शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तहसीलवर ताण; १८ वर्षे भरतीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:52 IST

पुरवठा विभाग व संजय गांधी विभागाचे काम महसूलच्या माथी

- राहुल वाडेकरतलवाडा : विक्रमगड तहसील कार्यालयातील पुरवठा व संजय गांधी विभागामध्ये गत १८ वर्षांपासून पद भरलेलेच नाहीत. किंबहुना वरील दोन्ही विभागांमध्ये पदांची निर्मितीच झाली नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे ते काम इतर विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाटून घ्यावे लागते. त्यामुळे एकुणच प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे.तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५ हजार ५२७ हेक्टर आहे़ यात ९४ गावे, तर ४२३ पाडयांचा अतर्भाव होतो. ़पिकाखालील क्षेत्र २०,५७९ हेक्टर तर कुरणाखालील क्षेत्र २१ हजार २१८ इतके आहे़ तालुक्यात प्रामुख्याने भात, नागरी, वरई अशी पिके घेतली जातात़ २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,१४,२५४ च्या घरात पोहचली आहे़ सध्यस्थितीत ३९ ग्रामपंचायती व ३ ग्रामदान मंडळ व एक नगरपंचायतीचा समावेष यात करण्यात आला आहे़१९९९ मध्ये तहसील कार्यालय स्थापन झालेले आहे़ तेव्हापासून येथील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात बसण्यासाठी योग्य ती व्यवस्था झालेली नाही़ सध्या हे कार्यालय पुर्वीच्या मंडळ अधिकारी कार्यालयात भरविले जात आहे. नविन इमारतीचा प्रस्ताव मंत्रालयात अडकून पडलेला असल्याने अपुरे कर्मचारी व योग्य त्या सुविधा नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे़विक्रमगड तहसील कार्यालयात पुरवठा विभाग, महसूल विभाग, संजय गांधी विभाग, एम़ आर जी. एस विभाग, निवडणूक विभाग आदी विविध विभाग एकत्र काम करीत आहेत. गत १८ वर्षांपासून या विभागातील महसुल विभाग सोडला तर दुसºया कोणत्याही विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची भरती झालेली नाही. एकही पद मंजूर नसल्याने विभागाची निर्मिती तरी का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे.़ त्यामुळे महसूल विभागतील कर्मचारी व अधिकाºयांनाच वरील विभागांच्या कामाचा निपटारा करावा लागतो. या प्रशासकीय अनागोंदीमुळे येथील आदिवासी ग्रामस्थांची कामे वेळेत होत नाही. साध्या कामांसाठी त्यांना वारंवार या कार्यालयाच्या खेटे मारावे लागत आहेत. आधिच आठराविश्व दारिद्रय असणाºया गोर गरीबांना वारंवार पदरमोड करावी लागते आहे.शासनदरबारी प्रयत्न तोकडेयासंदर्भात शासनाला पत्रव्यवहार केला जात असुनही योग्य उपाययोजना केली जात नसल्याने त्याचा विपरीत परीणाम विकासकामांवर होत आहे़ या विभागातील रिक्त पदांमुळे व अनेक पदे मंजुरीविना असल्याने विकासकामांना खीळ बसली आहे़ वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यामुळे येथील स्थानिक लोकप्रनिधी आमदार, खासदार, आदिवासी विकास मंत्री, पक्ष प्रमुख करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार