील गावांची तहान भागविणाऱ्या सूर्या धरणाची सुरक्षितता ५ कोटी ६५ लाखांचे वीज बिल थकल्याने धोक्यात आली आहे.

- शशिकांत ठाकूर, कासापालघर जिल्हयातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वसई तालुक्यातील गावांची तहान भागविणाऱ्या सूर्या धरणाची सुरक्षितता ५ कोटी ६५ लाखांचे वीज बिल थकल्याने धोक्यात आली आहे. १० दिवसापासून वीजपुरवठा खंडीत केल्याने धरणावर अंधार आहे.सूर्या प्रकल्पाचे सन २०१३ पासूनच्या ४ वर्षाचे ५ कोटी ६२ लाख विजबिल थकीत आहे. यामध्ये २ कोटी ४० लाख निव्वळ वीजबिल आहे. तर त्या वरील विलंब आकार ३ कोटी २२ लाख एवढा आहे. यामध्ये जानेवारी २००२ पासूनच्या वीज बिलावरील ही विलंब आकारही आहे. महावितरणकडून २१ जानेवारी रोजी वीज कनेक्शन खंडीत केले आहे. त्यामुळै सूर्या प्रकल्पातील सूर्या धरण, धामणी कवडास धरण व सूर्या वसाहतीत अंधार आहे. सूर्या कर्मचारी वसाहतीचा पाणीपुरवठा विजेअभावी बंद पडला आहे. दरम्यान वीज नसल्याने सूर्या धरणावर अंधार आहे. त्यामुळे धरणावरील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना अंधारात रहावे लागते. सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणावर उभारण्यात आलेले ३० पथदिवे धरणाच्या दोनही बाजूने व प्रवेशव्दार व पायथ्याशी उभारण्यात आलेले ६ टॉवर लाईट बंद आहेत.सूर्या प्रकल्पातून उन्हाळयात सुमारे १०० गावातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. त्याच प्रमाणे वसई, विरार महानगरपालिका, पालघर व डहाणू नगरपरिषद, बोईसर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) तारापूर उर्जा प्रकल्प, डहाणू थर्मल पॉवर, टॅम्स कॉलनी आदी ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपट्टीतून शासनास वर्षाकाठी सुमारे २० कोटी महसूल मिळतो. मात्र तरीही वेळोवेळी वीजबिल भरले जात नाही. विशेष बाब म्हणजे धरणाच्या पायथ्याशी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे जलविद्युत केंद्र आहे. तेथे ६ मॅगावॅट वीज निर्मिती केली जाते. मात्र वितरण कंपनी वेगळी असल्याने वीजनिर्मिती होत असतांनाही तेथे वीज दिली जात नाही. धरण परिसरात जंगल असल्याने मोठया प्रमाणात विषारी साप आढळतात त्यामुळे रात्री अपरात्री कर्मचाऱ्यांना भीतीदायक वातावरणात राहावे लागते. तसेच वीज नसल्याने काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने सदर बाब गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. येथे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जलसंपदाखात्याला जाग येणार आहे काय? (वार्ताहर)१७ नोव्हेंबर पासून शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार सूर्या प्रकल्पाची पाणीपट्टी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे जमा केली जात असून तेथून लवकरच वीजबिल भरले जाईल.-निलेश दुसाने, कार्यकारी अभियंता सूर्या प्रकल्प