शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

पालघरच्या बंद योजना मार्गी लावा; पाणीपुरवठामंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:29 IST

केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या मागणीच्या आधारित धोरणांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. 

पालघर : मुंबई, मीरा-भाईंदरला पाणी पुरवणारा पालघर जिल्हा मात्र तहानलेला राहत असल्याने मुख्यमंत्री चिंतित असून जिल्ह्यातील ९० टक्के बंद अवस्थेतील योजना येत्या दोन महिन्यांत मार्गी न लागल्यास कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड दम पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीदरम्यान दिला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या मागणीच्या आधारित धोरणांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. 

जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जव्हार तालुक्यात १४, डहाणू ३१, तलासरी ३, पालघर ७, मोखाडा ९, वसई १, वाडा ६ तर विक्रमगड २ अशा एकूण ७३ पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू असताना एकाही योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा लोकांपर्यंत होत नसल्याची बाब उपस्थित लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.  जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र युती असून ठेकेदारच पाणीपुरवठा विभाग चालवितात काय, असा संतप्त सवाल आमदार सुनील भुसारा यांनी उपस्थित केला.

मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसई-विरारला पाणी पुरविणारा आमचा जिल्हा मात्र कित्येक वर्षांपासून तहानलेला राहिला असून जिल्ह्यातील एकही पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याचे सांगून धरण क्षेत्रातून विस्थापित झालेल्यांचे अजून पुनर्वसन झाले नसल्याची बाब खासदार राजेंद्र गावितांनी निदर्शनास आणून दिली.

विश्वास फाउंडेशनचे डॉ. विश्वास वळवी यांनी मंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नातून पाणीपुरवठामंत्र्यांना पालघरला आणण्यात यश मिळविले. यावेळी जि.प. अध्यक्षा भारती कामडी, माविम अध्यक्षा ज्योती ठाकरे, आ. श्रीनिवास वणगा, राजेश पाटील, सेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेश शहा, ज्योती मेहेर, तालुकाध्यक्ष विकास मोरे, सभापती सुशील चुरी, काशिनाथ चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ आदी उपस्थित होते. 

टॅग्स :palgharपालघर