शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

आंबेडकर जयंतीला सिंधूताई प्रमुख वक्त्या

By admin | Updated: April 13, 2016 01:53 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात अनाथांची माय असलेल्या सिंधूताई सपकाळ या प्रमुख वक्त्या असणार आहेत. त्यांचे विचार

जव्हार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात अनाथांची माय असलेल्या सिंधूताई सपकाळ या प्रमुख वक्त्या असणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी जव्हार तालुक्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातील जनता मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. जव्हार, मोखाडा, विक्रमगड सारख्या अतिदुर्गम भागातील जनतेने आज पर्यंत सिंधुताईंचे नाव ऐकले होते, पुस्तके, टी.व्ही.,च्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाबाबत माहिती होती. पण त्यांचे विचार ऐकण्याची संधी गुरुवारी लाभणार आहे.त्यांना ऐकणे ही सुवर्णसंधी असून त्यांचे व्याख्यान प्रेरणादायी असतेच परंतु त्यांचा जीवनातील खडतर प्रवास, त्यांचे अनुभव हे वाचण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ऐकणे हा एक वेगळाच अनुभव असतो. जव्हार, मोखाडा, विक्रमगड सारख्या भागात अनाथ बालकांचे प्रमाण जरी कमी असले तरी शाळाबाह्य मुले, रोजगारासाठी पालकांचे सतत होणारे स्थलांतर, त्यामुळे होणारी बालकांची परवड ही अनाथ मुलांपेक्षा वेगळी नसते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आई-बाप त्यांना सोडून चार-चार महिने बाहेर असतात. अशा वेळी त्या बालकांना अंगणवाड्या हाच आधार वाटतो. त्यामुळे अशा बालकांसाठी शासनाकडून अथवा स्वयंसेवी संस्थांनी सिंधूताई सारख्या तात्पुरत्या आधार शाळा, निवास व भोजन व्यवस्था केली तर ते सिंधूताईंच्या येण्याचे खऱ्या अर्थाने फलित ठरेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.या उत्सव समितीचे सभापती नगरसेवक गणेश रजपूत हे असणार आहेत. या दिवशी विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले आहे. स. १० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष संदीप वैद्य, सभापती रजपूत, कार्याध्यक्ष राजेंद्र शिरसाठ व उत्सव समिती पुष्पहार अर्पण करेल. स. १०.१५ वा. बुद्धवंदन व सूत्रपठण श्रामनेर जयेश लोखंडे व प्रभाकर बल्लाळ हे करतील. त्या नंतर सिंधूताईंचे व्याख्यान होणार आहे. दु.४ ते रा.१० चित्ररूप भव्य मिरवणूक होणार असल्याची माहिती रजपूत यांनी दिली. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आ. कृष्णा घोडा, आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष निलेश सांबरे, मा.नगराध्यक्ष दिनेश भट, सामाजिक कार्यकर्ते गोविंद बल्लाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असल्याचे मुख्यधिकारी व संयोजक वैभव विधाते यांनी सांगितले.