शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

‘शुभमंगल कर्ज योजने’ला आॅफलाईनचा फटका, शेतकरी झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:49 PM

शेतक-याच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ‘शुभमंगल योजने’ अंतर्गत तीन लाखाचे कर्ज दिले जाते.

कल्याण : शेतक-याच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ‘शुभमंगल योजने’ अंतर्गत तीन लाखाचे कर्ज दिले जाते. मात्र या कर्जासाठी शेतकºयाच्य सातबारावर तारणासाठी जो बोजा चढवावा लागतो. त्याची प्रक्रिया आॅनलाइन ठेवली आहे. आॅनलाईनचा सर्व्हर अनेक वेळा डाऊन असतो. त्यामुळे शेतकºयांची कर्ज प्रकरणे मार्गी लागत नसल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या.राज्य सरकारने शेतकºयांच्या सातबाºयावरील फेरफाराची प्रक्रिया आॅनलाईन केली. त्याला तीन वर्षे उलटून गेली. शेतकºयांच्या मुलामुलींच्या लग्नकार्यासाठी शुभमंगल योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यासाठी तारण ठेवावे लागते. घर अथवा त्याच्याकडे असलेल्या जमिनीचा काही भाग तो तारण ठेवू शकतो. याच प्रक्रियेला सातबारावर बोजा चढविणे असे म्हटले जाते. ही प्रक्रिया आॅनलाईन आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे कर्ज प्रकरणे लवकर मार्गी लावणे, त्यात पारदर्शकता आणणे हा सरकारी यंत्रणांचा मुख्य उद्देश आहे. मात्र याच उद्देशाला हरताळ फासला जात आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने आॅनलाईन बोजा चढविण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिमाणी मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्ज घेण्यात अडचण उद््भवते. यापूर्वी बोजा चढविण्याचे काम तलाठ्यांकडे होते. आता प्रक्रियाच आॅनलाईन असल्याने तलाठी लेखी बोजा चढविण्याची प्रक्रियेत कानावर हात ठेवतात. सातबाºयावर थेट बोजा चढवून दिला जात नाही. शेतकºयाच्या शेतजमीनीत अनेक हिस्सेदार असतील, तर बोजा चढविण्याची प्रक्रिया अधिक किचकट व डोकेदुखीची होते. शेतजमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणातही हस्तक्षेप करता येत नाही. आॅनलाईन प्रक्रियेऐवजी तलाठ्यामार्फत त्याची पूर्तता केल्यास शुभमंगल योजनेची रखडलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागू शकतात. अथवा सर्व्हर डाऊन होणार नाही. तो सातत्याने नीट चालत राहील, याची काळजी सरकारी यंत्रणेने घेतली पाहिजे. ती घेतली जात नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. सध्या लग्नसराई आहे. अनेक शेतकºयांकडे सोयरिक जुळलेली आहे. साखरपुडे झालेले आहेत. शुभमंगल योजनेतून कर्ज मिळेल या आशेवर त्यांनी लग्नाची जुळवाजुळव केली आहे. पण वेळेत कर्जच मिळाले नाही, तर लग्नाचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न घेसरचे गजाजन मांगरुळकर यांनी केला.