शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एसआरटी पद्धत ठरते वरदान , कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:37 IST

तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे

वसंत भोईरवाडा : तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे. यामध्ये एसआरटी व मिल्चंग पध्दत अशा अनेक पध्दतीने भात शेती करत आहेत. एसआरटी ही पध्दतीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी असल्याने ती आता शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाड्याचा वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून वाशी (नवी मुंबई) व मुंबईच्या बाजारापेठेत त्याला विशेष मागणी आहे. विशेष म्हणजे हा तांदळाचा अगदी लहान दाणा आणि चवीला व पचायला हलका अशी त्याची वैशिष्ट्य असल्याने राज्यभर तो प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी पारंपारिक शेती करीत असतानाच आता आधुनिकतेकडे वळले आहेत. काही शेतकरी भाताच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करून नवनवीन प्रयोग करत आहेत.आता येथील काही शेतकºयांनी एसआरटी (सगुणा राईस टेक्नॉलॉजी) या पद्धतीचा अवलंब करून शेती केली आहे. या पध्दतीत सर्वप्रथम जमिनीत वाफे केले जातात. त्यानंतर पाणी पडल्यानंतर बियाणे वाफ्यात टाकले जाते. त्यामुळे भात लावणी, बेणणीचा खर्च येत नाही. तसेच मजूरही कमी लागतात. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न या पद्धतीत शेतकºयांना घेता येते. एकरी फक्त सात ते आठ हजार रूपयांचा खर्च या पध्दतीत येतो. एका बिजापोटी सुमारे ६५ ते ७० फुटवे आता आल्याने भरघोस उत्पन्न आले आहे.ही पध्दत राबविताना कंपनीचे संचालक चंद्रशेखर भडसावले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ते शेतकºयांना निशुल्क माहिती देतात असेही चौधरी यांनी सांगितले. शेतकºयांनी पारंपारिक शेतीला छेद देत आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते. असे त्यांचे म्हणणे आहे. किशोर चौधरी यांनी भाताबरोबर आपल्या शेतात शेवगा, लिंबू, आंबा व मोगरा यांची झाडे लावली असून त्यातून ते उत्पन्न घेत आहेत.एकदा वाफे घ्या, दहा वर्षे वापराघोणसई येथील प्रयोगशील शेतकरी किशोर चौधरी हे मुंबई महानगर पालिकेतून सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आता आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत.एसआरटी पध्दतीत त्यांनी आपल्या एक एकर जमीनीवर लावली असून आता हे भरपूर पीक आले आहे. या पध्दतीत किमान पिक तयार व्हायला १२० दिवस लागतात. तसेच हळव्या व गरव्या या दोन्ही शेतीत ही पध्दत होते असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय एकदा वाफे तयार केले की, पुढील दहा वर्षांत हेच वाफे वापरता येतात. तसेच वर्षातून या वाफ्यात तीन पिके घेता येतात. भात कापणीनंतर भाजीपाला व कडधान्ये अशी पीक घेता येतात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी