शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
3
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
4
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
5
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
6
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
7
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
8
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
9
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
10
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
11
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
12
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
13
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
14
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
15
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
16
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
17
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
18
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
19
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
20
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे आला लावण्यांना वेग; मात्र मजूरटंचाईने कामांना ब्रेक , मजुरी वाढल्याने शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:56 IST

कोरोनाच्या भीतीने अनेक शेतक-यांना मजूरच मिळत नसल्याने शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. वेळेत मजूरच न मिळाल्यास शेतलावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.

विक्रमगड : जून महिन्यात सुरुवातीला कोसळल्यानंतर पावसाने बरेच दिवस दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासूच दमदार बरसणा-या पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील शेतकरी खूश झाले आहेत. तीनचार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने अनेक शेतक-यांना मजूरच मिळत नसल्याने शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. वेळेत मजूरच न मिळाल्यास शेतलावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.तालुक्यातील ९५ गावपाड्यांतून ८६ गावपाड्यांत ७५५८ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची लागवड करण्यात येते. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. आदिवासी शेतकºयांनी पूर्वापार परंपरेप्रमाणे शेतावरील देवदेवतांना नैवेद्य दाखवून कामांना सुरुवात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत विक्र मगड आणि तलवाडा सर्कलमध्ये ६२९.७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विक्रमगड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शेतीच्या कामांना मजूरच मिळत नाहीत. मजुरीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पुरुषांना ३०० रुपये, तर स्त्रियांना २०० रुपये मजुरी दिली जाते. विक्रमगड, डहाणू, वाडा, नाशिक या भागांत मजुरांसाठी शेतकºयांना वणवण करावी लागत आहे.जया, रत्ना, कोलम, गुजरात-११, सुवर्णा, कर्जत-३, मसुरी अशा विविध प्रकारच्या जातींच्या भाताचे उत्पन्न येथील शेतकरी घेतात. यंदा भातबियाणे, खते व मजुरीचे दर वाढल्याने शेती परवडत नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली आहे. खते-बियाणे, मजुरीचा खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. काही शेतकरी अर्धलीने दुसºयांना करण्यास देत असल्याचे चित्र आहे.तालुका कृषी विभागाकडून गावपातळीवर सुधारित शेती करण्यासोबतच चारसूत्री लागवड करण्याचे आवाहन शेतकºयांना केले जात आहे. यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी शेतकºयांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात शासनाच्या कृषी विभागातर्फेभातावरील ज्या भागात पिकांवर रोग पडला असेल, त्या पिकांवरील रोगाचे निदान करून शेतकºयांना मार्गदर्शन केले जाणार आहे. काही गावांत गंध साफळे बसवण्यात येणार आहेत. वीज वितरण कंपनीचा सावळागोंधळ मात्र सुरूच आहे. नेहमीप्रमाणे वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.तलासरीतही शेतीच्या कामांची लगबगतलासरी : तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर परिसरातील सर्वच गावपाड्यांमध्ये लावणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यात ४२ महसुली गावे असून नऊ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रामध्ये भाताची लागवड केली जाते. तालुक्यातील शेतकरी डांगी, कोलम, चार गुजरात, सुवर्णा, सुरती, सात गुजरात, जया, रत्ना, कर्जत, राशीपूनम, सुंदर इत्यादी हलवा, निमगरवा व गरवा या भाताच्या वाणांची लागवड करतात. उंबरगाव, भिलाड येथील काही मजूर मिळाले, तर जास्त मजुरी देऊनही घड्याळाचे काटे बघून काम होत आहे.त्यामुळे शेतकºयांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दादरा-नगर-हवेली येथे औद्योगिकीकरणामुळे येथील मजूर कारखान्यात कामाला जातात. त्यामुळे भातशेतीसाठी मजुरांची टंचाई भासू लागली आहे. निसर्गाचा लहरीपणा, मजुरांचे वाढलेले दर, खताचे आणि यांत्रिक उपकरणाचे वाढलेले दर त्यामानाने भाताला भाव मिळत नसल्याने भातशेती करणे परवडत नाही, असे कुर्झे येथील शेतकरी शंकर भोये यांनी सांगितले. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रpalgharपालघरthaneठाणे