शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

धक्कादायक वास्तव :निर्बीजीकरण केंद्रात रेबीजग्रस्त श्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 04:07 IST

वसई-विरार शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्राद्वारे आॅक्टोबर २०१८ पर्यंत अंदाजे २४,२५० हजारांच्या आसपास श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे

वसई : वसई-विरार शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्राद्वारे आॅक्टोबर २०१८ पर्यंत अंदाजे २४,२५० हजारांच्या आसपास श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव सुरुच आहे. गत आठवड्यात या निर्बीजीकरण केंद्रात पाच श्वानांचा भुकेमूळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, निर्बीजीकरणासाठी आणण्यात आलेल्या श्वानांसोबत रॅबीजग्रस्त श्वानही येथेच कोंबल्याची धक्कादायक माहिती प्राणिमित्रांकडून सांगण्यात आली. याबाबत सदर केंद्रचालकाविरोधात तक्र ार करुनही पोलिस कारवाई होताना दिसत नाही.महापालिकेच्या अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या ३५ हजारांहून अधिक भटकी श्वान आहेत. पंरतू हा आकडा ७०,००० असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेकडे नवघर पूर्व येथे एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यात दररोज १५ ते २० श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. परंतु हे केंद्रही आता अपुरे पडत आहे. या केंद्रात गेल्या आठवड्यात पाच श्वानांचा भुकेमूळे मृत्यू झाल्याचा आरोप प्राणिमित्र संघटनेकडून करण्यात आल्यामुळे हे निर्बीजीकरण केंद्र प्रकाशात आले होते.या मृत पाच श्वानांपैकी दोन श्वानांचे मृतदेह परळ केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवून आठवडा उलटला तरी अजून अहवाल आला नाही. याबाबत अधिक माहिती घेतली असता शवविच्छेदनासाठी पैसे कोण खर्च करणार हा प्रश्न समोर आला आहे. केंद्रचालक म्हणतात की, हा खर्च आंम्ही करणार नाहीत, प्राणिमित्र संघटनेवाले सांगतात की, हा खर्च महानगरपालिकेने करायला हवा. तर पोलिस प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहेत.हा वाद सुरू असतांना आता प्राणिमित्र संघटनांनी नवीन विषयाला वाचा फोडत या निर्बीजीकरण केंद्राची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.दोन दिवसांपूर्वी प्राणिमित्र संघटनेचे कार्यकर्ते निर्बीजीकरण केंद्रात गेले असता केंद्रचालकाने विजीटर्सची वेळ संपल्याची सांगत त्यांना प्रवेश नाकारला होता. मात्र प्राणिमित्र संघटनांनी रजिस्टर नोंदवही तपासली असता, वहितील काही पाने फाडली गेल्याचे निदर्शनास आले होते. याच वेळी निर्बीजीकरण केंद्रात आणलेल्या श्वानांसोबत असलेल्या एका लहान वयाच्या श्वानाबद्दल माहिती घेतली असता तो श्वान २५ ते ३० लोकांना चावल्यामूळे तो रेबीजग्रस्त असावा अशी शंका डॉक्टरांना वाटत असतानाच तो अचानक मृत्यूमुखी पडला. त्यामूळे तो श्वान रेबीजग्रस्त होता, तसेच त्याला निर्बीजीकरणासाठी आणलेल्या इतर श्वानांसोबत कसे ठेवू शकता असा प्रश्न त्यांनी केंद्रचालक दगडू लोंढे यांना विचारला. मात्र, याबाबत त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे प्राणीमीत्रांनी माणिकपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र, अजूनही पोलिसांनी तक्र ार दाखल केलेली नाही. मृत रेबीजग्रस्त श्वान उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.कागदपत्रे सादर करा महापालिका खर्च देईल!आता प्राणीमीत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपण हा शवविच्छेदनाचा खर्च केल्याचे सांगितले आहे. याबाबत प्रभारी सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी प्राणीमीत्रांनी याबाबत कागदपत्रे सादर करावी, पालिका खर्च देईल असे सांगितले आहे.या निर्बीजीकरण केंद्रात तीन ते चार महिन्यांच्या छोट्या श्वानांच्या पिल्लांवरही नसबंदी शस्त्रक्रीया करण्यात येत असल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला असून नवघर पूर्व येथे असणाऱ्या या निर्बीजिकरण केंद्राच्या चौकशीची मागणी केली आहे.रोगी व जखमी श्वानांसाठी निर्बीजीकरण केंद्रात वेगळा वॉर्ड बनविण्यात यावा अशी केंद्र चालकाची मागणी आहे. प्राण्यांची शिरगणती सुरू आहे. अहवाल आल्यानंतर शहरात किती श्वान आहेत याचा अंदाज येईल. प्रास्तावित इतर दोन निर्बीजीकरण केंद्र सुरू झाल्यावर शहरातील श्वानांच्या वाढत्या संख्येवर आळा बसेल.- सुखदेव दरवेशी,प्रभारी सहाय्यक आयुक्तया निर्बीजीकरण केंद्रातील सर्वच व्यवहार संशयास्पद आहे. रेबीजग्रस्त श्वान व नसबंदी करण्यासाठी आणलेले श्वान एकाच वॉर्डमध्ये ठेवले जातात. वयाने लहान श्वानांवरही नसबंदी शस्त्रक्रीया केली जात असल्याचा संशय आहे. पोलिसही सहकार्य करीत नाहीत.- मितेश जैन, अ‍ॅनीमल वेल्फेअरबोर्ड आॅफ इंडिया, सदस्य

टॅग्स :Vasai Virarवसई विरार