शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

श्रीनिवास समजूतदार तर गावित निष्ठावान - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 7:03 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील दांडेकर मैदानात शनिवार, 27 एप्रिल रोजी 3:45 वाजता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकरिता प्रचारसभा घेतली.

पालघर/बोर्डी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील दांडेकर मैदानात शनिवार, 27 एप्रिल रोजी 3:45 वाजता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकरिता प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडी या पक्षावर टीका करताना, या पक्षाचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गुंड असा उल्लेख केला. 

या शेवटच्या प्रचार सभेत बोलताना, शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आमिषाला बळी न पडता, बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रारंभ झाला, त्यांनी पालघरची ही सभा जिद्द आणि विचाराने पेटलेली असल्याचा उल्लेख केला.  पक्ष नव्हे तर कंपनी असा बहुजन विकास आघाडीचा उल्लेख करताना, या मतदार संघातील त्यांची गुंडगिरी मोडीत काढणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांचा संपूर्ण रोख हितेंद्र ठाकूर यांच्यावर होता. तर त्यांचा उल्लेख उंदीर असा करून त्यांची शिकार करायला, वाघ नव्हे मांजरच हवी असेही ते म्हणाले. श्रीनिवास वनगाने ही जागा आताच लढविणार नसल्याचे सांगितल्याने, ती गावित यांना देण्यात आली. श्रीनिवास समजूतदार तर गावित निष्ठावान असल्याचे त्यांनी संबोधले. पोटनिवडणुकीत युतीला अधिक मतं मिळाल्याने बविआ तर्फे कोणीही उमेदवार लढण्यास तयार होईना, म्हणूनच त्यांची उमेदवारी घोषित होण्यास उशीर झाल्याचे टीकास्त्र सोडले.

वसई-विरार हा हरितपट्टा असून त्याला भूमाफियांमुळे कीड लागली असल्याचे सांगत, येथील सत्ताधाऱ्यांचा उल्लेख वाळवी म्हणून केला. तर ही कीड या भागाला पोखरून टाकत असल्याने तिला मतदानाचा फवारा मारून नष्ट करायचे असून युतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. येथील लोकसभा मतदारसंघ जिंकून त्यानंतर विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना ताब्यात घ्यायचा मनसुबाही त्यांनी जाहीर केला. तर डहाणू ते विरार रेल्वेचे नियंत्रण गुजरात ऐवजी मुंबईत असावे अशी येथील डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेकडून मागणी होत आहे.

आजपर्यंत ती पूर्ण का झाले नाही. वसईतील 29 गावं वगळण्याचा शब्द दिला असून तो पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तर वाढवण बंदराबाबतच्या मुद्यावर बोलताना स्थानिकांच्या सहमतीशिवाय हे बंदर होणार नाही.जे नानार बाबत घडले तेच स्थानिकांच्या इच्छेनुसार वाढवण बाबतही घडेल असेही ते म्हणाले. श्रमाजीवीचे विवेक पंडित वसई- विरार येथील गुंडगिरीविरुद्ध एकट्याने लढा देत आहेत. त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वारंवार गुंड म्हणून उल्लेख करण्यात आला. तर पालघर जिल्हा मुंबईच्या शेजारी असतानाही या भागात सेनेचे दुर्लक्ष झाल्याची कबुली त्यांनी भाषणातून दिली. मात्र गतवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीपासून येथे लक्ष देण्यास सुरुवात केली असून यापुढे सातत्याने ते दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेpalghar-pcपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेना