शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

वसईत सहा नवी पोलीस ठाणी

By admin | Updated: January 20, 2016 01:48 IST

लोकसंख्येसोबतच गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून यापूर्वी वसई-विरार परिसरात चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असतानाच आणखी सहा नवी पोलीस ठाणी

शशी करपे,  वसईलोकसंख्येसोबतच गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून यापूर्वी वसई-विरार परिसरात चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असतानाच आणखी सहा नवी पोलीस ठाणी आणि दोन उपअधिक्षक कार्यालये निर्माण करावीत असा नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर आणखी दोन उपअधिक्षक कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर वसईत एकूण १३ पोलीस ठाण्यांसह तीन उपअधिक्षक कार्यालये तयार होतील. तर रेल्वे पोलिसांनाही विरार, नालासोपारा आणि भार्इंदर अशी तीन नवी पोलीस ठाणी हवी आहेत. सध्या वसईत तालुक्यात वसई, माणिकपूर, नालासोपारा, विरार, तुळींज, वालीव आणि अर्नाळा सागरी पोलीस मिळून एकूण सात पोलीस ठाणी आहेत. तसेच एक उपअधिक्षक आणि एक अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय आहे. या सर्वांचे मिळून वसईत अवघे ६३४ पोलीस बख आहे. वसई तालुक्याची लोकसंख्या १८ लाखाहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे तालुक्यात गुन्हेगारी आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात तालुक्यात ४४ खून, ४४५ घरफोड्या, १३३ सोनसाखळी चोरींच्या घटनेसह बलात्कार, मारामारी याह अनेक गुन्ह्णांची संख्या मोठी आहे. अपुरे पोलीस बळ आणि साधनसामुग्रीमुळे गुन्हेगारी रोखण्यास पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत. विरार पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी ८७५ गन्हयांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारशेच्या घरात गुन्हयांची नोंद झाली आहे. एका पोलीस ठाण्यात वर्षभरात जास्तीत जास्त तीनशे गुन्ह्णांची नोंद झाली पाहिजे असा पोलीस कार्यपद्धतीचा संकेत आहे. यापेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले तर तपास करणे अवघड होऊन बसते आणि गुन्ह्णांची उकल होत नसल्याने तक्रारदारांना न्याय मिळत नाही. त्यासाठी पोलीस विभागाने याआधी मांडवी, आचोळे आणि पेल्हार ही नवी तीन पोलीस ठाणी तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देऊन पोलीस महासंचालकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. आता पोलिसांनी विरार पश्चिम, कणेर आणि नायगाव पूर्व अशा आणखी तीन नव्या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठवला आहे. नव्या प्रस्तावामुळे जास्त गुन्हेगारी असलेल्या विरारसह तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्यांचे विभाजन होणार आहे. वसई तालुक्यासाठी सध्या एकच पोलीस उपअधिक्षक आहेत. पोलीस ठाण्यांच्या वाढीसोबत त्याचे विभाजन करून नालासोपारा आणि विरार या दोन ठिकाणी पोलीस उपअधिक्षक कार्यालये तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हे प्रस्ताव संमत झाल्यास वसई तालुक्यात एकूण १३ पोलीस ठाणी आणि तीन उपअधिक्षक कार्यालये निर्माण होतील. दरम्यान, मीरा रोड, भाईदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा रेल्वे स्टेशनसाठी मिळून वसईत एकच पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याचे संख्याबळ अवघे १५० आहे. गेल्या वर्षभरात यापरिसरात रेल्वे अपघातात २६४ जणांचे प्राण गेले आणि २५४ जण जखमी झाले. तर वर्षभरात २१३ गुन्हे नोंदले गेले. या सातही स्टेशनमधून दररोज किमान दहा लाख प्रवाशी प्रवास करतात. पण, पोलीस बळ कमी असल्याने रेल्वे पोलीस प्रवाशांना सेवा देण्यात अपुरे पडताना दिसत आहे. त्यासाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे विभाजन करून विरार, नालासोपारा आणि भार्इंदर अशी तीन पोलीस ठाणी तयार करावीत असा प्रस्ताव पाठवला आहे.