शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

वसई तालुक्यात भात लावणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:10 IST

मजुरांची टंचाई : शेतीसाठी मजूर शोधून आणण्याची आली वेळ

पारोळ : वसई तालुक्यात भात लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. सध्या भात लावणी जोरात असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मजुरांची टंचाई भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी भात लावणी करत आहेत. तर काही शेतकरी मजुरांच्या शोधात आहेत. मजुरांचे दरही जास्त असल्याने काही शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यात शेतकऱ्यांनी निरनिराळ्या प्रकारचे भात बियाणे खरेदी केले असून चांगल्या प्रकारे रोपे तयार झाल्याने भात लावणीस सुरुवात झाली आहे. वसई तालुक्यात भाताचे पीक सर्वात जास्त घेतले जाते. नांगरणी करून भात लावणी सुरू आहे. यंदा भाताचे बियाणे, खते तसेच मजुरांचे दर वाढल्याने शेतीचा खर्चही आवाक्याबाहेर गेल्याचे शेतकरी सांगतात. शेतीचा खर्च भरून येत नसल्याने काही शेतकºयांकडून दोन वेळच्या जेवणासह सर्व व्यवस्था केली जाते. त्यामुळे भातलागवड वेळेत होते. मजुरांची टंचाई दूर होते. सध्या शेतकरी आपल्या कुटुंबासह भातलागवडीत मग्न झाला आहे. अनेक शेतकºयांनी जनावरे विकल्याने अनेकांना नांगरजोडी मिळत नाही. त्यामुळे भात लावणी करण्यास त्यांना वेळ लागतो. परिणामी, अनेक जण नांगरणी करण्यासाठी पॉवर टिलरचा उपयोग करतात.पूर्वी वसई तालुक्यात भात लावणीसाठी नाशिक येथील मजूर असायचे. मजुरीचा दर आणि किती दिवस काम या बोलीवर त्यांना भात लावणीसाठी आणले जाई. त्यांची मजुरी महागल्याने, डहाणू तालुक्यातील मजूर आणले जात. मात्र, ते वापी येथे नोकरीला जाऊ लागल्याने वसईत लावणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. मजूर मिळेनासे झाले. त्यामुळे मजुरीच्या दरात वाढ झाली असून त्यांना सध्या २५० ते ३०० दिले जातात.