शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

तारापूर येथील उद्योगांची विशेष तपासणी मोहीम पूर्ण, दोषी उद्योगांवर लवकरच उगारणार कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:44 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे.

- पंकज राऊतबोईसर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच दोषी उद्योगांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने कारवाईच्या भीतीचे औद्योगिक क्षेत्रात सध्या भीतीचे वातावरण आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगामधून आणि सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केन्द्रातून (सीईटीपी) मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी हे पुरेशी प्रक्रिया न करताच नवापूरच्या समुद्रात सोडले जाते. याचा किनारपट्टी भागातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ लागल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केल्यानंतर लवादाने विशेष तपासणी मोहीमेसंदर्भात दिलेल्या आदेशानुसार तीन टप्प्यांमध्ये सुमारे ५०० उद्योगांचा सर्व्हे करण्यात आला.या सर्व्हेमध्ये औरंगाबाद, पुणे, मुंबई तसेच ठाणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सुमारे ३२ अधिकारी सहभागी झाले होते. कारखान्यातून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेऊन ते पृथ:करणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते तर हवा मॉनिटरिंग टीमने चिमणीचे सॅम्पलिंग केले. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योगांना दिलेले संमतीपत्र (कन्सेंट)प्रमाणे उत्पादन सुरू आहे का? संमती पत्रातील अटी व शर्तीनुसार उत्पादन घेतले जात आहे का? त्याच बरोबर अटी व शर्तींचे पालन होते आहे की नाही याबाबत बारकाईने तपासणी करण्यात आली.तारापूरच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून जल व वायू प्रदूषण तसेच दुर्गंधीयुक्त वायुमुळे परिसरातील लाखो नागरिक प्रचंड त्रस्त असून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतींमध्ये तारापूर वसाहत देशात प्रथम आहे.सर्व्हे पारदर्शक झाला का ? : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार सदर सर्व्हे झाला असला तरी सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे इथपासून तो सुरू झाल्याची बातमी तारापूर क्षेत्रात वाºयासारखी पसरली होती. त्यामुळे सर्व्हे दरम्यान काही उद्योग देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू होती. तर तपासणीत काही दोष व त्रुटीसमोर येऊ नयेत म्हणून एरवी पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांनी खबरदारी घेतली होती. त्यामुळे या सर्व्हेबाबत संशयाचे वातावरण असून पारदर्शक सर्व्हेे झाला का असे येथील सर्व सामन्यांना विचारले असता ‘नाही’ असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे आता ज्या ५०० उद्योगांचा सर्व्हे झाला आहे त्यापैकी ५० उद्योगांचा कुठलाही गाजावाजा न करता अचानक (सरप्राईज) उच्च पातळीवरून पुन्हा सर्व्हे केला तर सदर सर्व्हे पारदर्शक झाला की नाही ते समोर येण्याची शक्यता असून संशयाचे वातावरणही खºया अर्थाने दूर होईल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार