शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी पीडित नारंगी ग्रामस्थ तासंतास रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 03:46 IST

रांगेत उभे दिले टोकन नंबर देऊन केले धनादेशाचे वाटप

वसई : जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिडलेल्या वसई पूर्वेतील नारिंगी वासियांना शासकीय अधिकाऱ्यांच्या संवेदनाशुन्य कारभारामुळे तासंतास रांगेत उभे राहण्याचा प्रकार बुधवारी (५ जुलै) घडला आहे. वास्तविक शासकीय आदेशानुसार सरकारी अधिकाºयांनी पीडितांच्या घरोघरी जाऊन त्यांना मदतीचा धनादेश देणे अपेक्षित होते.वसई पूर्वेतील नारंगी गावच्या शेकडो ग्रामस्थांना ग्रामस्थांचे वसई महसूलच्या पथकाने दोन महिन्यापूर्वी पंचनामे पूर्ण केले. मात्र, इतका मोठा आर्थिक फटका बसून देखील दोन महिने उलटले तरीही शासन आदेश झुगारून मदतीच्या नावाने गोरगरिबांना आदल्या दिवशी टोकन नंबर देत त्यांना तासंनतास रांगेत उभे करीत पीडितांना मदतीच्या धनादेशाचे वाटप केल्याचा गंभीर प्रकार नारंगी विभागातील तलाठ्याने विरार कार्यालयात केला आहे. शासन आदेशानुसार वसईतील पीडित पूरग्रस्त नागरिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर त्या- त्या विभागवार तलाठी व मंडळ अधिकाºयांनी थेट या पीडित पूरग्रस्तांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्याचे शासन आदेश आहेत ,मात्र नारंगी विभागातील तलाठी गायकर यांनी विरार तलाठी कार्यालयाबाहेर ५ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांना धनादेश घेण्यासाठी आदल्या दिवशी गावात टोकन नंबरचे वाटप केले होते. दरम्यान येथे केवळ यादीतील ८० ते ८५ टक्के पीडितांनाच हे धनादेश मिळाले, तर उरलेल्यांना माघारी फिरावे लागले.अजूनही काहींना मदतीचे धनादेश नाहीत?वसईच्या अजूनही काही विभागात मदतीचे धनादेश देणे शिल्लक असताना असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी वसई प्रांत व तहसीलदार यांनी या घडल्या प्रकारची विशेष नोंद घेणे आवश्यक असून पुन्हा एकदा आपले सरकार म्हणून गतिमान महसूल प्रशासन हे कसे आहे हेच या महसूलच्या गलथान प्रकारावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.वसई महसूल पथकाने तालुक्यात जवळपास साडेअकरा हजारहुन अधिक पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९५ टक्क्याहून अधिक मदतीचे धनादेश वाटप केले असून अजूनही साधारण सहाशे ते साडेसहाशे धनादेशाचे वाटप होणे शिल्लक आहे. - किरण सुरवसे, तहसीलदार

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस