शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

वसई-विरारमध्ये डासांचे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:26 IST

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; महापालिकेने केली २० कोटींची तरतूद

विरार : डासांच्या निर्मुलनासाठी वसई-विरार महापालिकेने विविध पद्धतींचा अवलंब केला असला तरी फवारणी होणे गरजेचे आहे. परंतु, वसई विरार शहरात नियमित फवारणी होत नसल्याने डासांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांना मोठा आजार होण्याची शक्यता देखील वाढली आहे. डासांमुळे नागरिकांचे बाहेर पडणे कठीण झाले असून त्यांच्यासाठी ही मोठी समस्या बनली आहे.डासांच्या निर्मुलनासाठी महापालिके तर्फे दर आठवड्याला नियमित फवारणी केली जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून ती होत नसल्याने शहरात डासांचे प्रमाण वाढत आहे. नाले सफाई आभावी डासांची संख्या आणखी जास्त वाढत आहे. नाल्याच्या बाजूला असलेले परिसर व इमारतींमध्ये फवारणी केली जाणे अतिशय गरजेचे आहे. पण ती देखील होत नसल्याने नागरीक हैराण आहे.डासांच्या निर्मुलनासाठी पालिकेने २० कोटी रु पयांची तरतूद केली आहे. पण डासांची संख्या कमी होत नसल्याने त्यामुळे कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता वाढली आहे. अनेकदा फारावणी प्रक्रि येत पाणी जास्त व औषध कमी टाकले जाते यामुळे फवारणी नंतर त्याचा तितकासा परिणाम होताना दिसत नसल्याने डास समूळ नष्ट होत नाहीत.एकात्मिक डास निर्मुलन प्रक्रि या महापालिके कडून सुरु करण्यात आली होती. यात तीन प्रकारे डास निर्मुलन करण्यात येणार होते. इंजिनियर पद्धती, रसायन पद्धती आणि बायलॉजिकल पद्धती. प्रत्येक पद्धती ही वेग वेगळ्या ठेकेदाराला वाटून देण्यात येणार होते. संध्याकाळी बाहेर फिरण्यासाठी बाहेर पडताना देखी नागरिकांना अनेकदा विचार करावा लागतो. तसेच डासांमुळे नागरिकांना मच्छर जाळी, मच्छर मारणारी बॅट घेऊन बसावे लागते तर संध्याकाळच्या वेळेस घराची दारं खिडक्या बंद करून बसावे लागते असे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने डासांची संख्या कमी करण्याचा विडा उचलला असला तरी काम होताना दिसून येत नाहीये असा आरोप नागरिकांनी पालिके वर लावलेला आहे तर डासांमुळे आजार पसरण्याची पालिका वाट पाहत आहे का ? असे प्रश्न देखील विचारले जात आहेत. यावर अजूनही काम सुरु झाले नसले तरी फवारणी ही मुलभूत प्रकिया आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त डास कमी करता येतील. नाले व गटारे सुकल्यामुळे घाणीत डास आणखी जास्त वाढत आहेत यामुळे डेंगू, मलेरिया सारखे आजारांचे प्रमाण वाढत आहेत.तोकड्या उपाययोजना नियोजनाची आवश्यक्तावसई विरार शहरात मोठ मोठे नाले असल्याने त्याबाजूला असणारी वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहेत. डासांमुळे जीव घेणे आजार होत असल्याने प्रथमिक पातळीवर काम सुरु होणे गरजेचे आहे. पालिके कडून होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे लवकरात लवकर दास निर्मूलन करण्यात येणे गरजेचे आहे.डास निर्मुलन हे नागरिकांसाठी केले जाणे गरजेचे आहे. याची आम्हाला संपूर्ण माहिती आहे. त्यासाठी काम देखील सुरु झाले आहे. जितकं जमेल तितकं लवकर डासांचे प्रमाण कमी व्हावे हाच आमचा प्रयत्न असणार आहे.- माधव जावदे, शहर अभियंता

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHealthआरोग्य