शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

शिवसेनेने केली शेतकरी कर्जमाफी- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 01:09 IST

पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचे मुख्य केंद्र कासा ठरले आहे.

कासा : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचे मुख्य केंद्र कासा ठरले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचा जोरदार प्रचार येथूनच केला. त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी-महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा कासा येथे झाली. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कासा येथे आले. या सभेला डहाणू व तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्वच उमेदवार उपस्थित होते.एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने एक सर्वसमावेशक कार्यक्रम आखला आहे. सर्वसामान्यांचे, आदिवासींचे हित लक्षात घेऊन एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या भागात तर दोन लाखांच्या वर कोणीही कर्ज घेतले नसल्याने १०० टक्के कर्ज माफ होईल. तसेच गोरगरीब जनतेला उपाशी राहावे लागू नये म्हणून या सरकारने १० रुपयांत जेवणाची शिवथाळी सुरू केली आहे. सरकार स्थापन झाल्याबरोबर पहिल्यांदा सरकारने आदिवासी विकास विभागाची बैठक घेतली. आदिवासींना न्याय, नीट शिक्षण, काम, धान्य कसे मिळेल याकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले. या सभेसाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, माजी आमदार अमित घोडा, शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा प्रमुख राजेश शहा आदी उपस्थित होते.