शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वसई तालुक्यात भात लावणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:10 IST

मजुरांची टंचाई : शेतीसाठी मजूर शोधून आणण्याची आली वेळ

पारोळ : वसई तालुक्यात भात लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. सध्या भात लावणी जोरात असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मजुरांची टंचाई भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी भात लावणी करत आहेत. तर काही शेतकरी मजुरांच्या शोधात आहेत. मजुरांचे दरही जास्त असल्याने काही शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यात शेतकऱ्यांनी निरनिराळ्या प्रकारचे भात बियाणे खरेदी केले असून चांगल्या प्रकारे रोपे तयार झाल्याने भात लावणीस सुरुवात झाली आहे. वसई तालुक्यात भाताचे पीक सर्वात जास्त घेतले जाते. नांगरणी करून भात लावणी सुरू आहे. यंदा भाताचे बियाणे, खते तसेच मजुरांचे दर वाढल्याने शेतीचा खर्चही आवाक्याबाहेर गेल्याचे शेतकरी सांगतात. शेतीचा खर्च भरून येत नसल्याने काही शेतकºयांकडून दोन वेळच्या जेवणासह सर्व व्यवस्था केली जाते. त्यामुळे भातलागवड वेळेत होते. मजुरांची टंचाई दूर होते. सध्या शेतकरी आपल्या कुटुंबासह भातलागवडीत मग्न झाला आहे. अनेक शेतकºयांनी जनावरे विकल्याने अनेकांना नांगरजोडी मिळत नाही. त्यामुळे भात लावणी करण्यास त्यांना वेळ लागतो. परिणामी, अनेक जण नांगरणी करण्यासाठी पॉवर टिलरचा उपयोग करतात.पूर्वी वसई तालुक्यात भात लावणीसाठी नाशिक येथील मजूर असायचे. मजुरीचा दर आणि किती दिवस काम या बोलीवर त्यांना भात लावणीसाठी आणले जाई. त्यांची मजुरी महागल्याने, डहाणू तालुक्यातील मजूर आणले जात. मात्र, ते वापी येथे नोकरीला जाऊ लागल्याने वसईत लावणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. मजूर मिळेनासे झाले. त्यामुळे मजुरीच्या दरात वाढ झाली असून त्यांना सध्या २५० ते ३०० दिले जातात.