शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

वसईतील सनसिटी -गास रस्ता पाण्याखाली; 'या' पाण्यातून वाहने नेऊ नयेत; पालिका, पोलीस यांचे आवाहन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 16:56 IST

शहरातील वाहनचालक, नागरीक यांची सुरक्षितता पाहता येथे पाणी ओसरे पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमत ला दिली आहे.

वसईः मागील चार दिवसापासून सतत सुरू असलेल्या वसई-विरार मधीलअतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच वसईच्या कमी अधिक भागात पाण्याचा निचरा झाला असला तरी अजूनही अनेक सखल भागात गुडघाभर तरी पाणी असल्याचे चित्र आहे. त्यातच वसईतील सनसिटी येथील संपूर्ण सनसिटी-गास  हा मुख्य रस्ताच पाण्याखाली गेला असल्याने या रस्त्यावरून जाऊन कुठलाही अपघात होऊ नये याकरिता शहरातील वाहनचालक, नागरीक यांची सुरक्षितता पाहता येथे पाणी ओसरे पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमत ला दिली आहे.

या सनसिटी- गास रस्त्याचा वापर नालासोपारा, भुईगाव, निर्मळ, गास, विरार पासून अनेक नागरिक नियमित करतात. वसई रेल्वे स्थानक या रस्त्याने काही वेळातच गाठता येते. सनसिटी, चुळणे रस्त्यावर बाजूलाच लागून संपूर्ण खाडी क्षेत्र असल्याने खास करून पावसाळ्यात समुद्रात भरती आली की हे पाणी सुध्दा या गासच्या  रस्त्यावर येते आणि इथला संपूर्ण मार्गच बंद होतो आणि दरवर्षीप्रमाणे पालिका, वाहतूक व स्थानिक पोलीस आवाहन करतात की, या पाण्यातून वाहने नेण्याचे धाडस करू नये, तसे फलकही लावले जातात, एकंदरीत नागरिकांची गैरसोय होते, एकूणच आता या रस्त्यावर खूप पाणी साचून आहे,आणि  त्यामुळे नागरिकांना वसई गाव अथवा देवतलाव असा दुहेरी वळसा घेत निर्मळ मार्गे नालासोपारा अथवा पुन्हा वसईत येण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करून शेवटी घर गाठावे लागते आहे.