शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तहसीलवर ताण; १८ वर्षे भरतीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:52 IST

पुरवठा विभाग व संजय गांधी विभागाचे काम महसूलच्या माथी

- राहुल वाडेकरतलवाडा : विक्रमगड तहसील कार्यालयातील पुरवठा व संजय गांधी विभागामध्ये गत १८ वर्षांपासून पद भरलेलेच नाहीत. किंबहुना वरील दोन्ही विभागांमध्ये पदांची निर्मितीच झाली नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे ते काम इतर विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाटून घ्यावे लागते. त्यामुळे एकुणच प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे.तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५ हजार ५२७ हेक्टर आहे़ यात ९४ गावे, तर ४२३ पाडयांचा अतर्भाव होतो. ़पिकाखालील क्षेत्र २०,५७९ हेक्टर तर कुरणाखालील क्षेत्र २१ हजार २१८ इतके आहे़ तालुक्यात प्रामुख्याने भात, नागरी, वरई अशी पिके घेतली जातात़ २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,१४,२५४ च्या घरात पोहचली आहे़ सध्यस्थितीत ३९ ग्रामपंचायती व ३ ग्रामदान मंडळ व एक नगरपंचायतीचा समावेष यात करण्यात आला आहे़१९९९ मध्ये तहसील कार्यालय स्थापन झालेले आहे़ तेव्हापासून येथील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात बसण्यासाठी योग्य ती व्यवस्था झालेली नाही़ सध्या हे कार्यालय पुर्वीच्या मंडळ अधिकारी कार्यालयात भरविले जात आहे. नविन इमारतीचा प्रस्ताव मंत्रालयात अडकून पडलेला असल्याने अपुरे कर्मचारी व योग्य त्या सुविधा नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे़विक्रमगड तहसील कार्यालयात पुरवठा विभाग, महसूल विभाग, संजय गांधी विभाग, एम़ आर जी. एस विभाग, निवडणूक विभाग आदी विविध विभाग एकत्र काम करीत आहेत. गत १८ वर्षांपासून या विभागातील महसुल विभाग सोडला तर दुसºया कोणत्याही विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची भरती झालेली नाही. एकही पद मंजूर नसल्याने विभागाची निर्मिती तरी का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे.़ त्यामुळे महसूल विभागतील कर्मचारी व अधिकाºयांनाच वरील विभागांच्या कामाचा निपटारा करावा लागतो. या प्रशासकीय अनागोंदीमुळे येथील आदिवासी ग्रामस्थांची कामे वेळेत होत नाही. साध्या कामांसाठी त्यांना वारंवार या कार्यालयाच्या खेटे मारावे लागत आहेत. आधिच आठराविश्व दारिद्रय असणाºया गोर गरीबांना वारंवार पदरमोड करावी लागते आहे.शासनदरबारी प्रयत्न तोकडेयासंदर्भात शासनाला पत्रव्यवहार केला जात असुनही योग्य उपाययोजना केली जात नसल्याने त्याचा विपरीत परीणाम विकासकामांवर होत आहे़ या विभागातील रिक्त पदांमुळे व अनेक पदे मंजुरीविना असल्याने विकासकामांना खीळ बसली आहे़ वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यामुळे येथील स्थानिक लोकप्रनिधी आमदार, खासदार, आदिवासी विकास मंत्री, पक्ष प्रमुख करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार