शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वसई-विरारमध्ये डासांचे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:26 IST

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; महापालिकेने केली २० कोटींची तरतूद

विरार : डासांच्या निर्मुलनासाठी वसई-विरार महापालिकेने विविध पद्धतींचा अवलंब केला असला तरी फवारणी होणे गरजेचे आहे. परंतु, वसई विरार शहरात नियमित फवारणी होत नसल्याने डासांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांना मोठा आजार होण्याची शक्यता देखील वाढली आहे. डासांमुळे नागरिकांचे बाहेर पडणे कठीण झाले असून त्यांच्यासाठी ही मोठी समस्या बनली आहे.डासांच्या निर्मुलनासाठी महापालिके तर्फे दर आठवड्याला नियमित फवारणी केली जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून ती होत नसल्याने शहरात डासांचे प्रमाण वाढत आहे. नाले सफाई आभावी डासांची संख्या आणखी जास्त वाढत आहे. नाल्याच्या बाजूला असलेले परिसर व इमारतींमध्ये फवारणी केली जाणे अतिशय गरजेचे आहे. पण ती देखील होत नसल्याने नागरीक हैराण आहे.डासांच्या निर्मुलनासाठी पालिकेने २० कोटी रु पयांची तरतूद केली आहे. पण डासांची संख्या कमी होत नसल्याने त्यामुळे कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता वाढली आहे. अनेकदा फारावणी प्रक्रि येत पाणी जास्त व औषध कमी टाकले जाते यामुळे फवारणी नंतर त्याचा तितकासा परिणाम होताना दिसत नसल्याने डास समूळ नष्ट होत नाहीत.एकात्मिक डास निर्मुलन प्रक्रि या महापालिके कडून सुरु करण्यात आली होती. यात तीन प्रकारे डास निर्मुलन करण्यात येणार होते. इंजिनियर पद्धती, रसायन पद्धती आणि बायलॉजिकल पद्धती. प्रत्येक पद्धती ही वेग वेगळ्या ठेकेदाराला वाटून देण्यात येणार होते. संध्याकाळी बाहेर फिरण्यासाठी बाहेर पडताना देखी नागरिकांना अनेकदा विचार करावा लागतो. तसेच डासांमुळे नागरिकांना मच्छर जाळी, मच्छर मारणारी बॅट घेऊन बसावे लागते तर संध्याकाळच्या वेळेस घराची दारं खिडक्या बंद करून बसावे लागते असे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने डासांची संख्या कमी करण्याचा विडा उचलला असला तरी काम होताना दिसून येत नाहीये असा आरोप नागरिकांनी पालिके वर लावलेला आहे तर डासांमुळे आजार पसरण्याची पालिका वाट पाहत आहे का ? असे प्रश्न देखील विचारले जात आहेत. यावर अजूनही काम सुरु झाले नसले तरी फवारणी ही मुलभूत प्रकिया आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त डास कमी करता येतील. नाले व गटारे सुकल्यामुळे घाणीत डास आणखी जास्त वाढत आहेत यामुळे डेंगू, मलेरिया सारखे आजारांचे प्रमाण वाढत आहेत.तोकड्या उपाययोजना नियोजनाची आवश्यक्तावसई विरार शहरात मोठ मोठे नाले असल्याने त्याबाजूला असणारी वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहेत. डासांमुळे जीव घेणे आजार होत असल्याने प्रथमिक पातळीवर काम सुरु होणे गरजेचे आहे. पालिके कडून होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे लवकरात लवकर दास निर्मूलन करण्यात येणे गरजेचे आहे.डास निर्मुलन हे नागरिकांसाठी केले जाणे गरजेचे आहे. याची आम्हाला संपूर्ण माहिती आहे. त्यासाठी काम देखील सुरु झाले आहे. जितकं जमेल तितकं लवकर डासांचे प्रमाण कमी व्हावे हाच आमचा प्रयत्न असणार आहे.- माधव जावदे, शहर अभियंता

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHealthआरोग्य