शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

आंदोलन चिरडण्यासाठी आटापीटा, एसटीच्या विश्रांतीगृहाला ठोकले टाळे, पाण्याचा पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 05:41 IST

एसटी संघटना आणि शासनाच्या दरम्यान तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीला यश मिळत नसल्याने पालघर विभागांतर्गत आठ डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही.

 - हितेन नाईकपालघर : एसटी संघटना आणि शासनाच्या दरम्यान तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीला यश मिळत नसल्याने पालघर विभागांतर्गत आठ डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. शासन पातळी वरून हा संप चिरडण्याचे प्रकार सुरु असताना पालघरमध्ये सर्व कर्मचाºयांना विश्रांतीगृहातून बाहेर काढीत टाळे ठोकले आहे. पाण्याचा पुरवठाही बंद करण्यात आला असून गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या आगार व्यवस्थापका कडून देण्यात येत आहेत.पालघर विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, नालासोपारा, अर्नाळा, अश्या आठ आगरातून दररोज ४०० शेड्युल (बसेस)द्वारे ३ हजार ६२३ फेºया मारल्या जात असून १ लाख २७ हजार ७०० किमी च्या प्रवासाचा टप्पा गाठून सुमारे ४० ते ४५ लाखाचे उत्पन्न दररोज पालघर विभागाला मिळते.दररोज सुमारे २ ते २ लाख २५ हजार प्रवाशी एसटी ने प्रवास करीत असतात.ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवार पासून एसटी कामगार संघटना, श्रमिक कामगार संघटना व इतर चार संघटनांनी राज्यभर कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. गुरुवारी बंद ला तीन दिवस होत असून ह्या कामबंद आंदोलनामुळे विभागाला सव्वा ते दिड कोटीचे नुकसान झाले आहे. दिवाळी सणामध्ये प्रवाश्यांच्या गैरसोय होऊ नये म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाने वसई, विरार, नालासोपारा व बोईसर डेपोमध्ये एकूण ४७ खाजगी बसेस ना वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याचे विरार उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी अनिल पाटील ह्यांनी लोकमत ला सांगितले. फक्त नालासोपारा डेपोतून बसेस साठी प्रवाश्यांची मागणी होत असून अन्य आगारातून खाजगी बसेस ची मागणी नसल्याचेही त्यांनी सांगितले.पालघर विभागांतर्गत आठही आगारातून शांततेच्या मार्गातून कामबंद आंदोलन शांततेत सुरू असताना शासनाच्या आदेशाने प्रशासन कर्मचाºयांवर विविध प्रकारे दडपण आणीत आहे. बुधवार पासून पालघर आगारातील विश्रांतीगृहातून सर्व कर्मचार्यांना बाहेर काढून टाळे ठोकण्यात आले असून घोषणा, निषेध, पुतळा जाळणे, खाजगी बसेस ना विरोध करणे, मुंडण करणे असे प्रकार केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचा धमक्या आगार व्यवस्थापक नितीन चव्हाण ह्यांनी दिल्याची माहिती कर्मचाºयांनी लोकमतला दिली.राज्यातील पिंपरी- चिंचवड आगारातील विश्रांतीगृहातून चालक-वाहकाना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले असून कल्याण मध्ये कर्मचाºयांनी मुंडण करीत शासना विरोधात निषेध व्यक्त केला. तर अहमदनगर येथे किर्तना द्वारे शासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र पालघर मध्ये अजूनही शांततेत कामबंद आंदोलन सुरू आहे.कर्मचाºयांच्या सोयीसुविधा बंद करून धमक्या देऊन त्यांनी चालू केलेला संप चिरडण्याचे प्रयत्न प्रशासना कडून सुरू असून मात्र शांतपणे बसून, जेवण आगारातच शिजवून कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करीत आहेत. देशभर दिवाळी साजरी केली जात असताना हे कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे मात्र शासन सकारात्मक निर्णय घेईल ह्या आशेवर आहेत.दुसरीकडे वसई, नालासोपारा, अर्नाळा येथून प्रवाश्यांची खाजगी बसेस साठी मागणी होत असून अन्य आगारा कडे प्रवाशी ढुंकूनही बघत नसल्याचे दिसून येत आहे.प्रवाशांनीही निवडले सोयीचे मार्गवसई, नालासोपारा, अर्नाळा येथून प्रवाश्यांची खाजगी बसेस साठी मागणी होत असून अन्य आगारा कडे प्रवाशी ढुंकूनही बघत नसल्याचे दिसून येते. तीन, चार चाकी रिक्षाधारकाकडे प्रवाशांचा ओढा असून हे सेवा जोरात सुरू असल्ंयाने त्यांची दिवाळी जोरात आहे. तर लांब पल्ल्याच्या सेवेसाठी येथील प्रवाशी रेल्वे सेवेला प्राधान्य देत आहेत.माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी गुरुवारी पालघर आगारातील संपक-यांची भेट घेऊन जाहिर पाठिंबा दर्शवला. तसेच जनता दल पालघरनेही या संपाला आपला पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष लवेकर यांनी लोकमतला माहिती दिली.

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ