शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा?, कासा रु ग्णालयात ७ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:49 IST

या तालुक्यातील दाभाडी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

शौकत शेखडहाणू : या तालुक्यातील दाभाडी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.गुरुवारी आदिवासी विकास विभागाच्या शिक्षण सचिव मनिषा वर्मा, डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यासह शासकीय अधिकाºयांनी गुरु वारी पहाटे दाभाडी शासकीय आश्रमशाळा, सायवन प्रा. आ. केंद्र यांची प्रत्यक्ष पाहणी करुन आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्यात मनीषा तुलजी दुमाडा (१४), कंचन काशीनाथ बाबर (१४), शीतल सखाराम बोरसा (११), सोनाली परशुराम चौधरी (१०), रुचिता किसन भोये (१६), जोनिका सुरेश नडगे (१०), संचिता विनोद चौधरी (९) यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.आदिवासी विकास विभागाच्या संचलित दाभाडी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास उल्टी, जुलाब, मळमळणे असा त्रास सुरु झाल्याने दुपारपर्यंत ७६ विद्यार्थ्यांना सायवन प्राथमिक रु ग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी ५९ विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले असून या १० विद्यार्थ्यांना दाखल करून उपचार केले गेले. त्यापैकी ७ जणांवर कासा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी आदिवासी आश्रमशाळांतर्गत सामन्यांमध्ये काही विद्यार्थ्यांनी बाहेरचे पदार्थ खाल्याने हा प्रकार घडला असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडल्याने आश्रमशाळेत दिलेले रात्रीचे भोजन व त्यासोबतचे दूषित पाण्यामुळे ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय असून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकारानंतर आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी कासा बुद्रुक येथे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती.