शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्या’चे १०० एमएलडी पाणी एप्रिलपासून

By admin | Updated: March 31, 2017 05:35 IST

वसई विरारच्या पाणी टंचाईवर मात करणाऱ्या सूर्या टप्पा तीनचे काम अंतिम टप्यात असून एप्रिलपासून दररोज शंभर एमएलडी

शशी करपे / वसईवसई विरारच्या पाणी टंचाईवर मात करणाऱ्या सूर्या टप्पा तीनचे काम अंतिम टप्यात असून एप्रिलपासून दररोज शंभर एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा सुुरु होईल अशी ग्वाही महापालिकेने दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना विविध अडथळयांची शर्यत पार करीत अंतिम टप्यात पोहचली असतांनाच ७० मीटर लांबीच्या दगडाचा अडसर काही दिवसात दूर झाल्यानंतर वसई विरारसह ६९ गावांना पाणी पुरवठा होणार आहे.सध्या वसई विरार शहराला उसगाव, पेल्हार, पापडखिंड आणि सूर्यातून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. सध्याची लोकसंख्या लक्षात घेता वसई विरारला आणखी ९२ एमएमलडी पाण्याची गरज आहे. ती गरज भागवण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सूर्या टप्पा तीन योजनेतून शंभर एमएलडी पाणी पुरवठा योजना मंजुरी करून घेतली होती. नगरोत्थान योजनेतून या योजनेला मंजुरी ंिमळाली असून त्यासाठी २९६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यातील १३० कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या कामाला २०१४ रोजी सुरुवात करण्यात आली होती. १ मार्च २०१५ पर्यंत योजना पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरु होणार होता. मात्र, त्यात अनेक अडथळे आल्याने ही योजना दोन वर्षे रखडून पडली होती. सुरुवातीली वनखात्याने हरकत घेतल्याने योजनेचे काम सुरु होऊ शकले नाही. वनखात्याच्या १९ किलोमीटरच्या जागेतून जलवाहिन्या जाणार असल्याने आणि त्यावर ११०० झाडे असल्याने आक्षेप घेतला होता. या मोबदल्यात महापालिकेने वनखात्याला पोलादपूर येथे पर्यायी जागा दिली होती. पण, संपूर्ण जागा नावावर झाल्याशिवाय झाडे कापणार नाही अशी भूमिका वनखात्याने त्यानंतर घेतली होती. झाडे कापण्यासाठी महापालिकेने वनखात्याकडे १ कोटी रुपये जमाही केले होते. पण, अवघा ४० गुंठ्याचा सातबारा नावावर न झाल्याने वनखात्याने खोडा घातला होता. महसूलचा सर्व्हर डाऊन झाल्याने सातबारा नावावर होण्यास विलंब झाला होता. तो नावावर झाल्यानंतर वनखात्याचा अडसर दूर झाला होता.मध्यंतरी वनखात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर हरित लवादाने आक्षेप घेतला होता. काही क्षेत्र संरक्षित वनांतर्गत राखीव असल्याने शोभा फडणवीस यांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती. फडणवीस आणि हरित लवादाचा अडसर दूर करण्यासाठी काही महिने वाया गेले होते. हे अडथळे पार करीत योजना पुढे सरकली आहे. आता काही दिवसांचा कालावधी राहिला असतांनाचा ७० मीटरच्या दगडाने खोडा घातला आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर वरई येथे बोगदा खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुुरु असताना त्याठिकाणी ७० मीटरचा दगड लागला आहे. या दगडातून बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अत्याधुनिक बोगदा तयार करून त्यातून पाईपलाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील ही माहिती बविआचे नेते जीतूभाई शहा यांनी दिली. त्यासाठी महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे आपल्या टीमसह याच कामात लागले आहेत. त्यांच्यासोबत बहुजन आघाडीचे नगरसेवक अजीव पाटील, प्रफुल्ल साने यांच्यासह विविध पदाधिकारी त्याठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. पालघरच्या विरोधाचे कायवसई विरार आणि मीरा भाईंदर शहरांना सूर्यातून पाणी देण्यास पालघरमधील सर्वपक्षीयांनी विरोधाचा सूर लावला आहे. त्यासाठी काही पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाढीव शंभर एमएलडी पाणी पुरवठा योजना अंतिम टप्यात आली असतांना आणि प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुुरु होणार असतानाच पालघरमधून विरोधाचे सूर उमटल्याने कोंडी होणार आहे. परंतु योजनेतून पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही बहुजन विकास आघाडीचे नेते देत आहेत. वसई विरार आणि मीरा भाईंदरला पाणी द्यायला विरोध नाही. त्यासाठी राज्य सरकारने वेगळी धरणे बांधावीत. सूर्यातूनच पाणी दिले जाणार असेल तर मात्र मोठा विरोध होणार. आदिवासी योजनेतून बांधण्यात आलेल्या सूर्याचे पाणी प्रथम सिंचन, आदिवासी आणि पालघर, डहाणू तालुक्याला मिळायला हवे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी केली आहे.