शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या ‘रिक्षा गँग’ला वेळीच रोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 00:24 IST

राहुल गांधी पंतप्रधान झाले : तर देश कार्टुन नेटवर्क बनेल - आदित्य ठाकरे

डहाणू : महायुती समोर संघटना नसून गुंडांची टोळी आहे, अशी टीका युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. ही टोळी तुमची जमीन लुटणारी, दादागीरी करणारी आहे. संवादातून चर्चा करत असतांना महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास जनता व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना महायुतीच्या सभेला ते गुरुवारी डहाणूत आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख राजेश शहा, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी, युवा पदाधिकारी हेमंत धर्ममेहेर, महीला विकास महामंडळ जिल्हा प्रमुख ज्योती ठाकरे, नगराध्यक्ष भरत राजपूत श्रमजीवी संघटनेचे रामभाऊ वारणा, श्रमजीवी जिल्हाध्यक्ष सुरेश रिंजड ज्योती मेहेर, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, श्रीनिवास वनगा, संजय पाटील, संजय कांबळे यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महाआघाडीमध्ये सर्वांना पंतप्रधान बनवायचे आहे. राहुलजी ओसामाला ओसमाजी म्हणतात. आणि सावरकरांना कायर डरपोक म्हणतात. देशाचा विचार करुन मतदान करा.राहुल गांधी पंतप्रधान केले तर देश कार्टुन नेटवर्क बनेल अशी टिकाही त्यांनी केली. महायुतीची सत्ता येण्यापूर्वी ५ वर्षे वेगळी होती. काँग्रेसचा हात खिशात होता. जनतेचे पैसे खात्यात गेले. काँग्रेसने तेलगी, सिंचन, टू- जी चे घोटाळे केले आहेत. त्यामुळे आमची पाच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीचे पाप धुण्यात गेली. मात्र पुढची पाच वर्ष महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी जाणार आहेत. रस्ते, उद्योग एअरपोर्ट तयार होत आहेत. उद्योगातून रोजगार मिळत आहे. चौपदरीकरण होत आहे. सिंचनाची कामे होताना दिसत आहेत. पापाचा पैसा हातात घेऊ नका, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेचे बटण दाबावे लागेल. ३७० कलम ठेवुन, देशद्रोहाचे कलम काढून, ओमर अब्दुल्लांना काश्मिरमध्ये स्वतंत्र पंतप्रधआन नेमण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे आदित्य म्हणाले.महाआघाडीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी बहुजन विकास आघाडी पक्ष नसून संघटना आहे. २००९ ते १४ साली विरोधकांना निवडुन दिले होते. या काळात बळीराम जाधव यांनी संसदेत एकही प्रश्न विचारला नाही. त्यांना स्वत:चे लेटर हेड विचारावे लागते. सरकारी, वन विभागाच्या जमीनी संपल्या आता सफाळा, पालघर बोईसर डहाणुकडे सरकले आहेत. माझ्याकडे पालघर जिल्हयाच्या विकासाचा रोड मॅप तयार आहे असेही गावीत म्हणाले राष्ट्रवादी, काँग्रेस विकली गेल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019