शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
4
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
5
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
6
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
7
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
8
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
9
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
10
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
11
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
12
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
13
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
14
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
15
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
16
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
17
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
19
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

सेना-भाजपातील श्रेयवाद शमला, प्रशासनावर फोडले खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:23 AM

मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले असताना त्याचे श्रेय घेण्या वरुन शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये पेटलेला वाद अखेर मंगळवारी शमला.

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले असताना त्याचे श्रेय घेण्या वरुन शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये पेटलेला वाद अखेर मंगळवारी शमला. शिवसेनेने धरणे धरत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर पालिकेने पुन्हा कामाला सुरवात केली. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविकेने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सोमवारपासून सुरु केलेले धरणे आंदोलन मागे घेतले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शांतीनगर सेक्टर दोनच्या जलकुंभातुन परिसरातील सेक्टर १, २, शांती विहार, पुनम सागर कॉम्प्लेक्स आदी भागासाठी ४०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरु झाले आहे. पण सोमवारी दुपारी कामाचे श्रेय घेणे आणि नारळ फोडण्यावरुन प्रभागातील स्थानिक शिवसेना नगरसेविका दिप्ती भट आणि भाजपाचे स्थानिक नगरसेवक दिनेश जैन, अश्विन कासोदरीया व हेतल परमार यांच्यात बिनसले. त्यातून भाजपा नगरसेवकांनी ठेकेदाराला काम बंद करायला लावत मंळवारी सकाळी महापौरांच्या हस्ते भुमिपूजन करुन काम सुरु करण्याचा पावित्रा घेतला.काम बंद झाल्याने शिवसेना नगरसेविका भट यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत जलवाहिनी टाकण्याचे पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. पण पालिका अधिकारी आणि ठेकेदाराकडून काम सुरु केले न गेल्याने भट यांनी कामाच्याच ठिकाणी सोमवारपासून धरणे धरले. रात्रभर आणि मंगळवारी दुपारपर्यंत त्या धरणे धरुन होत्या. खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आदींनी काम बंद केल्याबद्दल प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला. तर माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, माजी उपमहापपौर प्रवीण पाटील, माजी गटनेत्या नीलम ढवण, माजी विरोधी पक्षनेत लक्ष्मण जंगम, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शंकर वीरकर, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, धनेश पाटील आदींनी भट यांच्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.अखेर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे हे मंगळवारी दुपारी भाजपा नगरसेवक दिनेश जैन व हेतल परमार यांना घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी आले. नगरसेवकांना कामाची माहिती दिली नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच चौघे नगरसेवक एकत्र मिळून नारळ फोडू, अशी सूचना त्यांनी केली. त्यावरुन पुन्हा वादविवाद सुरु झाला. पुन्हा नारळ फोडायची गरज नाही, काम सुरु करा, असा पावित्रा भट आदींनी घेतला. शेवटी जैन व परमार या नगरसेवकांनीही नारळ फोडण्याचा मुद्दा बाजुला ठेवला. अखेर जलवाहिनी टाकण्याच्या कामास पुन्हा सुरवात करण्यात आली आणि भट यांचे धरणे आंदोलन संपुष्टात आले.आधी दोन नगरसेवकांचा प्रभाग होता, तेव्हाही वेगवेगळ््या पक्षाच्या नगरसेवकांचे एकमेकांशी पटत नव्हते. आता चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने वाद जास्तच वाढणार असल्याची ही सुरूवात मानली जाते. नगरसेवकांकडून सामंजस्य दाखवले जाणे आवश्यक असून मुळात प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेमुळे वाद विकोपाला जातील, अशी भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा