शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

सोशल इंटिग्रीटीला निधीअभावी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:44 IST

जातीधर्माच्या भिंती तोडून एकसंध समाजनिर्मितीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सुरू केलेल्या मदतीला पैशा

रविंद्र साळवे मोखाडा : जातीधर्माच्या भिंती तोडून एकसंध समाजनिर्मितीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सुरू केलेल्या मदतीला पैशा अभावी ब्रेक बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सद्य:स्थितीत मदतीसाठी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे १६५ प्रस्ताव लटकलेलीच आहेत. याबाबत दैनिक लोकमत मध्ये २७ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते परंतु महिन्याभराचा कालावधी उलटूनही पालघर समाज कल्याण विभागाला जाग आलेली नाही ही बाब खेदाने म्हणावी लागेल२०१७-१८ या आर्थिक वर्षात केंद्र शासन ४० लाख व महाराष्ट्र राज्य ४० लाख अशी ८० लाखाची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात केंद्रा कडून २८ लाख अनुदान आले तर राज्य सरकार कडूनक निधीच उपलब्ध झालेला नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ९७ प्रकरण सादर केली. पैकी ६१ प्रकरणे मंजूर झाली व ३७ प्रकरणे शिल्लक राहिली यासाठी फक्त शासनाने १४ लाख ९५ हजार मंजूर केले२०१५-१६ या आर्थिक वर्षात ७१ लाभार्थी असून शासनकडे ३१ लाख ३० हजार अनुदानाची मागणी करण्यात आली परंतु अनुदान उपलब्ध झाले नाही. २०१७-१८ चे अनुदान केवळ केंद्र सरकार कडून आले आहे परंतु राज्य सरकार कडून अद्याप पर्यंत निधी आलेलच नाही यामुळे शासनाने तुटपुंजे अनुदान देऊन या योजनेचा फज्जा उडवलेला आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहेएकीकडे या योजनेसाठी मोदी व केंद्रीय समाज कल्याण विभागाने देशात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नव्याने ही योजना कार्यान्वित करून ‘डॉ. आंबेडकर स्कीम फॉर सोशल इंटीग्रेशन थ्रू इंटरकास्ट मॅरेज’ असे नामकरण करुन या योजनेअंतर्गत अडीच लाख रु पये अशी अनुदानात वाढ केली आहे परंतु दुसरीकडे मात्र निधी अभावी गेल्या २ ते३ वर्षात या प्रकरणांना भरीव निधी न मिळाल्याने धूळखात पडली आहेत.अस्पृश्यता निवारणार्थ आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ३ सप्टेंबर १९५९ पासून ही योजना कार्यान्वित केली. महाराष्ट्र शासनाने ३० जानेवारी १९९९ च्या शासन निर्णयाद्वारे या योजनेच्या आर्थिक साहाय्यात वाढ करून १५ हजार रु पये आर्थिक साहाय्य देणे सुरू केले होते. तथापि, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश, चंदीगड आदी राज्यांत अशा जोडप्यांना ५० हजारांपर्यंत अनुदान देण्यात येते. याच धर्तीवर महाराष्ट्रातही १ फेब्रुवारी २०१० पासून अर्थसाहाय्य वाढवून ५० हजार केले आहे.