शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

तारापूर येथील उद्योगांची विशेष तपासणी मोहीम पूर्ण, दोषी उद्योगांवर लवकरच उगारणार कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:44 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे.

- पंकज राऊतबोईसर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच दोषी उद्योगांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने कारवाईच्या भीतीचे औद्योगिक क्षेत्रात सध्या भीतीचे वातावरण आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगामधून आणि सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केन्द्रातून (सीईटीपी) मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी हे पुरेशी प्रक्रिया न करताच नवापूरच्या समुद्रात सोडले जाते. याचा किनारपट्टी भागातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ लागल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केल्यानंतर लवादाने विशेष तपासणी मोहीमेसंदर्भात दिलेल्या आदेशानुसार तीन टप्प्यांमध्ये सुमारे ५०० उद्योगांचा सर्व्हे करण्यात आला.या सर्व्हेमध्ये औरंगाबाद, पुणे, मुंबई तसेच ठाणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सुमारे ३२ अधिकारी सहभागी झाले होते. कारखान्यातून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेऊन ते पृथ:करणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते तर हवा मॉनिटरिंग टीमने चिमणीचे सॅम्पलिंग केले. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योगांना दिलेले संमतीपत्र (कन्सेंट)प्रमाणे उत्पादन सुरू आहे का? संमती पत्रातील अटी व शर्तीनुसार उत्पादन घेतले जात आहे का? त्याच बरोबर अटी व शर्तींचे पालन होते आहे की नाही याबाबत बारकाईने तपासणी करण्यात आली.तारापूरच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून जल व वायू प्रदूषण तसेच दुर्गंधीयुक्त वायुमुळे परिसरातील लाखो नागरिक प्रचंड त्रस्त असून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतींमध्ये तारापूर वसाहत देशात प्रथम आहे.सर्व्हे पारदर्शक झाला का ? : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार सदर सर्व्हे झाला असला तरी सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे इथपासून तो सुरू झाल्याची बातमी तारापूर क्षेत्रात वाºयासारखी पसरली होती. त्यामुळे सर्व्हे दरम्यान काही उद्योग देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू होती. तर तपासणीत काही दोष व त्रुटीसमोर येऊ नयेत म्हणून एरवी पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांनी खबरदारी घेतली होती. त्यामुळे या सर्व्हेबाबत संशयाचे वातावरण असून पारदर्शक सर्व्हेे झाला का असे येथील सर्व सामन्यांना विचारले असता ‘नाही’ असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे आता ज्या ५०० उद्योगांचा सर्व्हे झाला आहे त्यापैकी ५० उद्योगांचा कुठलाही गाजावाजा न करता अचानक (सरप्राईज) उच्च पातळीवरून पुन्हा सर्व्हे केला तर सदर सर्व्हे पारदर्शक झाला की नाही ते समोर येण्याची शक्यता असून संशयाचे वातावरणही खºया अर्थाने दूर होईल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार