शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या ‘रिक्षा गँग’ला वेळीच रोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 00:24 IST

राहुल गांधी पंतप्रधान झाले : तर देश कार्टुन नेटवर्क बनेल - आदित्य ठाकरे

डहाणू : महायुती समोर संघटना नसून गुंडांची टोळी आहे, अशी टीका युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. ही टोळी तुमची जमीन लुटणारी, दादागीरी करणारी आहे. संवादातून चर्चा करत असतांना महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास जनता व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना महायुतीच्या सभेला ते गुरुवारी डहाणूत आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख राजेश शहा, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी, युवा पदाधिकारी हेमंत धर्ममेहेर, महीला विकास महामंडळ जिल्हा प्रमुख ज्योती ठाकरे, नगराध्यक्ष भरत राजपूत श्रमजीवी संघटनेचे रामभाऊ वारणा, श्रमजीवी जिल्हाध्यक्ष सुरेश रिंजड ज्योती मेहेर, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, श्रीनिवास वनगा, संजय पाटील, संजय कांबळे यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महाआघाडीमध्ये सर्वांना पंतप्रधान बनवायचे आहे. राहुलजी ओसामाला ओसमाजी म्हणतात. आणि सावरकरांना कायर डरपोक म्हणतात. देशाचा विचार करुन मतदान करा.राहुल गांधी पंतप्रधान केले तर देश कार्टुन नेटवर्क बनेल अशी टिकाही त्यांनी केली. महायुतीची सत्ता येण्यापूर्वी ५ वर्षे वेगळी होती. काँग्रेसचा हात खिशात होता. जनतेचे पैसे खात्यात गेले. काँग्रेसने तेलगी, सिंचन, टू- जी चे घोटाळे केले आहेत. त्यामुळे आमची पाच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीचे पाप धुण्यात गेली. मात्र पुढची पाच वर्ष महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी जाणार आहेत. रस्ते, उद्योग एअरपोर्ट तयार होत आहेत. उद्योगातून रोजगार मिळत आहे. चौपदरीकरण होत आहे. सिंचनाची कामे होताना दिसत आहेत. पापाचा पैसा हातात घेऊ नका, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेचे बटण दाबावे लागेल. ३७० कलम ठेवुन, देशद्रोहाचे कलम काढून, ओमर अब्दुल्लांना काश्मिरमध्ये स्वतंत्र पंतप्रधआन नेमण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे आदित्य म्हणाले.महाआघाडीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी बहुजन विकास आघाडी पक्ष नसून संघटना आहे. २००९ ते १४ साली विरोधकांना निवडुन दिले होते. या काळात बळीराम जाधव यांनी संसदेत एकही प्रश्न विचारला नाही. त्यांना स्वत:चे लेटर हेड विचारावे लागते. सरकारी, वन विभागाच्या जमीनी संपल्या आता सफाळा, पालघर बोईसर डहाणुकडे सरकले आहेत. माझ्याकडे पालघर जिल्हयाच्या विकासाचा रोड मॅप तयार आहे असेही गावीत म्हणाले राष्ट्रवादी, काँग्रेस विकली गेल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019