शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

वसई-विरारमध्ये डासांचे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:26 IST

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; महापालिकेने केली २० कोटींची तरतूद

विरार : डासांच्या निर्मुलनासाठी वसई-विरार महापालिकेने विविध पद्धतींचा अवलंब केला असला तरी फवारणी होणे गरजेचे आहे. परंतु, वसई विरार शहरात नियमित फवारणी होत नसल्याने डासांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांना मोठा आजार होण्याची शक्यता देखील वाढली आहे. डासांमुळे नागरिकांचे बाहेर पडणे कठीण झाले असून त्यांच्यासाठी ही मोठी समस्या बनली आहे.डासांच्या निर्मुलनासाठी महापालिके तर्फे दर आठवड्याला नियमित फवारणी केली जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून ती होत नसल्याने शहरात डासांचे प्रमाण वाढत आहे. नाले सफाई आभावी डासांची संख्या आणखी जास्त वाढत आहे. नाल्याच्या बाजूला असलेले परिसर व इमारतींमध्ये फवारणी केली जाणे अतिशय गरजेचे आहे. पण ती देखील होत नसल्याने नागरीक हैराण आहे.डासांच्या निर्मुलनासाठी पालिकेने २० कोटी रु पयांची तरतूद केली आहे. पण डासांची संख्या कमी होत नसल्याने त्यामुळे कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता वाढली आहे. अनेकदा फारावणी प्रक्रि येत पाणी जास्त व औषध कमी टाकले जाते यामुळे फवारणी नंतर त्याचा तितकासा परिणाम होताना दिसत नसल्याने डास समूळ नष्ट होत नाहीत.एकात्मिक डास निर्मुलन प्रक्रि या महापालिके कडून सुरु करण्यात आली होती. यात तीन प्रकारे डास निर्मुलन करण्यात येणार होते. इंजिनियर पद्धती, रसायन पद्धती आणि बायलॉजिकल पद्धती. प्रत्येक पद्धती ही वेग वेगळ्या ठेकेदाराला वाटून देण्यात येणार होते. संध्याकाळी बाहेर फिरण्यासाठी बाहेर पडताना देखी नागरिकांना अनेकदा विचार करावा लागतो. तसेच डासांमुळे नागरिकांना मच्छर जाळी, मच्छर मारणारी बॅट घेऊन बसावे लागते तर संध्याकाळच्या वेळेस घराची दारं खिडक्या बंद करून बसावे लागते असे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने डासांची संख्या कमी करण्याचा विडा उचलला असला तरी काम होताना दिसून येत नाहीये असा आरोप नागरिकांनी पालिके वर लावलेला आहे तर डासांमुळे आजार पसरण्याची पालिका वाट पाहत आहे का ? असे प्रश्न देखील विचारले जात आहेत. यावर अजूनही काम सुरु झाले नसले तरी फवारणी ही मुलभूत प्रकिया आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त डास कमी करता येतील. नाले व गटारे सुकल्यामुळे घाणीत डास आणखी जास्त वाढत आहेत यामुळे डेंगू, मलेरिया सारखे आजारांचे प्रमाण वाढत आहेत.तोकड्या उपाययोजना नियोजनाची आवश्यक्तावसई विरार शहरात मोठ मोठे नाले असल्याने त्याबाजूला असणारी वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहेत. डासांमुळे जीव घेणे आजार होत असल्याने प्रथमिक पातळीवर काम सुरु होणे गरजेचे आहे. पालिके कडून होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे लवकरात लवकर दास निर्मूलन करण्यात येणे गरजेचे आहे.डास निर्मुलन हे नागरिकांसाठी केले जाणे गरजेचे आहे. याची आम्हाला संपूर्ण माहिती आहे. त्यासाठी काम देखील सुरु झाले आहे. जितकं जमेल तितकं लवकर डासांचे प्रमाण कमी व्हावे हाच आमचा प्रयत्न असणार आहे.- माधव जावदे, शहर अभियंता

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHealthआरोग्य