शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

टँकर लॉबीला सुगीचे दिवस, प्रशासन पुन्हा ठरले अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:30 IST

वाढती लोकसंख्या, वसई-विरार महानगरपालिकेच्या मर्यादा आणि यंदा परतीच्या पावसाने दिलेला दगा वसई तालुक्यातील टॅँकर लॉबीसाठी सुगीचे दिवस आणणारा ठरला आहे.

- सुनिल घरतपारोळ : वाढती लोकसंख्या, वसई-विरार महानगरपालिकेच्या मर्यादा आणि यंदा परतीच्या पावसाने दिलेला दगा वसई तालुक्यातील टॅँकर लॉबीसाठी सुगीचे दिवस आणणारा ठरला आहे. एकीकडे वसईतुन टॅँकर हद्दपार झाल्याचे दावे सुरु असताना डिसेंबर महिन्यापासूनच त्यांनी धावपळ दिसू लागल्याने अपघातांचे प्रमाणही वाढणार असल्याची भिती निमिण झाली आहे.गोखीवरे, वालीव, पेल्हार, कोपर, उसगाव, शिवनसई, खानिवडे, चंदनसार, भाटपाडा, विरार पूर्वेकडील फुलपाडा या भागातील विहीर आणि बोअरवेलमधून हे टँकर पाणी भरतात. खाजगी विहीर आणि बोअरवेल मालक पैशासाठी बेसुमार पाणी उपसा करु लागल्याने या भागातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत विहिरीतील पाणी पुरेल का? या भीतीने, गावकरी चिंतेत आहेत.हे व्यवसायिक टॅँकर पैसा कमावण्याच्या उद्देशाने मिळेल तिथून पाणी भरून नागरिकांना विकतात. या पाण्यावर कोणतीही प्रक्रि या केली जात नसल्याने दूषित पाणी पिण्याशिवाय लोकांना पर्याय नसते. पावसाळा ते फेब्रुवारीपर्यंत टँकरचे दर ९०० ते १२०० रु पये असतात. आता टँकरचे दर वाढू लागले असून ही किंमत १५०० रुपयांवर पोहचली आहे. जसजशी पाणी टंचाईची झळ वाढायला सुरु वात होईल तसतसा टँकरचे दर दोन हजार रुपयांच्या घरात पोचलेला असेल असे एका टॅँकर चालकांनेच लोकमतला सांगितले.अनेक टॅँकर अनफिट आरटीओचे दुर्लक्षहे टँकर जुनाट, गळके, अनफिट असून, आरटीओ कार्यालयामध्ये सुमारे किती टँकरची नोंद आहे व किती टँकर बेकायदा पाण्याची वाहतूक करत आहेत याची उजळणी करण्याची परिवहन विभागाला गरज आहे. आठ वर्षांपेक्षा जुने झालेले ट्रक वापरण्यास बंदी आहे. याच ट्रकमध्ये फेरबदल करून त्याचे टँकरमध्ये बेकायदेशिरपणे रु पांतर करून वसईत त्याचा वापर केला जातो.अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. याची माहिती आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना पण कारवाई मात्र नाही. यामुळे, रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने चालवून दर वर्षाला निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या टँकर वाहतुकीवर परिवहन व वाहतूक पोलीस मेहेरबान का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :Waterपाणी