शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस; महापालिकेने जवाबदारी ढकलली पोलिसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 23:23 IST

पावसाळ्यापूर्वी पालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल महानगरपालिका दरवर्षी तयार करते.

नालासोपारा : गेल्या ४ दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे आणि पुण्यातील कोंढवा येथे सोसायटीच्या इमारतीची संरक्षक भिंत पडून १६ मजुरांच्या मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे वसईमधील धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर असल्याने पावसाळ्यात कोणती तरी अनुकचित घटना घडेल म्हणून स्वत:ची जवाबदारी झटकून वसई विरार महानगरपालिकेच्या जी प्रभागाच्या सहायक आयुक्त सुभाष जाधव यांनी पोलिसांना लेखी नोटीस धाडून अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते.पावसाळ्यापूर्वी पालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल महानगरपालिका दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची तीन वर्गात वर्गवारी केली जाते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात त्यांना तात्काळ खाली करायचे असते. पालिकेकडे संक्र मण शिबिर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतींच्या रहीवाशांना बाहेर काढून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. अशा इमारतीमधील रहिवाशांची घरे खाली करून संक्र मण शिबिरामध्ये पुनर्वसन करण्याची सर्वस्वी जवाबदारी महानगरपालिकेकडे असते पण स्वत:ची जवाबदारी झटकून अनुकुचित प्रकार घडला तर महानगरपालिका जवाबदार राहणार नसून सर्वस्वी जवाबदारी पोलिसांची असल्याचे नोटीसीत नमूद केले आहे. वालीव प्रभागात ३७ धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतींच्या नावांच्या यादीची एक प्रत आणि नोटीसीसोबत महानगरपालिकेच्या अधिकाºयाांी वालीव पोलीस ठाण्यात सोमवारी धाडली आहे. यानोटिसीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी उत्तर पाठवले असल्याचेही सूत्रांकडून कळते. पावसाळ्यात धोकादायक इमारती केव्हाही कोसळू शकतात.किती इमारती वसई तालुक्यात धोकादायक...महानगरपालिकेने ५८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी १९८ अतिधोकादायक इमारती, सी वन मध्ये ८१ इमारती, सी टू मध्ये १९७ इमारती तर सी थ्रीमध्ये १११ इमारती अशी यादी मनपाने तीन गटात वर्गवारी केली आहे.परंतु अद्यापही १९८ अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवासी रहात आहेत. या धोकादायक इमारतींमध्ये अजूनही शेकडो कुटुंब रहात आहेत.धोकादायक किंवा अतीधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे व राहिवाशांना खाली करण्याची सर्वस्वी जवाबदारी महानगरपालिकेची आहे. घरे खाली करताना पोलीस बंदोबस्त पाहिजे असेल तर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार देण्यात येईल.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार