शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आंदोलन चिरडण्यासाठी आटापीटा, एसटीच्या विश्रांतीगृहाला ठोकले टाळे, पाण्याचा पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 05:41 IST

एसटी संघटना आणि शासनाच्या दरम्यान तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीला यश मिळत नसल्याने पालघर विभागांतर्गत आठ डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही.

 - हितेन नाईकपालघर : एसटी संघटना आणि शासनाच्या दरम्यान तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीला यश मिळत नसल्याने पालघर विभागांतर्गत आठ डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. शासन पातळी वरून हा संप चिरडण्याचे प्रकार सुरु असताना पालघरमध्ये सर्व कर्मचाºयांना विश्रांतीगृहातून बाहेर काढीत टाळे ठोकले आहे. पाण्याचा पुरवठाही बंद करण्यात आला असून गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या आगार व्यवस्थापका कडून देण्यात येत आहेत.पालघर विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, नालासोपारा, अर्नाळा, अश्या आठ आगरातून दररोज ४०० शेड्युल (बसेस)द्वारे ३ हजार ६२३ फेºया मारल्या जात असून १ लाख २७ हजार ७०० किमी च्या प्रवासाचा टप्पा गाठून सुमारे ४० ते ४५ लाखाचे उत्पन्न दररोज पालघर विभागाला मिळते.दररोज सुमारे २ ते २ लाख २५ हजार प्रवाशी एसटी ने प्रवास करीत असतात.ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवार पासून एसटी कामगार संघटना, श्रमिक कामगार संघटना व इतर चार संघटनांनी राज्यभर कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. गुरुवारी बंद ला तीन दिवस होत असून ह्या कामबंद आंदोलनामुळे विभागाला सव्वा ते दिड कोटीचे नुकसान झाले आहे. दिवाळी सणामध्ये प्रवाश्यांच्या गैरसोय होऊ नये म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाने वसई, विरार, नालासोपारा व बोईसर डेपोमध्ये एकूण ४७ खाजगी बसेस ना वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याचे विरार उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी अनिल पाटील ह्यांनी लोकमत ला सांगितले. फक्त नालासोपारा डेपोतून बसेस साठी प्रवाश्यांची मागणी होत असून अन्य आगारातून खाजगी बसेस ची मागणी नसल्याचेही त्यांनी सांगितले.पालघर विभागांतर्गत आठही आगारातून शांततेच्या मार्गातून कामबंद आंदोलन शांततेत सुरू असताना शासनाच्या आदेशाने प्रशासन कर्मचाºयांवर विविध प्रकारे दडपण आणीत आहे. बुधवार पासून पालघर आगारातील विश्रांतीगृहातून सर्व कर्मचार्यांना बाहेर काढून टाळे ठोकण्यात आले असून घोषणा, निषेध, पुतळा जाळणे, खाजगी बसेस ना विरोध करणे, मुंडण करणे असे प्रकार केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचा धमक्या आगार व्यवस्थापक नितीन चव्हाण ह्यांनी दिल्याची माहिती कर्मचाºयांनी लोकमतला दिली.राज्यातील पिंपरी- चिंचवड आगारातील विश्रांतीगृहातून चालक-वाहकाना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले असून कल्याण मध्ये कर्मचाºयांनी मुंडण करीत शासना विरोधात निषेध व्यक्त केला. तर अहमदनगर येथे किर्तना द्वारे शासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र पालघर मध्ये अजूनही शांततेत कामबंद आंदोलन सुरू आहे.कर्मचाºयांच्या सोयीसुविधा बंद करून धमक्या देऊन त्यांनी चालू केलेला संप चिरडण्याचे प्रयत्न प्रशासना कडून सुरू असून मात्र शांतपणे बसून, जेवण आगारातच शिजवून कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करीत आहेत. देशभर दिवाळी साजरी केली जात असताना हे कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे मात्र शासन सकारात्मक निर्णय घेईल ह्या आशेवर आहेत.दुसरीकडे वसई, नालासोपारा, अर्नाळा येथून प्रवाश्यांची खाजगी बसेस साठी मागणी होत असून अन्य आगारा कडे प्रवाशी ढुंकूनही बघत नसल्याचे दिसून येत आहे.प्रवाशांनीही निवडले सोयीचे मार्गवसई, नालासोपारा, अर्नाळा येथून प्रवाश्यांची खाजगी बसेस साठी मागणी होत असून अन्य आगारा कडे प्रवाशी ढुंकूनही बघत नसल्याचे दिसून येते. तीन, चार चाकी रिक्षाधारकाकडे प्रवाशांचा ओढा असून हे सेवा जोरात सुरू असल्ंयाने त्यांची दिवाळी जोरात आहे. तर लांब पल्ल्याच्या सेवेसाठी येथील प्रवाशी रेल्वे सेवेला प्राधान्य देत आहेत.माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी गुरुवारी पालघर आगारातील संपक-यांची भेट घेऊन जाहिर पाठिंबा दर्शवला. तसेच जनता दल पालघरनेही या संपाला आपला पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष लवेकर यांनी लोकमतला माहिती दिली.

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ