शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

धक्कादायक वास्तव :निर्बीजीकरण केंद्रात रेबीजग्रस्त श्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 4:06 AM

वसई-विरार शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्राद्वारे आॅक्टोबर २०१८ पर्यंत अंदाजे २४,२५० हजारांच्या आसपास श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे

वसई : वसई-विरार शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्राद्वारे आॅक्टोबर २०१८ पर्यंत अंदाजे २४,२५० हजारांच्या आसपास श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव सुरुच आहे. गत आठवड्यात या निर्बीजीकरण केंद्रात पाच श्वानांचा भुकेमूळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, निर्बीजीकरणासाठी आणण्यात आलेल्या श्वानांसोबत रॅबीजग्रस्त श्वानही येथेच कोंबल्याची धक्कादायक माहिती प्राणिमित्रांकडून सांगण्यात आली. याबाबत सदर केंद्रचालकाविरोधात तक्र ार करुनही पोलिस कारवाई होताना दिसत नाही.महापालिकेच्या अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या ३५ हजारांहून अधिक भटकी श्वान आहेत. पंरतू हा आकडा ७०,००० असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेकडे नवघर पूर्व येथे एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यात दररोज १५ ते २० श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. परंतु हे केंद्रही आता अपुरे पडत आहे. या केंद्रात गेल्या आठवड्यात पाच श्वानांचा भुकेमूळे मृत्यू झाल्याचा आरोप प्राणिमित्र संघटनेकडून करण्यात आल्यामुळे हे निर्बीजीकरण केंद्र प्रकाशात आले होते.या मृत पाच श्वानांपैकी दोन श्वानांचे मृतदेह परळ केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवून आठवडा उलटला तरी अजून अहवाल आला नाही. याबाबत अधिक माहिती घेतली असता शवविच्छेदनासाठी पैसे कोण खर्च करणार हा प्रश्न समोर आला आहे. केंद्रचालक म्हणतात की, हा खर्च आंम्ही करणार नाहीत, प्राणिमित्र संघटनेवाले सांगतात की, हा खर्च महानगरपालिकेने करायला हवा. तर पोलिस प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहेत.हा वाद सुरू असतांना आता प्राणिमित्र संघटनांनी नवीन विषयाला वाचा फोडत या निर्बीजीकरण केंद्राची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.दोन दिवसांपूर्वी प्राणिमित्र संघटनेचे कार्यकर्ते निर्बीजीकरण केंद्रात गेले असता केंद्रचालकाने विजीटर्सची वेळ संपल्याची सांगत त्यांना प्रवेश नाकारला होता. मात्र प्राणिमित्र संघटनांनी रजिस्टर नोंदवही तपासली असता, वहितील काही पाने फाडली गेल्याचे निदर्शनास आले होते. याच वेळी निर्बीजीकरण केंद्रात आणलेल्या श्वानांसोबत असलेल्या एका लहान वयाच्या श्वानाबद्दल माहिती घेतली असता तो श्वान २५ ते ३० लोकांना चावल्यामूळे तो रेबीजग्रस्त असावा अशी शंका डॉक्टरांना वाटत असतानाच तो अचानक मृत्यूमुखी पडला. त्यामूळे तो श्वान रेबीजग्रस्त होता, तसेच त्याला निर्बीजीकरणासाठी आणलेल्या इतर श्वानांसोबत कसे ठेवू शकता असा प्रश्न त्यांनी केंद्रचालक दगडू लोंढे यांना विचारला. मात्र, याबाबत त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे प्राणीमीत्रांनी माणिकपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र, अजूनही पोलिसांनी तक्र ार दाखल केलेली नाही. मृत रेबीजग्रस्त श्वान उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.कागदपत्रे सादर करा महापालिका खर्च देईल!आता प्राणीमीत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपण हा शवविच्छेदनाचा खर्च केल्याचे सांगितले आहे. याबाबत प्रभारी सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी प्राणीमीत्रांनी याबाबत कागदपत्रे सादर करावी, पालिका खर्च देईल असे सांगितले आहे.या निर्बीजीकरण केंद्रात तीन ते चार महिन्यांच्या छोट्या श्वानांच्या पिल्लांवरही नसबंदी शस्त्रक्रीया करण्यात येत असल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला असून नवघर पूर्व येथे असणाऱ्या या निर्बीजिकरण केंद्राच्या चौकशीची मागणी केली आहे.रोगी व जखमी श्वानांसाठी निर्बीजीकरण केंद्रात वेगळा वॉर्ड बनविण्यात यावा अशी केंद्र चालकाची मागणी आहे. प्राण्यांची शिरगणती सुरू आहे. अहवाल आल्यानंतर शहरात किती श्वान आहेत याचा अंदाज येईल. प्रास्तावित इतर दोन निर्बीजीकरण केंद्र सुरू झाल्यावर शहरातील श्वानांच्या वाढत्या संख्येवर आळा बसेल.- सुखदेव दरवेशी,प्रभारी सहाय्यक आयुक्तया निर्बीजीकरण केंद्रातील सर्वच व्यवहार संशयास्पद आहे. रेबीजग्रस्त श्वान व नसबंदी करण्यासाठी आणलेले श्वान एकाच वॉर्डमध्ये ठेवले जातात. वयाने लहान श्वानांवरही नसबंदी शस्त्रक्रीया केली जात असल्याचा संशय आहे. पोलिसही सहकार्य करीत नाहीत.- मितेश जैन, अ‍ॅनीमल वेल्फेअरबोर्ड आॅफ इंडिया, सदस्य

टॅग्स :Vasai Virarवसई विरार