शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एसआरटी पद्धत ठरते वरदान , कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:37 IST

तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे

वसंत भोईरवाडा : तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे. यामध्ये एसआरटी व मिल्चंग पध्दत अशा अनेक पध्दतीने भात शेती करत आहेत. एसआरटी ही पध्दतीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी असल्याने ती आता शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाड्याचा वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून वाशी (नवी मुंबई) व मुंबईच्या बाजारापेठेत त्याला विशेष मागणी आहे. विशेष म्हणजे हा तांदळाचा अगदी लहान दाणा आणि चवीला व पचायला हलका अशी त्याची वैशिष्ट्य असल्याने राज्यभर तो प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी पारंपारिक शेती करीत असतानाच आता आधुनिकतेकडे वळले आहेत. काही शेतकरी भाताच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करून नवनवीन प्रयोग करत आहेत.आता येथील काही शेतकºयांनी एसआरटी (सगुणा राईस टेक्नॉलॉजी) या पद्धतीचा अवलंब करून शेती केली आहे. या पध्दतीत सर्वप्रथम जमिनीत वाफे केले जातात. त्यानंतर पाणी पडल्यानंतर बियाणे वाफ्यात टाकले जाते. त्यामुळे भात लावणी, बेणणीचा खर्च येत नाही. तसेच मजूरही कमी लागतात. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न या पद्धतीत शेतकºयांना घेता येते. एकरी फक्त सात ते आठ हजार रूपयांचा खर्च या पध्दतीत येतो. एका बिजापोटी सुमारे ६५ ते ७० फुटवे आता आल्याने भरघोस उत्पन्न आले आहे.ही पध्दत राबविताना कंपनीचे संचालक चंद्रशेखर भडसावले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ते शेतकºयांना निशुल्क माहिती देतात असेही चौधरी यांनी सांगितले. शेतकºयांनी पारंपारिक शेतीला छेद देत आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते. असे त्यांचे म्हणणे आहे. किशोर चौधरी यांनी भाताबरोबर आपल्या शेतात शेवगा, लिंबू, आंबा व मोगरा यांची झाडे लावली असून त्यातून ते उत्पन्न घेत आहेत.एकदा वाफे घ्या, दहा वर्षे वापराघोणसई येथील प्रयोगशील शेतकरी किशोर चौधरी हे मुंबई महानगर पालिकेतून सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आता आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत.एसआरटी पध्दतीत त्यांनी आपल्या एक एकर जमीनीवर लावली असून आता हे भरपूर पीक आले आहे. या पध्दतीत किमान पिक तयार व्हायला १२० दिवस लागतात. तसेच हळव्या व गरव्या या दोन्ही शेतीत ही पध्दत होते असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय एकदा वाफे तयार केले की, पुढील दहा वर्षांत हेच वाफे वापरता येतात. तसेच वर्षातून या वाफ्यात तीन पिके घेता येतात. भात कापणीनंतर भाजीपाला व कडधान्ये अशी पीक घेता येतात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी