शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

एसआरटी पद्धत ठरते वरदान , कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:37 IST

तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे

वसंत भोईरवाडा : तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे. यामध्ये एसआरटी व मिल्चंग पध्दत अशा अनेक पध्दतीने भात शेती करत आहेत. एसआरटी ही पध्दतीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी असल्याने ती आता शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाड्याचा वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून वाशी (नवी मुंबई) व मुंबईच्या बाजारापेठेत त्याला विशेष मागणी आहे. विशेष म्हणजे हा तांदळाचा अगदी लहान दाणा आणि चवीला व पचायला हलका अशी त्याची वैशिष्ट्य असल्याने राज्यभर तो प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी पारंपारिक शेती करीत असतानाच आता आधुनिकतेकडे वळले आहेत. काही शेतकरी भाताच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करून नवनवीन प्रयोग करत आहेत.आता येथील काही शेतकºयांनी एसआरटी (सगुणा राईस टेक्नॉलॉजी) या पद्धतीचा अवलंब करून शेती केली आहे. या पध्दतीत सर्वप्रथम जमिनीत वाफे केले जातात. त्यानंतर पाणी पडल्यानंतर बियाणे वाफ्यात टाकले जाते. त्यामुळे भात लावणी, बेणणीचा खर्च येत नाही. तसेच मजूरही कमी लागतात. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न या पद्धतीत शेतकºयांना घेता येते. एकरी फक्त सात ते आठ हजार रूपयांचा खर्च या पध्दतीत येतो. एका बिजापोटी सुमारे ६५ ते ७० फुटवे आता आल्याने भरघोस उत्पन्न आले आहे.ही पध्दत राबविताना कंपनीचे संचालक चंद्रशेखर भडसावले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ते शेतकºयांना निशुल्क माहिती देतात असेही चौधरी यांनी सांगितले. शेतकºयांनी पारंपारिक शेतीला छेद देत आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते. असे त्यांचे म्हणणे आहे. किशोर चौधरी यांनी भाताबरोबर आपल्या शेतात शेवगा, लिंबू, आंबा व मोगरा यांची झाडे लावली असून त्यातून ते उत्पन्न घेत आहेत.एकदा वाफे घ्या, दहा वर्षे वापराघोणसई येथील प्रयोगशील शेतकरी किशोर चौधरी हे मुंबई महानगर पालिकेतून सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आता आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत.एसआरटी पध्दतीत त्यांनी आपल्या एक एकर जमीनीवर लावली असून आता हे भरपूर पीक आले आहे. या पध्दतीत किमान पिक तयार व्हायला १२० दिवस लागतात. तसेच हळव्या व गरव्या या दोन्ही शेतीत ही पध्दत होते असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय एकदा वाफे तयार केले की, पुढील दहा वर्षांत हेच वाफे वापरता येतात. तसेच वर्षातून या वाफ्यात तीन पिके घेता येतात. भात कापणीनंतर भाजीपाला व कडधान्ये अशी पीक घेता येतात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी