शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

वसईत सहा नवी पोलीस ठाणी

By admin | Updated: January 20, 2016 01:48 IST

लोकसंख्येसोबतच गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून यापूर्वी वसई-विरार परिसरात चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असतानाच आणखी सहा नवी पोलीस ठाणी

शशी करपे,  वसईलोकसंख्येसोबतच गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून यापूर्वी वसई-विरार परिसरात चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असतानाच आणखी सहा नवी पोलीस ठाणी आणि दोन उपअधिक्षक कार्यालये निर्माण करावीत असा नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर आणखी दोन उपअधिक्षक कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर वसईत एकूण १३ पोलीस ठाण्यांसह तीन उपअधिक्षक कार्यालये तयार होतील. तर रेल्वे पोलिसांनाही विरार, नालासोपारा आणि भार्इंदर अशी तीन नवी पोलीस ठाणी हवी आहेत. सध्या वसईत तालुक्यात वसई, माणिकपूर, नालासोपारा, विरार, तुळींज, वालीव आणि अर्नाळा सागरी पोलीस मिळून एकूण सात पोलीस ठाणी आहेत. तसेच एक उपअधिक्षक आणि एक अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय आहे. या सर्वांचे मिळून वसईत अवघे ६३४ पोलीस बख आहे. वसई तालुक्याची लोकसंख्या १८ लाखाहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे तालुक्यात गुन्हेगारी आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात तालुक्यात ४४ खून, ४४५ घरफोड्या, १३३ सोनसाखळी चोरींच्या घटनेसह बलात्कार, मारामारी याह अनेक गुन्ह्णांची संख्या मोठी आहे. अपुरे पोलीस बळ आणि साधनसामुग्रीमुळे गुन्हेगारी रोखण्यास पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत. विरार पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी ८७५ गन्हयांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारशेच्या घरात गुन्हयांची नोंद झाली आहे. एका पोलीस ठाण्यात वर्षभरात जास्तीत जास्त तीनशे गुन्ह्णांची नोंद झाली पाहिजे असा पोलीस कार्यपद्धतीचा संकेत आहे. यापेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले तर तपास करणे अवघड होऊन बसते आणि गुन्ह्णांची उकल होत नसल्याने तक्रारदारांना न्याय मिळत नाही. त्यासाठी पोलीस विभागाने याआधी मांडवी, आचोळे आणि पेल्हार ही नवी तीन पोलीस ठाणी तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देऊन पोलीस महासंचालकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. आता पोलिसांनी विरार पश्चिम, कणेर आणि नायगाव पूर्व अशा आणखी तीन नव्या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठवला आहे. नव्या प्रस्तावामुळे जास्त गुन्हेगारी असलेल्या विरारसह तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्यांचे विभाजन होणार आहे. वसई तालुक्यासाठी सध्या एकच पोलीस उपअधिक्षक आहेत. पोलीस ठाण्यांच्या वाढीसोबत त्याचे विभाजन करून नालासोपारा आणि विरार या दोन ठिकाणी पोलीस उपअधिक्षक कार्यालये तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हे प्रस्ताव संमत झाल्यास वसई तालुक्यात एकूण १३ पोलीस ठाणी आणि तीन उपअधिक्षक कार्यालये निर्माण होतील. दरम्यान, मीरा रोड, भाईदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा रेल्वे स्टेशनसाठी मिळून वसईत एकच पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याचे संख्याबळ अवघे १५० आहे. गेल्या वर्षभरात यापरिसरात रेल्वे अपघातात २६४ जणांचे प्राण गेले आणि २५४ जण जखमी झाले. तर वर्षभरात २१३ गुन्हे नोंदले गेले. या सातही स्टेशनमधून दररोज किमान दहा लाख प्रवाशी प्रवास करतात. पण, पोलीस बळ कमी असल्याने रेल्वे पोलीस प्रवाशांना सेवा देण्यात अपुरे पडताना दिसत आहे. त्यासाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे विभाजन करून विरार, नालासोपारा आणि भार्इंदर अशी तीन पोलीस ठाणी तयार करावीत असा प्रस्ताव पाठवला आहे.