शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंतीला सिंधूताई प्रमुख वक्त्या

By admin | Updated: April 13, 2016 01:53 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात अनाथांची माय असलेल्या सिंधूताई सपकाळ या प्रमुख वक्त्या असणार आहेत. त्यांचे विचार

जव्हार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात अनाथांची माय असलेल्या सिंधूताई सपकाळ या प्रमुख वक्त्या असणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी जव्हार तालुक्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातील जनता मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. जव्हार, मोखाडा, विक्रमगड सारख्या अतिदुर्गम भागातील जनतेने आज पर्यंत सिंधुताईंचे नाव ऐकले होते, पुस्तके, टी.व्ही.,च्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाबाबत माहिती होती. पण त्यांचे विचार ऐकण्याची संधी गुरुवारी लाभणार आहे.त्यांना ऐकणे ही सुवर्णसंधी असून त्यांचे व्याख्यान प्रेरणादायी असतेच परंतु त्यांचा जीवनातील खडतर प्रवास, त्यांचे अनुभव हे वाचण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ऐकणे हा एक वेगळाच अनुभव असतो. जव्हार, मोखाडा, विक्रमगड सारख्या भागात अनाथ बालकांचे प्रमाण जरी कमी असले तरी शाळाबाह्य मुले, रोजगारासाठी पालकांचे सतत होणारे स्थलांतर, त्यामुळे होणारी बालकांची परवड ही अनाथ मुलांपेक्षा वेगळी नसते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आई-बाप त्यांना सोडून चार-चार महिने बाहेर असतात. अशा वेळी त्या बालकांना अंगणवाड्या हाच आधार वाटतो. त्यामुळे अशा बालकांसाठी शासनाकडून अथवा स्वयंसेवी संस्थांनी सिंधूताई सारख्या तात्पुरत्या आधार शाळा, निवास व भोजन व्यवस्था केली तर ते सिंधूताईंच्या येण्याचे खऱ्या अर्थाने फलित ठरेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.या उत्सव समितीचे सभापती नगरसेवक गणेश रजपूत हे असणार आहेत. या दिवशी विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले आहे. स. १० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष संदीप वैद्य, सभापती रजपूत, कार्याध्यक्ष राजेंद्र शिरसाठ व उत्सव समिती पुष्पहार अर्पण करेल. स. १०.१५ वा. बुद्धवंदन व सूत्रपठण श्रामनेर जयेश लोखंडे व प्रभाकर बल्लाळ हे करतील. त्या नंतर सिंधूताईंचे व्याख्यान होणार आहे. दु.४ ते रा.१० चित्ररूप भव्य मिरवणूक होणार असल्याची माहिती रजपूत यांनी दिली. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आ. कृष्णा घोडा, आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष निलेश सांबरे, मा.नगराध्यक्ष दिनेश भट, सामाजिक कार्यकर्ते गोविंद बल्लाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असल्याचे मुख्यधिकारी व संयोजक वैभव विधाते यांनी सांगितले.